शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत भारतीय IT कर्मचाऱ्यांसाठी 'टेन्शन'! H-1B व्हिसा मिळणं ७०% नी घटलं; TCS चाही रिजेक्शन रेट वाढला!
2
Nanded Murder Case : "तुझ्या बहिणीचं ज्याच्यासोबत लफडं त्याला मारुन ये....", सक्षमला मारण्याआधी पोलीस चौकीतील घटनाक्रम; आंचलने सांगितली धक्कादायक माहिती
3
एका झटक्यात चांदीची किंमत ९३८१ रुपयांनी वाढली, सोन्यातही जोरदार वाढ; पाहा नवे दर
4
श्रेयस अय्यरसोबत रिलेशनशिपच्या चर्चांवर अखेर मृणाल ठाकूरने सोडलं मौन; म्हणाली...
5
पाक लष्कराचा 'बॉस' कोण? COAS मुनीर यांचा कार्यकाळ संपला, पण CDFचे पद रिकामेच! नेमका अडसर कशाचा?
6
संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..."
7
"पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा", हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका
8
नेव्ही ऑफिसरच्या भूमिकेत दिलजीत दोसांझ, 'बॉर्डर २'मधून अभिनेत्याचा पहिला व्हिडीओ आउट
9
चुकीच्या वेळी दूध प्यायल्याने मुलांच्या वाढीवर परिणाम? सकाळ की संध्याकाळ... 'ही' आहे सर्वोत्तम वेळ
10
लग्नासाठी ऑनलाइन वधू शोधत होता अन् लागला ४९ लाखांचा चुना; पीचडी करण्याऱ्या तरुणासोबत काय घडलं?
11
स्वस्त झाला सिलिंडर; आजपासून किती रुपयांना मिळणार, पाहा ATF च्या किंमतीत किती झाला बदल?
12
भारतीय युवकानं नाकारली ६७ लाखांची जॉब ऑफर; 'वर्क फ्रॉम होम'पासून का काढतायेत पळ? समोर आलं कारण
13
Ajit Pawar: जाहीर सभेत अजित पवारांचा 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख; दादा गालातल्या गालात हसले आणि म्हणाले...
14
काळीज हेलावणारी घटना! ७ वर्षांच्या लेकाला वाचवण्यासाठी धावली, आणि भरधाव बसने आईला चिरडले; तीन लेकरांसमोर मातेचा मृत्यू
15
वैभव सूर्यवंशीचा टीम इंडियात धमाका; बिहारमध्ये गेल्यावर बॅटला लागलं 'ग्रहण'
16
खळबळजनक! 'तो' वाद टोकाला गेला, लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशीच विवाहितेसोबत घडलं भयंकर
17
नोकरी करणं गरज नाही तर केवळ छंद राहिल; Nikhil Kamath यांच्या पॉडकॉस्ट मध्ये Elon Musk यांची भविष्यवाणी
18
'तुम्ही चर्चा करत नाही, तो ड्रामा'; हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
19
SIP ला लावा 'टॉप-अप'चा बुस्टर! दरवर्षी रक्कम वाढवा आणि तुमचं आर्थिक लक्ष्य वेळेआधी पूर्ण करा!
20
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक समायोजनाला बसला ब्रेक, समायोजन स्थगित; आता २०२५-२६ च्या संचमान्यतेनंतरच प्रक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या साखर उत्पादनात राज्याची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : डिसेंबर २०२० अखेर देशस्तरावर झालेल्या साखर उत्पादनात महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. देशात आतापर्यंत ४८२ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : डिसेंबर २०२० अखेर देशस्तरावर झालेल्या साखर उत्पादनात महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. देशात आतापर्यंत ४८२ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे. त्यांनी १०८ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. राज्याचा त्यातील वाटा ४० लाख टन साखरेचा असून उत्तर प्रदेशपेक्षा तो जास्त आहे.

राज्याच्याच मागील वर्षीपेक्षाही हे उत्पादन जास्त आहे. आतापर्यंत राज्यात ४२१ टन उसाचे गाळप झाले आहे. मागील वर्षी या काळात फक्त १६५ लाख टन ऊस गाळपासाठी गेला होता. साखरेचे उत्पादन मागील वर्षी या काळात फक्त १६ लाख ४० हजार टन होते. यावर्षी याच काळात आताच ४० लाख टन साखर राज्यात उत्पादित झाली आहे.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने ही माहिती दिली. डिसेंबर २०२० अखेर देशात ४८२ साखर कारखाने सुरू आहेत. मागील वर्षी याच काळात ४३९ कारखाने सुरू होते. देशात आतापर्यंत ११५१ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यातून १०८ टन साखर उत्पादित झाली. साखर उत्पादनामध्ये देशात महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेश व त्यापाठोपाठ गुजरात, हरियाना, बिहार, मध्य प्रदेश, पंजाब, तमिळनाडू, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा अशी क्रमवारी आहे.

महाराष्ट्राने साखर उत्पादनात यंदा सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. यंदाचा गाळप हंगाम लांबणार असल्याचा साखर आयुक्त कार्यालयाचा अंदाज असून, त्यातून केंद्र सरकारने दिलेले १०८ कोटी लिटर इथेनॉलच्या उत्पादनाचे लक्ष्यही गाठले जाईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या ७० कारखाने इथेनॉल निर्मिती करत आहेत. मागील वर्षी फक्त १८ कोटी लिटर इथेनॉल निर्मिती झाली होती. यंदा आताच ४१ साखर कारखान्यांनी ६ कोटी लिटर इथेनॉल तयार केले आहे. त्यात रोज भर पडते आहे.

केंद्र सरकारने जागतिक बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन इथेनॉल निर्मितीला उत्तेजन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यासाठीच कारखान्यांना इथेनॉलचे वाढीव दर, तेल कंपन्यांकडून खरेदीची हमी, तसेच पुरवठा तारखेपासून २१ दिवसांत पूर्ण पेमेंट करण्याची हमी दिली आहे, अशी माहिती राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाने दिली.

राज्यातील साखर कारखानदारांनी त्यामुळेच साखरेऐवजी इथेनॉल निर्मितीवर भर द्यावा. निर्यातीचे उद्दिष्ट दिले आहे त्यानुसार साखर निर्मिती करावी व नंतर इथनॉल निर्मितीवर भर द्यावा, असे आवाहन महासंघाने केले आहे. त्यातून कारखान्यांच्या विविध ठिकाणी अडकलेल्या रकमा व त्यावर चढणाऱ्या व्याजाच्या बोज्यापासून कारखान्यांची सुटका होईल, असे महासंघाने नमूद केले आहे.