शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

टँकर, चारा छावण्या सुरू करा

By admin | Updated: April 25, 2017 03:48 IST

इंदापूर तालुक्याचे हक्काचे पाणी मिळावे, ३५ गावांना पाण्याचे टँकर सुरू व्हावेत, जनावरांसाठी चारा आणि चारा छावण्या सुरू झाल्या पाहिजेत

इंदापूर : इंदापूर तालुक्याचे हक्काचे पाणी मिळावे, ३५ गावांना पाण्याचे टँकर सुरू व्हावेत, जनावरांसाठी चारा आणि चारा छावण्या सुरू झाल्या पाहिजेत आदी महत्त्वाच्या मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी (दि. २ मे) तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा महामोर्चा काढणार असल्याची माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.पाटील म्हणाले, की भाटघर, खडकवासला या धरणांतील इंदापूरकरांच्या हक्काचे पाणी त्यांना मिळालेच पाहिजे. नीरा डावा कालव्याचे आवर्तन मिळाले पाहिजे. या वर्षी उजनी धरण ११० टक्के भरलेले असताना अमाप पाणी सोडण्यात आल्याने सध्या धरणाची पातळी शून्यावर आली आहे. तालुक्यातील उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील गावांना उचल पाण्याचा हक्क अबाधित राहिला पाहिजे. तालुक्यातील ३५ टंचाईग्रस्त गावांत टँकर सुरू झाला पाहिजे. जनावरांसाठी पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे. चारा छावण्या सुरू झाल्या पाहिजेत, अशा येथील शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. भाटघर व खडकवासला धरणांतून इंदापूर तालुक्यासाठी मिळणारे हक्काचे पाणी दुसऱ्या बारामती व दौंड तालुक्यांनी पळविले. त्यामुळे तिकडे हिरवळ, तर इकडे वाळवंट अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खडकवासला, भाटघर व नीरा डावा कालव्याचे आवर्तन मिळणे गरजेचे होते. खडकवासला व भाटघर धरणे पावसाळ्यात दोन वेळा भरली. उजनी ११० टक्के भरले होते. सध्या भाटघर धरण ४५ टक्के व खडकवासला धरण ३५ टक्के पाणीसाठा आहे. उजनी धरण मात्र झपाट्याने कोरडे होत आहे.कालवा सल्लागार समितीमध्ये प्रत्येक तालुक्याचा लोकप्रतिनिधी असतो. त्याने पाण्याचे नियोजन करणे गरजेचे असते. दौंड तालुक्यातील तलाव भरले आहेत. इंदापूर तालुक्यातील स्थिती विदारक आहे. तालुक्यातील तरंगवाडी तलावापासून मदनवाडी तलावापर्यंत २२ तलावांत पाणी सोडले गेले नाही. तरंगवाडी तलाव हा इंदापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी आरक्षित केला आहे. या तलावावरून गोखळी, गलांडवाडी, तरंगवाडी, झगडेवाडी आदी गावांच्या नळ पाणीपुरवठा योजना आहेत. अशी वस्तुस्थिती असताना अद्याप तलावात पाणी सोडण्यात आलेले नाही. उलट, इंदापूर नगर परिषदेला तरंगवाडी तलावातील पाण्याची गरज नसल्याचे पत्र पाटबंधारे विभागाने मागितले आहे. सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पाटील यांनी केले.