शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

एसटी प्रवासी ताटकळत!

By admin | Updated: April 25, 2016 02:22 IST

गाड्या कधीच वेळेवर सुटत नाहीत. अपुऱ्या व खराब गाड्या असल्याने वेळेवर पोहोचत नाहीत. अनेक गावांना बऱ्याचदा गाड्याच जात नाहीत. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत बसावे लागते.

भोर : गाड्या कधीच वेळेवर सुटत नाहीत. अपुऱ्या व खराब गाड्या असल्याने वेळेवर पोहोचत नाहीत. अनेक गावांना बऱ्याचदा गाड्याच जात नाहीत. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत बसावे लागते. अपुरे कर्मचारी, सोयीसुविधांचा अभाव, प्रशासन व संघटनेत समन्वयाचा अभाव यामुळे अवैध वाहतुकीत वाढ होऊन भोर आगाराची एसटी सेवा कोलमडली आहे. मागील महिनाभरापासून भोर एसटी आगाराकडून गाड्या वेळेवर सुटत नसल्याने वेळेवर पोहोचत नाहीत. पास देण्यासाठी विलंब होतो. कापूरव्होळ ते चेलाडीसह (नसरापूर) इतरत्र थांबणाऱ्या गाड्या कधीच वेळेवर येत नाहीत. विनावाहक गाडीत बसल्यावर तिकीट काढले जात नाही. त्यामुळेही गाड्या उशिराने धावत असल्याने गाड्यांचा काहीच फायदा होत नाही. भोरवरून जाणारी गाडी स्वारगेटला सातारा रोडने जाण्याऐवजी मार्केट यार्डाकडून जात असल्याने प्रवाशांचा वेळ व पैसा अधिक जात होता. याबाबत तक्रारी करूनही सुधारणा होत नसल्याने प्रवासी संघटनेने १९ फेब्रुवारीला एसटी गाड्या रोखून धरल्या होत्या. त्या वेळी प्रशासनाला जाग आली आणि विविध मागण्यांबाबतची आश्वासने देऊन आंदोलन थांबवले. मात्र, प्रवाशांच्या सुखसोयीकडे दुर्लक्ष झाल्यास पुन्हा आंदोलन होऊ शकते. अगोदरच लांबच्या फेऱ्या कमी, दुर्गम डोंगरी गावांमुळे अंतर अधिक व ग्रामीण भागात प्रवाशांची कमी संख्या त्याचबरोबर महामार्गावर महिन्याला टोलसाठी लागणारे १० ते ११ लाख रुपये यामुळे भोर एसटी आगाराला दिवसाला सुमारे ४० हजारांचा, तर महिन्याला १२ लाख ८ हजारांचा तोटा सहन करावा लागतो. प्रशासन व एसटी संघटना यांच्यात समन्वय राहिला नाही तर यात वाढ होऊ शकते. एसटी आगारात १४८ चालक व १२६ वाहक असून, ४ क्लार्क, ४ कंट्रोलर, ४ लेखनिक, २२ वाहक कमी आहेत. त्यामुळे असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर जादा कामाचा ताण येतो. आगारातील ६८ गाड्यांपैकी निम्म्यापेक्षा अधिक गाड्या खराब आहेत. वारंवार नादुरुस्त होतात. बसण्याची आसने खराब, काचा तुटलेल्या, सुखसुविधांचा अभाव, वेळेचे नियोजन नाही. यामुळे अनेकदा लहान-मोठे अपघात घडतात. गाड्या रस्त्यात बंद पडत असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करतात. नवीन गाड्या देण्याबरोबरच कर्मचारी भरती करणे, प्रवाशांना वेळेवर गाड्या सोडणे, सुखसुविधा देणे याकडेही एसटी महामंडळाने लक्ष देण्याची खरी गरज आहे. मात्र, प्रशासनाच्या सावळा गोंधळामुळे भोर आगारातील एसटी सेवा कोलमडली आहे.