शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
2
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
5
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
6
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
7
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
8
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
9
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
10
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
11
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
12
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
13
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
14
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
15
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
16
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
17
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
18
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
19
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना
20
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य

देशाच्या साखर उत्पादनात राज्याची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : डिसेंबर २०२० अखेर देशस्तरावर झालेल्या साखर उत्पादनात महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. देशात आतापर्यंत ४८२ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : डिसेंबर २०२० अखेर देशस्तरावर झालेल्या साखर उत्पादनात महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. देशात आतापर्यंत ४८२ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे. त्यांनी १०८ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. राज्याचा त्यातील वाटा ४० लाख टन साखरेचा असून उत्तर प्रदेशपेक्षा तो जास्त आहे.

राज्याच्याच मागील वर्षीपेक्षाही हे उत्पादन जास्त आहे. आतापर्यंत राज्यात ४२१ टन उसाचे गाळप झाले आहे. मागील वर्षी या काळात फक्त १६५ लाख टन ऊस गाळपासाठी गेला होता. साखरेचे उत्पादन मागील वर्षी या काळात फक्त १६ लाख ४० हजार टन होते. यावर्षी याच काळात आताच ४० लाख टन साखर राज्यात उत्पादित झाली आहे.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने ही माहिती दिली. डिसेंबर २०२० अखेर देशात ४८२ साखर कारखाने सुरू आहेत. मागील वर्षी याच काळात ४३९ कारखाने सुरू होते. देशात आतापर्यंत ११५१ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यातून १०८ टन साखर उत्पादित झाली. साखर उत्पादनामध्ये देशात महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेश व त्यापाठोपाठ गुजरात, हरियाना, बिहार, मध्य प्रदेश, पंजाब, तमिळनाडू, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा अशी क्रमवारी आहे.

महाराष्ट्राने साखर उत्पादनात यंदा सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. यंदाचा गाळप हंगाम लांबणार असल्याचा साखर आयुक्त कार्यालयाचा अंदाज असून, त्यातून केंद्र सरकारने दिलेले १०८ कोटी लिटर इथेनॉलच्या उत्पादनाचे लक्ष्यही गाठले जाईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या ७० कारखाने इथेनॉल निर्मिती करत आहेत. मागील वर्षी फक्त १८ कोटी लिटर इथेनॉल निर्मिती झाली होती. यंदा आताच ४१ साखर कारखान्यांनी ६ कोटी लिटर इथेनॉल तयार केले आहे. त्यात रोज भर पडते आहे.

केंद्र सरकारने जागतिक बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन इथेनॉल निर्मितीला उत्तेजन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यासाठीच कारखान्यांना इथेनॉलचे वाढीव दर, तेल कंपन्यांकडून खरेदीची हमी, तसेच पुरवठा तारखेपासून २१ दिवसांत पूर्ण पेमेंट करण्याची हमी दिली आहे, अशी माहिती राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाने दिली.

राज्यातील साखर कारखानदारांनी त्यामुळेच साखरेऐवजी इथेनॉल निर्मितीवर भर द्यावा. निर्यातीचे उद्दिष्ट दिले आहे त्यानुसार साखर निर्मिती करावी व नंतर इथनॉल निर्मितीवर भर द्यावा, असे आवाहन महासंघाने केले आहे. त्यातून कारखान्यांच्या विविध ठिकाणी अडकलेल्या रकमा व त्यावर चढणाऱ्या व्याजाच्या बोज्यापासून कारखान्यांची सुटका होईल, असे महासंघाने नमूद केले आहे.