शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
5
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
6
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
7
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
8
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
9
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
10
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
11
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
12
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
13
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
14
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
15
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
16
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
17
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
18
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
19
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
20
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"

केंद्राच्या डाळ साठा मर्यादेला राज्याने द्यावी स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:09 IST

पुणे : केंद्र सरकारने २ जुलै रोजी काढलेल्या ‘डाळ साठा मर्यादे’च्या अध्यादेशाला उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांनी स्थगिती दिली ...

पुणे : केंद्र सरकारने २ जुलै रोजी काढलेल्या ‘डाळ साठा मर्यादे’च्या अध्यादेशाला उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांनी स्थगिती दिली आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे शेतकरी, डाळ व्यापारी, मिलर, आडते यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनेही या निर्णयाला तत्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी दि पूना मर्चंटस चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. येत्या शुक्रवारी (दि. १६) महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्यांमध्ये या निर्णयाविरोधात लाक्षणिक बंद करण्यात येणार आहे.

नव्या अध्यादेशानुसार केंद्र शासनाला रोजच्या रोज डाळ साठ्याची माहिती देणे बंधनकारक केले आहे. ही अट जाचक असल्याचे चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. १४) पत्रकार परिषदेत सांगितले. संघटनेचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, उपाध्यक्ष अशोक लोढा, सचिव विजय मुथा, अनिल लुंकड, प्रवीण चोरबेले तसेज दि फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑॅफ ट्रेडर्सचे अध्यक्ष वालचंद संचेती आदी या वेळी उपस्थित होते.

पोपटलास ओस्तवाल म्हणाले, “डाळींच्या साठ्यासंदर्भात व्यापाऱ्यांवर जाचक कायद्याने अन्याय होत आहे. राज्यातील मिलर्स, डिलर्स आणि इम्पोर्टर यांनी उपभोक्ता मामले विभाग, भारत सरकार यांच्या पोर्टलवर उपलब्ध डाळ साठ्याची माहिती भरायची आहे. तसेच ती नियमित अद्ययावत करण्याचे आदेश दिले आहे. मात्र, देशातील इंटरनेट सुविधा खराब असून त्यात वारंवार अडथळे येतात.”

यापूर्वी व्यापारी डाळींच्या साठ्यासंदर्भातील माहिती आवक-जावक दर पंधरा दिवसांनी अन्न-धान्य वितरण अधिकारी कार्यालयाकडे कळवीत होते. सध्या कोरोनामुळे व्यापाऱ्यांकडे पुरेसे कर्मचारी नाहीत. त्यामुळे रोज पोर्टलवर माहिती देणे शक्य नसल्याने हा निर्णय त्वरित रद्द करावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली असल्याचे चेंबरचे उपाध्यक्ष अशोक लोढा यांनी सांगितले.

चौकट

काय आहे अध्यादेश

केंद्र शासनाने २ जुलैला काढलेल्या अध्यादेशात ठोक विक्रेत्यांसाठी दोनशे टन आणि किरकोळ विक्रेत्यांसाठी पाच टनांची मर्यादा टाकली आहे. केंद्र शासनाने २०२० मध्ये कृषीविषयक तीन कायदे आणले होते. त्यापैकी एका कायद्यात सर्व प्रकारच्या डाळी अत्यावश्यक कायद्यातून मुक्त करून साठा मर्यादा रद्द केली होती. फक्त आपत्कालीन परिस्थितीत साठा मर्यादेबाबत विचार केला जाईल, असे सांगण्यात आले होते.