शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
18
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
19
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
20
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!

टंचाईग्रस्त भागामध्ये तत्काळ टॅँकर सुरू करा

By admin | Updated: April 9, 2017 04:27 IST

जिल्ह्यातील टँकर सुरू करण्याची शासकीय प्रकिया बंद करावी, मागणी करताच टँकर सुरू करावा, टँकर सुरू करण्याचे अधिकार तहसीलदारांना द्यावेत अशी मागणी जिल्हा परिषद

पुणे : जिल्ह्यातील टँकर सुरू करण्याची शासकीय प्रकिया बंद करावी, मागणी करताच टँकर सुरू करावा, टँकर सुरू करण्याचे अधिकार तहसीलदारांना द्यावेत अशी मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी पाणीटंचाई आढावा बैठकीत केली. जिल्ह्यातील पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी पाणीटंचाई आढावा बैठक बोलावली होते. उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती राणी शेळके, बांधकाम व आरोग्य विभागाचे सभापती प्रवीण माने, समाजकल्याण समिती सभापती सुरैखा चौरे आणि जिल्हा परिषद व जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.टंचाईग्रस्त भागातील ग्रामस्थांनी ग्रामसेवकांकडे टँकरची मागणी केल्यानंतर शासकीय प्रकिया पार पडून १५ दिवसांनी पाणीपुरवठा सुरू होतो. यामुळे नागरिकांची गैरसोय होते. टंचाईग्रस्त गावामध्ये हातपंपाची दुरुस्ती प्राधान्याने करावी, नव्याने विंधन विहिरी बांधाव्यात, पाणीपुरवठा योजना दुरुस्त कराव्यात, शिवकालीन खडकातील टाक्या बांधाव्यात अशा सूचना केल्या. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी जिल्हा परिषद सदस्यांनी केलेल्या सूचनांनुसार उपाययोजना केल्या जातील. तहसीलदारांना टँकरचे अधिकार द्यावेत, मागणी केल्यानंतर तत्काळ टँकर द्यावा या मागण्यांबाबत जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती दिली. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी सदस्यांच्या मागणीनुसार पूरक टंचाई आराखड्यात उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन दिले.टँकर कोणासाठी ? : हव्या ठोस उपाययोजनापाणीटंचाईग्रस्त भागामध्ये टँकर माणसे जगवण्यासाठी आहेत की कार्यकर्त्यांसाठी? टँकरमुक्तीसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. टँकरमुक्त गाव आणि जिल्हा झाला पाहिजे. वषार्नुवर्षे काही ठराविक गावांमध्ये टँकर सुरू असतात. या गावांमधील टँकरमुक्तीसाठी ठोस उपाययोजना का केल्या जात नाहीच? टँकर हा कार्यकर्त्यांना जगवण्यासाठी आहे का, असा सवाल काँग्रसेच्या गटनेते विठ्ठल आव्हाळे यांनी सभागृहात केला. टँकरमध्ये भष्ट्राचार होत असल्याचाही आक्षेप त्यांनी घेतला. वरिष्ठ अधिकारी नसल्याने गोंधळ जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा परिषदेत आढावा बैठक बोलावण्यात आली होती. पाणीटंचाई आराखडा आणि जिल्ह्यातील पाणीप्रश्नावर बैठकीत चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते; परंतु या बैठकीला इरिगेशन, वीजवितरण, रोजगार हमी, तसेच संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी गैरहजर राहिल्यामुळे सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातला. आमच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे कोण देणार, म्हणत सदस्यांनी बैठकीच्या सुरुवातीलाच जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना धारेवर धरले. पहिल्याच बैठकीला ही परिस्थिती असल्याने नाराजी होती. या वेळी शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके आणि भाजपाचे गटनेते शरद बुट्टे यांनी या घटनेचा निषेध नोंदविला पाणीटंचाईसारख्या गंभीर प्रश्नावर अधिकारी वर्ग गैरहजर राहत असतील, तर अधिकाऱ्यांना पाणीटंचाईचे गांभीर्य नाही का, असा प्रश्न उपस्थित केला.