शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

देशाच्या साखर उत्पादनात राज्याची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : डिसेंबर २०२० अखेर देशस्तरावर झालेल्या साखर उत्पादनात महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. देशात आतापर्यंत ४८२ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : डिसेंबर २०२० अखेर देशस्तरावर झालेल्या साखर उत्पादनात महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. देशात आतापर्यंत ४८२ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे. त्यांनी १०८ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. राज्याचा त्यातील वाटा ४० लाख टन साखरेचा असून उत्तर प्रदेशपेक्षा तो जास्त आहे.

राज्याच्याच मागील वर्षीपेक्षाही हे उत्पादन जास्त आहे. आतापर्यंत राज्यात ४२१ टन उसाचे गाळप झाले आहे. मागील वर्षी या काळात फक्त १६५ लाख टन ऊस गाळपासाठी गेला होता. साखरेचे उत्पादन मागील वर्षी या काळात फक्त १६ लाख ४० हजार टन होते. यावर्षी याच काळात आताच ४० लाख टन साखर राज्यात उत्पादित झाली आहे.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने ही माहिती दिली. डिसेंबर २०२० अखेर देशात ४८२ साखर कारखाने सुरू आहेत. मागील वर्षी याच काळात ४३९ कारखाने सुरू होते. देशात आतापर्यंत ११५१ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यातून १०८ टन साखर उत्पादित झाली. साखर उत्पादनामध्ये देशात महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेश व त्यापाठोपाठ गुजरात, हरियाना, बिहार, मध्य प्रदेश, पंजाब, तमिळनाडू, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा अशी क्रमवारी आहे.

महाराष्ट्राने साखर उत्पादनात यंदा सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. यंदाचा गाळप हंगाम लांबणार असल्याचा साखर आयुक्त कार्यालयाचा अंदाज असून, त्यातून केंद्र सरकारने दिलेले १०८ कोटी लिटर इथेनॉलच्या उत्पादनाचे लक्ष्यही गाठले जाईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या ७० कारखाने इथेनॉल निर्मिती करत आहेत. मागील वर्षी फक्त १८ कोटी लिटर इथेनॉल निर्मिती झाली होती. यंदा आताच ४१ साखर कारखान्यांनी ६ कोटी लिटर इथेनॉल तयार केले आहे. त्यात रोज भर पडते आहे.

केंद्र सरकारने जागतिक बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन इथेनॉल निर्मितीला उत्तेजन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यासाठीच कारखान्यांना इथेनॉलचे वाढीव दर, तेल कंपन्यांकडून खरेदीची हमी, तसेच पुरवठा तारखेपासून २१ दिवसांत पूर्ण पेमेंट करण्याची हमी दिली आहे, अशी माहिती राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाने दिली.

राज्यातील साखर कारखानदारांनी त्यामुळेच साखरेऐवजी इथेनॉल निर्मितीवर भर द्यावा. निर्यातीचे उद्दिष्ट दिले आहे त्यानुसार साखर निर्मिती करावी व नंतर इथनॉल निर्मितीवर भर द्यावा, असे आवाहन महासंघाने केले आहे. त्यातून कारखान्यांच्या विविध ठिकाणी अडकलेल्या रकमा व त्यावर चढणाऱ्या व्याजाच्या बोज्यापासून कारखान्यांची सुटका होईल, असे महासंघाने नमूद केले आहे.