शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा घात केला - मराठा क्रांती मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:09 IST

पुणे : मराठा समाजाची मागणी नसताना वैयक्तिक याचिकेचा आधार घेऊन, मराठा समाजाचा ‘ईडब्ल्यूएस’मध्ये समावेश करून राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा ...

पुणे : मराठा समाजाची मागणी नसताना वैयक्तिक याचिकेचा आधार घेऊन, मराठा समाजाचा ‘ईडब्ल्यूएस’मध्ये समावेश करून राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा घात केला आहे, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आला़

याबाबत आरक्षण अभ्यासक श्रीमंत कोकाटे, मराठ सेवा संघाचे राजेंद्र कुंजीर, संभाजी ब्रिगेडचे विकास पालकर आदींनी माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर हे आरोप केले आहेत़ सरकारने काही लोकांना पुढे करून विद्यार्थ्यांची मोठी अडचण होत असल्याचे कारण सांगून, औरंगाबाद खंडपीठाच्या व मुंबई उच्च न्यायालयातील एका पीआयएल च्या नावाखाली मराठा आरक्षणाचा पाया खिळखिळा करण्याचा कट रचला आहे़ सरकारने विद्यार्थ्यांच्या हिताचे गोंडस नाव पुढे करून त्यांची राजकीय अडचण होऊ नये म्हणून तीन कोटी मराठा समाजाची दिशाभूल केली आहे़

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापन झालेल्या राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागास ठरविला आहे़ पण सरकारने ईडब्ल्यूएस चा घाट घालून समाजाची दिशाभूल केली जात आहे़ तर मराठा समाजातील मुठभर लोक त्यांच्या वैयक्तिक अजेंड्यासाठी ईडब्ल्यूएस आरक्षणाचे समर्थन करीत असून, ते लोक राज्य आयोगाची शिफारस, ५८ अतिविराट मोर्चे व ४२ आत्महत्या केलेल्यांचा अपमान करीत असल्याचा आरोपही मराठा क्रांती मोर्चाने केला आहे़

राज्य मागासवर्ग आयोग, विधीमंडळ कायदा, मुंबई उच्च न्यायालयाची मान्यता मिळालेले एसईबीसी आरक्षणाचा दर्जा ओबीसी आरक्षणाचा दर्जा एकच असल्याने शासनाने मराठा समाजास न्याय आरक्षण द्यावे अशी मागणीही यावेळी केली आहे़