शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
2
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
3
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
4
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
5
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
6
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
7
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
8
Two Wheeler Toll: आता दुचाकींनाही टोल; १५ ऑगस्टपासून 'या' मार्गांवरून जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे
9
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
10
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
11
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
12
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
13
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...
14
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
15
‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास
16
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
17
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
18
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
19
मुंबईत ३० व्या मजल्यावरून उडी घेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या; कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय
20
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?

टंचाईग्रस्त भागामध्ये तत्काळ टॅँकर सुरू करा

By admin | Updated: April 9, 2017 04:27 IST

जिल्ह्यातील टँकर सुरू करण्याची शासकीय प्रकिया बंद करावी, मागणी करताच टँकर सुरू करावा, टँकर सुरू करण्याचे अधिकार तहसीलदारांना द्यावेत अशी मागणी जिल्हा परिषद

पुणे : जिल्ह्यातील टँकर सुरू करण्याची शासकीय प्रकिया बंद करावी, मागणी करताच टँकर सुरू करावा, टँकर सुरू करण्याचे अधिकार तहसीलदारांना द्यावेत अशी मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी पाणीटंचाई आढावा बैठकीत केली. जिल्ह्यातील पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी पाणीटंचाई आढावा बैठक बोलावली होते. उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती राणी शेळके, बांधकाम व आरोग्य विभागाचे सभापती प्रवीण माने, समाजकल्याण समिती सभापती सुरैखा चौरे आणि जिल्हा परिषद व जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.टंचाईग्रस्त भागातील ग्रामस्थांनी ग्रामसेवकांकडे टँकरची मागणी केल्यानंतर शासकीय प्रकिया पार पडून १५ दिवसांनी पाणीपुरवठा सुरू होतो. यामुळे नागरिकांची गैरसोय होते. टंचाईग्रस्त गावामध्ये हातपंपाची दुरुस्ती प्राधान्याने करावी, नव्याने विंधन विहिरी बांधाव्यात, पाणीपुरवठा योजना दुरुस्त कराव्यात, शिवकालीन खडकातील टाक्या बांधाव्यात अशा सूचना केल्या. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी जिल्हा परिषद सदस्यांनी केलेल्या सूचनांनुसार उपाययोजना केल्या जातील. तहसीलदारांना टँकरचे अधिकार द्यावेत, मागणी केल्यानंतर तत्काळ टँकर द्यावा या मागण्यांबाबत जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती दिली. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी सदस्यांच्या मागणीनुसार पूरक टंचाई आराखड्यात उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन दिले.टँकर कोणासाठी ? : हव्या ठोस उपाययोजनापाणीटंचाईग्रस्त भागामध्ये टँकर माणसे जगवण्यासाठी आहेत की कार्यकर्त्यांसाठी? टँकरमुक्तीसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. टँकरमुक्त गाव आणि जिल्हा झाला पाहिजे. वषार्नुवर्षे काही ठराविक गावांमध्ये टँकर सुरू असतात. या गावांमधील टँकरमुक्तीसाठी ठोस उपाययोजना का केल्या जात नाहीच? टँकर हा कार्यकर्त्यांना जगवण्यासाठी आहे का, असा सवाल काँग्रसेच्या गटनेते विठ्ठल आव्हाळे यांनी सभागृहात केला. टँकरमध्ये भष्ट्राचार होत असल्याचाही आक्षेप त्यांनी घेतला. वरिष्ठ अधिकारी नसल्याने गोंधळ जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा परिषदेत आढावा बैठक बोलावण्यात आली होती. पाणीटंचाई आराखडा आणि जिल्ह्यातील पाणीप्रश्नावर बैठकीत चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते; परंतु या बैठकीला इरिगेशन, वीजवितरण, रोजगार हमी, तसेच संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी गैरहजर राहिल्यामुळे सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातला. आमच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे कोण देणार, म्हणत सदस्यांनी बैठकीच्या सुरुवातीलाच जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना धारेवर धरले. पहिल्याच बैठकीला ही परिस्थिती असल्याने नाराजी होती. या वेळी शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके आणि भाजपाचे गटनेते शरद बुट्टे यांनी या घटनेचा निषेध नोंदविला पाणीटंचाईसारख्या गंभीर प्रश्नावर अधिकारी वर्ग गैरहजर राहत असतील, तर अधिकाऱ्यांना पाणीटंचाईचे गांभीर्य नाही का, असा प्रश्न उपस्थित केला.