शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

टँकर, चारा छावण्या सुरू करा

By admin | Updated: April 25, 2017 03:48 IST

इंदापूर तालुक्याचे हक्काचे पाणी मिळावे, ३५ गावांना पाण्याचे टँकर सुरू व्हावेत, जनावरांसाठी चारा आणि चारा छावण्या सुरू झाल्या पाहिजेत

इंदापूर : इंदापूर तालुक्याचे हक्काचे पाणी मिळावे, ३५ गावांना पाण्याचे टँकर सुरू व्हावेत, जनावरांसाठी चारा आणि चारा छावण्या सुरू झाल्या पाहिजेत आदी महत्त्वाच्या मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी (दि. २ मे) तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा महामोर्चा काढणार असल्याची माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.पाटील म्हणाले, की भाटघर, खडकवासला या धरणांतील इंदापूरकरांच्या हक्काचे पाणी त्यांना मिळालेच पाहिजे. नीरा डावा कालव्याचे आवर्तन मिळाले पाहिजे. या वर्षी उजनी धरण ११० टक्के भरलेले असताना अमाप पाणी सोडण्यात आल्याने सध्या धरणाची पातळी शून्यावर आली आहे. तालुक्यातील उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील गावांना उचल पाण्याचा हक्क अबाधित राहिला पाहिजे. तालुक्यातील ३५ टंचाईग्रस्त गावांत टँकर सुरू झाला पाहिजे. जनावरांसाठी पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे. चारा छावण्या सुरू झाल्या पाहिजेत, अशा येथील शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. भाटघर व खडकवासला धरणांतून इंदापूर तालुक्यासाठी मिळणारे हक्काचे पाणी दुसऱ्या बारामती व दौंड तालुक्यांनी पळविले. त्यामुळे तिकडे हिरवळ, तर इकडे वाळवंट अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खडकवासला, भाटघर व नीरा डावा कालव्याचे आवर्तन मिळणे गरजेचे होते. खडकवासला व भाटघर धरणे पावसाळ्यात दोन वेळा भरली. उजनी ११० टक्के भरले होते. सध्या भाटघर धरण ४५ टक्के व खडकवासला धरण ३५ टक्के पाणीसाठा आहे. उजनी धरण मात्र झपाट्याने कोरडे होत आहे.कालवा सल्लागार समितीमध्ये प्रत्येक तालुक्याचा लोकप्रतिनिधी असतो. त्याने पाण्याचे नियोजन करणे गरजेचे असते. दौंड तालुक्यातील तलाव भरले आहेत. इंदापूर तालुक्यातील स्थिती विदारक आहे. तालुक्यातील तरंगवाडी तलावापासून मदनवाडी तलावापर्यंत २२ तलावांत पाणी सोडले गेले नाही. तरंगवाडी तलाव हा इंदापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी आरक्षित केला आहे. या तलावावरून गोखळी, गलांडवाडी, तरंगवाडी, झगडेवाडी आदी गावांच्या नळ पाणीपुरवठा योजना आहेत. अशी वस्तुस्थिती असताना अद्याप तलावात पाणी सोडण्यात आलेले नाही. उलट, इंदापूर नगर परिषदेला तरंगवाडी तलावातील पाण्याची गरज नसल्याचे पत्र पाटबंधारे विभागाने मागितले आहे. सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पाटील यांनी केले.