शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा घात केला - मराठा क्रांती मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:09 IST

पुणे : मराठा समाजाची मागणी नसताना वैयक्तिक याचिकेचा आधार घेऊन, मराठा समाजाचा ‘ईडब्ल्यूएस’मध्ये समावेश करून राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा ...

पुणे : मराठा समाजाची मागणी नसताना वैयक्तिक याचिकेचा आधार घेऊन, मराठा समाजाचा ‘ईडब्ल्यूएस’मध्ये समावेश करून राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा घात केला आहे, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आला़

याबाबत आरक्षण अभ्यासक श्रीमंत कोकाटे, मराठ सेवा संघाचे राजेंद्र कुंजीर, संभाजी ब्रिगेडचे विकास पालकर आदींनी माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर हे आरोप केले आहेत़ सरकारने काही लोकांना पुढे करून विद्यार्थ्यांची मोठी अडचण होत असल्याचे कारण सांगून, औरंगाबाद खंडपीठाच्या व मुंबई उच्च न्यायालयातील एका पीआयएल च्या नावाखाली मराठा आरक्षणाचा पाया खिळखिळा करण्याचा कट रचला आहे़ सरकारने विद्यार्थ्यांच्या हिताचे गोंडस नाव पुढे करून त्यांची राजकीय अडचण होऊ नये म्हणून तीन कोटी मराठा समाजाची दिशाभूल केली आहे़

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापन झालेल्या राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागास ठरविला आहे़ पण सरकारने ईडब्ल्यूएस चा घाट घालून समाजाची दिशाभूल केली जात आहे़ तर मराठा समाजातील मुठभर लोक त्यांच्या वैयक्तिक अजेंड्यासाठी ईडब्ल्यूएस आरक्षणाचे समर्थन करीत असून, ते लोक राज्य आयोगाची शिफारस, ५८ अतिविराट मोर्चे व ४२ आत्महत्या केलेल्यांचा अपमान करीत असल्याचा आरोपही मराठा क्रांती मोर्चाने केला आहे़

राज्य मागासवर्ग आयोग, विधीमंडळ कायदा, मुंबई उच्च न्यायालयाची मान्यता मिळालेले एसईबीसी आरक्षणाचा दर्जा ओबीसी आरक्षणाचा दर्जा एकच असल्याने शासनाने मराठा समाजास न्याय आरक्षण द्यावे अशी मागणीही यावेळी केली आहे़