शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेले चौपदरीकरण होणार सुरू

By admin | Updated: June 11, 2015 06:05 IST

बारामती-फलटण-लोणंद-शिरवळमार्गे बंगरुळू महामार्गाला जोडणाऱ्या राज्य मार्गाचे चौपदरीकरण मागील ५ वर्षांपासून रखडले आहे.

महेंद्र कांबळे, बारामतीबारामती-फलटण-लोणंद-शिरवळमार्गे बंगरुळू महामार्गाला जोडणाऱ्या राज्य मार्गाचे चौपदरीकरण मागील ५ वर्षांपासून रखडले आहे. रीतसर भूसंपादन प्रक्रिया पार पडली नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी कोर्टात धाव घेतली. ठेकेदाराने दिरंगाई झाल्यामुळे राज्य शासनाकडेच नुकसान भरपाई मागितली. आता नुकसान भरपाई देऊन वाढीव खर्चासह या मार्गाचे काम येत्या महिनाभरात सुरू होईल, असा अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुणे विभागाच्या देखरेखीत आयव्हीआरसीएफ या कंपनीला बीओटी तत्त्वावर २०१० साली हे काम देण्यात आले. त्यामुळे बारामती थेट या रस्त्याच्या माध्यमातून दक्षिण भारताला जोडली जाणार आहे. ७७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी एकत्रित प्रकल्प खर्च ३८२ कोटी रुपये अपेक्षित होता. परंतु, भूसंपादन करण्याच्या किचकट प्रक्रियेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरुवातीला तडजोडीने जागा संपादित केल्या. मात्र, फलटण, लोणंद, बारामती परिसरातील शेतकऱ्यांनी त्यासाठी देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईची रक्कम कमी आहे. त्यामध्ये वाढ करावी, अशी मागणी केली. त्याची पूर्तता झाली नाही. भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांचा विरोध वाढला. काम थांबले. या स्थितीत ५ वर्षांपासून रस्त्याचे काम ५० टक्के रखडले आहे. परंतु, हा रस्ता सद्य:स्थितीला दररोज अपघातांना निमंत्रण देणारा ठरला आहे. मध्यंतरी पॅचवर्कसाठी ३ कोटी रुपयांचे काम करण्यात आले. परंतु, रस्त्याची अवस्था ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे शासनाने तातडीने हा रस्ता पूर्ण करणे गरजेचे आहे. दरम्यान, या संदर्भात विधान परिषद अध्यक्ष रामराजे निंबाळकर, सहकार व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत अधिकाऱ्यांची बैठक मागील आठवड्यात मंत्रालयात झाली. ठेकेदाराने मागितलेली भरपाईची ८९ कोटी रुपयांची रक्कम देऊन वाढीव खर्चासह काम सुरू करण्याची चर्चा झाली आहे. या संदर्भात माहिती देताना पुणे विभागाचे कार्यकारी अभियंता ए. टी. धोंडगे यांनी सांगितले, की प्रक्रिया पार पाडताना विलंब झाला. त्याचबरोबर काही शेतकरी सरकारच्या विरोधात न्यायालयात गेले. त्यामुळे प्रकल्पाचा खर्च वाढला. तो वाढीव खर्च ठेकेदाराने मागितला. ७७ किलोमीटरपैकी ४८ किलोमीटरचे काम झाले आहे. सार्वजनिक बांधकाममंत्र्यांच्या उपस्थित निर्णय झाल्याने येत्या काही दिवसांत ठेकेदाराची ८९ कोटी रुपये भरपाई देण्यात येईल. त्यानंतर जुलै महिन्यात रस्त्याचे काम सुरू होण्याची अपेक्षा आहे. साधारणत: १ ते दीड वर्षात काम पूर्ण करण्यात येईल.