शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कावळ्यांचे काटक्यांऐवजी तारांचे घरटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 02:12 IST

एप्रिल ते जून महिन्यादरम्यान कावळ्यांची प्रजनन प्रक्रिया सुरू असते अर्थात त्यांच्यासाठी हा विणीचा काळ असतो. या काळात कावळ्याची मादी घरटे तयार करून अंडी घालत असते.

रहाटणी : एप्रिल ते जून महिन्यादरम्यान कावळ्यांची प्रजनन प्रक्रिया सुरू असते अर्थात त्यांच्यासाठी हा विणीचा काळ असतो. या काळात कावळ्याची मादी घरटे तयार करून अंडी घालत असते. पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरात झाडांवर कावळ्यांची काही घरटी आहेत. त्यांतील काही लोखंडी तारांपासून तयार केली आहेत. गवताच्या काड्या आणि काटक्या न मिळाल्याने कावळ्यांनी मिळेल त्यापासून घरटे बनविल्याचे दिसून येते.पोटाची खळगी भरण्यासाठी रात्रंदिवस राबणाऱ्या माणसाचे जगणे कधी यंत्रासारखे झाले हे कळलेच नाही. पोटाची चिंता मिटली, की घराची चिंता सतावते. त्यातूनच शहरांचा उदय झाला. त्याची महानगरे झाली. याचा फटका मुक्या जिवांना बसला. त्यांचे खाद्य बदलले, निवाºयाचा प्रश्न उपस्थित झाला. माणूस झोपडीतून काँक्रीटच्या घरात आला.शेतीचे क्षेत्र कमी झाले आणि काँक्रीटचे जंगल वाढू लागले. पशू-पक्षीही त्यात हरवले. या काँक्रीटच्या जंगलात आपले घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यासाठी पै-पै जमा केली जाते. पक्षीही अशाच पद्धतीने घरटे साकारतात. अडचणींवर मात करीत कावळ्यांनी तारांचा वापर करून घरटे तयार केले आहे. सिमेंटच्या या जंगलात जणू माझेही पक्के घरटे आहे, असाच संदेश कावळा देत असावा.छोटेखानी का होईना मात्र आपल्या हक्काचे एक घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. पक्षीही असेच स्वप्न बाळगतात आणि पूर्णही करतात. घरटे तयार करण्यातील त्यांचे कसब पाहून त्यांना निसर्गातील वास्तुविशारद म्हणतात. कावळा त्यांपैकीच एक. गवताच्या काड्या, काटक्यांपासून घरटे बनवून त्यात कापूस ठेवून कावळा घराचे स्वप्न पूर्ण करतो. उंच झाडावर गवताच्या काड्या आणि काटक्यांनी बनविलेले घरटे आपल्या नजरेस येते. मात्र शहरात काटक्या मिळत नसल्याने कावळ्यांना लोखंडी तारांनी घरटे बनविण्याची वेळ आली आहे.जमिनीला सोन्याचा भाव आल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील जमीनमालकांनी जमिनी विकण्याचा सपाटा लावला आहे. जागा मिळेल तेथे गगनचुंबी इमारती उभारण्यात येत आहेत. त्यामुळे शहरातील पक्ष्यांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. पक्ष्यांना दाना-पाणी मिळत नसल्याने अनेक पक्षी शहरातून स्थलांतरित झाले आहेत. मात्र आहे त्या पक्ष्यांना त्यांच्या अन्नासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. घरट्यासाठी माणसांप्रमाणे त्यांनाही झगडावे लागत आहे. पक्ष्यांना घरटे बनविण्यासाठी गवताच्या काड्या किंवा काटक्या आवश्यक असतात. मात्र, शहरात शेती शिल्लक राहिली नाही. त्यामुळे गवत आणि काटक्या उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे पक्ष्यांनाही घरटे बनविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी त्यांनीही बदलत्या युगाबरोबर बदलण्याचे ठरविले की काय असे वाटत आहे. कारण कावळे सध्या काटक्यांनी नव्हे, तर लोखंडी तारांनी आपले घरटे बनवीत आहेत. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने घरटे तयार करण्यासाठी त्यांची धावपळ सुरू असल्याचे दिसून येत आहे.काही दशकांपूर्वी शेतकरी कावळ्याच्या घरट्यावरून पावसाचा अंदाज लावीत असत. जर कावळ्याचे घरटे झाडाच्या टोकाला असेल, तर त्या वर्षी पाऊस कमी होणार व घरटे झाडाच्या मध्यभागी असेल तर पाऊस भरपूर होणार, असे ठरविले जात असे. त्यानुसार शेतकरी हंगामाचे नियोजन करीत असत. मात्र शेती कमी झाली आणि झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली. त्यामुळे घरटे तयार करण्यासाठी कावळ्यांची मोठी अडचण निर्माण झाली.