शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

राज्य शासनाने मंजूर केलेली पदे रद्द

By admin | Updated: March 20, 2015 01:02 IST

महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमावलीत महापालिकेने सुचविलेली नसतानाही, राज्य शासनाने १३१ जादा पदांची निर्मिती केली आहे.

पुणे : महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमावलीत महापालिकेने सुचविलेली नसतानाही, राज्य शासनाने १३१ जादा पदांची निर्मिती केली आहे. या निर्णयामुळे महापालिकेच्या स्वायत्तेवर गदा येणार असल्याने ही पदे रद्द करण्याचा निर्णय महापालिकेच्या मुख्य सभेत गुुरुवारी घेण्यात आला. महापालिकेचे कामकाज सुरळीत होण्यासाठी पालिकेने २०११मध्ये सेवा प्रवेश नियमावली आणि कर्मचारी आकृतिबंध राज्य शासनाच्या मान्यतेसाठी पाठविला होता. त्याला आॅगस्ट २०१४मध्ये मान्यता देण्यात आली आहे. त्यात राज्य शासनाने महापालिकेने न सुचविलेली १३१ पदे निर्माण करण्यात आली आहेत. प्रत्यक्षात महापालिका अधिनियम ५१ नुसार, या आकृतिबंधातील पदांची संख्या, पगार निश्चित करण्याचे अधिकर संबंधित महापालिकेला असतात; मात्र राज्य शासनाने त्यात हस्तक्षेप करून ही पदे निर्माण केली आहेत. तसेच, त्यातील काही जागांवर शासनाकडून अधिकारीही प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहेत. या अधिकाऱ्यांना महापालिका सेवेत रुजू न करून घेण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. मात्र, आता ही सर्वच पदे रद्द करण्याचा प्रस्ताव रिपइंचे गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि नगरसेवक संजय बालगुडे यांनी दिला होता. त्याला मुख्य सभेत एकमताने मान्यता दिली. (प्रतिनिधी)४महापालिकेतील चतुर्थश्रेणी वगार्तील कर्मचाऱ्यांना आजारामुळे किंवा अपघातामुळे नोकरी गमवावी लागल्यास त्यांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर वारसदाराला नोकरी देण्याच्या निर्णयालाही मुख्य सभेत मान्यता देण्यात आली. या कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारच्या व्याधी जडत आहेत. ४परिणामी, त्यांना नोकरीवर पाणी सोडावे लागते. परंतु, अशा परिस्थितीत त्यांच्या जागी वारसदारांना नोकरी मिळत नाही. तर, प्रशासनाकडून राज्य सरकारने आखून दिलेल्या धोरणाची अंमलबजावणी केली जाते. त्यानुसार २००५ पर्यंत अशा कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळत होती; परंतु त्यानंतर राज्य सरकारने हे धोरण बंद केल्यामुळे महापालिकेतही त्याची अंमलबजावणी सुरू झाली. ४हे पालिकेचे कर्मचारी असल्याने तसेच त्यांच्या वेतनाचा भार पालिका उचलणार असल्याने राज्य शासनाच्या नियमांची आडकाठी न आणता अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्यास मान्यता देण्यात आली.