शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

ऑलनाइन शाळा सुरू; पण पुस्तके ऑफलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात १५ तारखेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र, अद्यापही ग्रामीण भागातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यात १५ तारखेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र, अद्यापही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचा पुरवठा झालेला नाही. यामुळे आम्ही शिकायचे कसे? असा प्रश्न विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांनी उपस्थित केला आहे. शिक्षण विभागाने यंदा बालभारतीकडे ४ लाख २८ हजार ४४७ विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांच्या संचाची मागणी नोंदवली आहे. शाळा सुरू होऊन चार दिवस उलटूनही पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेली नाहीत.

जिल्ह्यात ऑनलाइन पद्धतीने शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. जवळपास २ लाख ८ हजार ६१० विद्यार्थ्यांचा ऑनलाइनसाठी एकूण पटसंख्या आहे. त्यातील १ लाख ३९ हजार ४६६ विद्यार्थी हे ऑनलाइन शिक्षणाचा लाभ घेत आहेत. यावर्षी १ ते ३ व ८ वीची एकूण ४ लाख २८ हजार ४४७ विद्यार्थी आहेत. सर्व शिक्षा अभियानांअतर्गत दरवर्षी मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात येते. गेल्या वर्षीपासून विद्यार्थ्यांच्या खात्यात पुस्तकांसाठी पेसे जमा करावे, असे नियोजन होते. मात्र, कोरोनामुळे ते शक्य होऊ शकले नाही. परिणामी जुन्याच पद्धतीने पुस्तके वाटली गेली. ४ लाख ३१ हजार ८५९ विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या संचाचे वाटप हे गेल्यावर्षी करण्यात आले होते. कोरोनामुळे ही पुस्तके शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्याचे प्रत्यक्ष वाटप केले होते. याही वर्षी कोरोनामुळे घरपोच पुस्तकांचे वाटप करण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन होते. विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार बालभारतीकडे ऑनलाइन पद्धतीने ४ लाख २८ हजार ४४७ पुस्तकांच्या संचाची मागणी करण्यात आली. मात्र, शाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांना पुस्तके मिळू शकली नाही. दरम्यान, गेल्यावर्षी पुस्तके मिळालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची जुने पुस्तके गरजू विद्यार्थ्यांना देण्याचे आवाहन करण्यात आले होते. याला काही प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, बालभारतीकडून पुस्तके कधी मिळणार याची प्रतीक्षा शिक्षण विभागाला लागली आहे.

चौकट

पुस्तकांच्या छपाईसाठी लागणाऱ्या कागदाचा अपुरा पुरवठा असल्याने छपाईस अडथळा आला होता. यामुळे मागणीच्या तुलनेत पुस्तके छापण्यात आली नव्हती. हे प्रकरण न्यायालयातही गेले होते. मात्र, आता कागदाची उपलब्धता झाली आहे. यामुळे लवकरच ती छापून मुलांना ती वितरित केली जाईल, असे बालभारतीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

चौकट

कोरोनाचा प्रादुर्भाव आणि बालभारतीच्या छपाईला होत असलेल्या विलंब झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन शाळा सुरू होण्यापूर्वी जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील शाळातील विद्यार्थ्यांकडून जुनी पुस्तके जमा करून घ्यावीत, तसेच जमा करून घेतलेले संच विद्यार्थ्यांना वाटप करा, अशा सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थी गेल्या शैक्षणिक वर्षात वाटप केलेल्या पुस्तकांपैकी केवळ पाच ते सहा टक्केच पुस्तके परत आली आहेत. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यी पुस्तकाविनाच शिक्षण घेत आहेत. बालभारतीकडे मराठी विषयाचे ४ लाख ८ हजार ५३४ पुस्तकांचा संचाची मागणी करण्यात आली. हिंदी २ हजार ९०९, इंग्रजी १२ हजार ६८, उर्दू ४ हजार ८०८, तमिळ १२८ संचाची मागणी करण्यात आली आहे.

कोट

बालभारतीकडे आम्ही तालुकानिहाय विद्यार्थी संख्येनुसार ऑनलाईन पद्धतीने मागणी करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पुस्तके मिळाल्यानंतर ही विद्यार्थ्यांना वितरित केले जाईल.

-स्मिता गौड, शिक्षणाधिकारी