शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण होणार नवीन पोलिस महासंचालक?; सदानंद दाते यांच्या नावाची चर्चा, केंद्राकडे नावे पाठवली
2
अनंतच्या अनैतिक संबंधाची खात्री झाल्याने ‘ती’  खचली; एकदा अचानक आई वडील घरी पोहचले, तेव्हा...
3
‘टीईटी’चा पेपर ३ लाखांत, शिक्षकांची टोळीच जेरबंद; कोल्हापुरात शिक्षकी पेशाला काळीमा
4
बिना ड्रायव्हरच्या कारपेक्षा त्याची टेक्नॉलॉजी भारतासाठी महत्त्वाची; इस्रायली उद्योगपतींशी चर्चा
5
पाक खोटे बोलतोय...फ्रान्सने केला पर्दाफाश; जगाकडूनही खावी लागली चपराक, काय केला खोटा दावा?
6
कमळावर जाे उभा त्याला मतदान करा; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वबळाचे संकेत?
7
मुंबईत तब्बल ११ लाख दुबार नावे आढळली; मतदार याद्यांमध्ये प्रचंड घाेळ, BMC कडे तक्रारींचा पाऊस
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

बदलत्या हवामानामुळे डाळिंबावर डाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:08 IST

टाकळी हाजी: खराब हवामानामुळे हवेतील आर्द्रता वाढल्याने डाळिंबावर डाग येण्याचे प्रमाण वाढू आले आहे. अशा फळांमुळे बाजार कमी ...

टाकळी हाजी: खराब हवामानामुळे हवेतील आर्द्रता वाढल्याने डाळिंबावर डाग येण्याचे प्रमाण वाढू आले आहे. अशा फळांमुळे बाजार कमी झाला असून अपेक्षित असे दरसुद्ध मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे बेट भागातील उत्पादक चिंताग्रस्त झाले आहेत.

शिरूर तालुक्यातील बेटभागात टाकळी हाजी , कवठे येमाई , मलठण ,वडनेर, फाकटे , चांडोह ,जांबूत , निमगाव दूडे , रावडेवाडी , आमदाबाद, अण्णापूर या गावांमध्ये बहुतांश प्रमाणात डाळिंबाच्या बागा आहेत.

डाळिंब पिकासाठी नऊ महिने काळजी घ्यावी लागते. साधारणपणे चारशे ते पाचशे रुपये प्रति झाडास खर्च केल्यास उत्पादन चांगले मिळते. या भागातील बहुतेक माल निर्यात केला जातो. सध्या बऱ्याच मालाची विक्री झाली असून ज्या बागा शिल्लक आहेत त्यांची फळे तोडणीस आली आहे.

गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे डाळिंबाला चांगला भाव मिळाला नाही. त्यात अनेक बागा तेल्या रोगामुळे काढण्यात आल्या आहेत. याशिवाय बदलत्या हवामानाचाही फटकाही बसत आहे. हवेतील आर्द्रता वाढल्याने फळांवर डाग पडले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून फळांचा दर्जा चांगला असला, तरी दर देत नाहीत. त्यामुळे उत्पादकांच्या चिंतेत भर पडली आहे. कारण डाळिंब विक्रीतून उत्पादन खर्चही बाहेर पडत नसल्याने शेतकऱ्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनी बाजारभावाचा अंदाज घेऊनच व्यवहार करावेत असे डाळिंब मार्गदर्शक कैलास गावडे, योगेश हिलाल ,बाळासाहेब खटाटे,यांनी सांगितले.

व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन टाकळी हाजीचे डाळिंब उत्पादक विक्रम घोडे,संतोष गावडे, योगेश हिलाळ,नारायण कांदळकर, राहुल रसाळ,शहाजी सोदक,नितीन थोरात यांनी केले आहे.

३० टाकळी हाजी