शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या डाळ साठा मर्यादेला राज्याने द्यावी स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:09 IST

पुणे : केंद्र सरकारने २ जुलै रोजी काढलेल्या ‘डाळ साठा मर्यादे’च्या अध्यादेशाला उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांनी स्थगिती दिली ...

पुणे : केंद्र सरकारने २ जुलै रोजी काढलेल्या ‘डाळ साठा मर्यादे’च्या अध्यादेशाला उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांनी स्थगिती दिली आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे शेतकरी, डाळ व्यापारी, मिलर, आडते यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनेही या निर्णयाला तत्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी दि पूना मर्चंटस चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. येत्या शुक्रवारी (दि. १६) महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्यांमध्ये या निर्णयाविरोधात लाक्षणिक बंद करण्यात येणार आहे.

नव्या अध्यादेशानुसार केंद्र शासनाला रोजच्या रोज डाळ साठ्याची माहिती देणे बंधनकारक केले आहे. ही अट जाचक असल्याचे चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. १४) पत्रकार परिषदेत सांगितले. संघटनेचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, उपाध्यक्ष अशोक लोढा, सचिव विजय मुथा, अनिल लुंकड, प्रवीण चोरबेले तसेज दि फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑॅफ ट्रेडर्सचे अध्यक्ष वालचंद संचेती आदी या वेळी उपस्थित होते.

पोपटलास ओस्तवाल म्हणाले, “डाळींच्या साठ्यासंदर्भात व्यापाऱ्यांवर जाचक कायद्याने अन्याय होत आहे. राज्यातील मिलर्स, डिलर्स आणि इम्पोर्टर यांनी उपभोक्ता मामले विभाग, भारत सरकार यांच्या पोर्टलवर उपलब्ध डाळ साठ्याची माहिती भरायची आहे. तसेच ती नियमित अद्ययावत करण्याचे आदेश दिले आहे. मात्र, देशातील इंटरनेट सुविधा खराब असून त्यात वारंवार अडथळे येतात.”

यापूर्वी व्यापारी डाळींच्या साठ्यासंदर्भातील माहिती आवक-जावक दर पंधरा दिवसांनी अन्न-धान्य वितरण अधिकारी कार्यालयाकडे कळवीत होते. सध्या कोरोनामुळे व्यापाऱ्यांकडे पुरेसे कर्मचारी नाहीत. त्यामुळे रोज पोर्टलवर माहिती देणे शक्य नसल्याने हा निर्णय त्वरित रद्द करावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली असल्याचे चेंबरचे उपाध्यक्ष अशोक लोढा यांनी सांगितले.

चौकट

काय आहे अध्यादेश

केंद्र शासनाने २ जुलैला काढलेल्या अध्यादेशात ठोक विक्रेत्यांसाठी दोनशे टन आणि किरकोळ विक्रेत्यांसाठी पाच टनांची मर्यादा टाकली आहे. केंद्र शासनाने २०२० मध्ये कृषीविषयक तीन कायदे आणले होते. त्यापैकी एका कायद्यात सर्व प्रकारच्या डाळी अत्यावश्यक कायद्यातून मुक्त करून साठा मर्यादा रद्द केली होती. फक्त आपत्कालीन परिस्थितीत साठा मर्यादेबाबत विचार केला जाईल, असे सांगण्यात आले होते.