शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

मेट्रो, महापालिकांसह सरकारी कार्यालयांना भरावे लागेल मुद्रांक शुल्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात मेट्रोसारख्या खासगी संस्था व सर्व महापालिका, एमएमआरडीए, सर्व जिल्हा परिषदांसह सर्व सरकारी कार्यालये, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यात मेट्रोसारख्या खासगी संस्था व सर्व महापालिका, एमएमआरडीए, सर्व जिल्हा परिषदांसह सर्व सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती या सर्वांनाच यापुढे विविध विकासकामांसाठी खासगी ठेकेदारांबरोबर होणाऱ्या करारांवर मुद्रांक शुल्क भरावा लागेल. ठेकेदारांसोबतच्या सर्व करारांवर संबंधित संस्थेला ०.१ टक्के अथवा जास्तीत जास्त २५ लाखांपर्यंत मुद्रांक शुल्क भरावा लागणार आहे.

राज्यात सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, विविध शासकीय कार्यालये, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंचन विभाग आदींकडून दरवर्षी हजारो कोटी रुपयांची विकासकामे केली जातात. निविदा काढून खासगी ठेकेदारांना ही विकासकामे दिली जातात. ठेकेदारांना ही कामे देताना संबंधित संस्था करार करतात. बहुतेकदा हे करार केवळ शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर केले जातात. यापुढे सर्व प्रकारच्या करारांवर मुद्रांक शुल्क भरावे लागेल. या करारांसाठी किती मुद्रांक शुल्क आकारावे याबाबत मतभेद होते. त्यामुळे अनेक शासकीय संस्थांकडून हे मुद्रांक शुल्क बुडविण्यात येत होते. त्यातून राज्य सरकारचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे समोर आले होते.

या संदर्भात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने या सर्व करारांवर मुद्रांक शुल्क आकारण्याचा प्रस्ताव दिला होता. शासनाने तो प्रस्ताव मंजूर केला. शासनाच्या महसूल विभागाचे कार्यसन अधिकारी प्रितमकुमार जावळे यांनी नुकतेच याबाबतचे आदेश काढले. राज्य सरकारच्या संबंधित विभाग, महापालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायती यांनी विकास कामांसंदर्भात ठेकेदारांबरोबर केलेल्या करारपत्रांवर यापुढे ०.१ टक्का मुद्रांक शुल्क बंधनकारक करण्यात आले आहे.

चौकट

शासनाच्या महसुलात दोन हजार कोटींची भर पडणार

स्थानिक स्वराज्य संस्था तसेच शासकीय, निमशासकीय संस्थांकडून दरवर्षी हजारो कोटी रुपयांची विकासकामे होतात. यासाठी स्थानिक ठेकेदारांसह देश-विदेशातील व्यक्ती, संस्थांसोबत करार होतात. या सर्व करारांवर मुद्रांक शुल्क भरावा लागेल. त्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने शासकीय संस्थांकडून अशा करारांची माहिती मागविण्यास सुरुवात केली आहे. तर ज्या ठेकेदारांना ही कामे मिळली त्यांच्याकडून मुद्रांक शुल्काची वसुली चालू केली आहे. यामुळे शासनाच्या महसुलात दोन हजार कोटी रुपयांची भर पडण्याचा अंदाज आहे.