शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘अभिजात’ प्रक्रियेबाबत राज्य सरकार अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:54 IST

माहिती अधिकारात बाब उघड : भाषेबाबतची उदासीनता पुन्हा अधोरेखित

पुणे : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी विविध पातळ्यांवर शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारची चालढकल, राज्य सरकारची उदासीनता यामुळे भाषाप्रेमींमध्ये संताप पाहायला मिळत आहे. असे असताना, केंद्र सरकारने साहित्य अकादमीकडे पाठवलेल्या प्रस्तावाबाबत राज्य सरकार अनभिज्ञ असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे शासनाची भाषा, साहित्य, संस्कृतीबाबतची उदासीनता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

अभिजात दर्जाचा प्रस्ताव केंद्राकडून साहित्य अकादमीकडे पुन्हा पाठविला गेला. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी त्याच्या तपशीलवार कारणांची माहिती राज्य शासनाकडे मागितली होती. मात्र, कारणे देणे तर दूरच; पण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारने साहित्य अकादमीकडे परत पाठविल्याबाबतची माहिती शासनाच्या अभिलेखात उपलब्ध नाही, असे शासनाकडून कळवण्यात आले आहे. त्यामुळे राज्य शासन अभिजातच्या महत्त्वाच्या निर्णयाकडे काणाडोळा करत असल्याचे उघड झाले आहे.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी गेल्या तीन-चार वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारने तातडीने निर्णय घेऊन मराठीला अभिजात दर्जा द्यावा; अन्यथा न्यायालयीन लढाई अपरिहार्य असल्याचे महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे नमूद करण्यात आले होते. बडोदा येथील साहित्य संमेलनामध्ये अभिजात भाषेचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला असून, साहित्यिकांचे शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांना भेटीला घेऊन जाण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून दिले होते.मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी शिफारस सुरुवातीला साहित्य अकादमीनेच केली होती. असे असतानाही एक कॅबिनेट नोट तयार करून सल्लामसलत करण्यासाठी ती साहित्य अकादमीकडे पाठवल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून मसापला कळवण्यात आले होते. त्यामुळे केंद्र सरकार अभिजात दर्जाबाबत चालढकल करत असल्याचे निदर्शनास आले होते.अभिजात दर्जा प्रस्तावाचे झाले काय?४भाषा, साहित्य आणि संस्कृतीबाबत शासनाने कायम उदासीन दृष्टीकोनच बाळगला आहे. अभिजात दर्जाबाबत केवळ आश्वासनांचे फुगे फुगवून टोलवाटोलवीच सुरू आहे, अशी प्रतिक्रिया अभय कोलारकर यांनी व्यक्त केली. मराठी भाषेच्या अभिजात दर्जा प्रस्तावाची अशी अवहेलना गेल्या सहा वर्षांपासून सुरू असताना महाराष्ट्र शासन आणि राज्याचे लोकप्रतिनिधी याबाबत कसे सारखेच निष्क्रिय आहेत, हेच राज्य शासनाकडून मिळालेल्या माहितीवरून स्पष्ट होते, अशी टिप्पणी कोलारकर यांनी केली.

टॅग्स :marathiमराठीGovernmentसरकारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक