शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांशी थेट संपर्क असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच एसटीची मदत, अन्य कर्मचारी वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : प्रवाशांशी थेट संपर्कात येऊन एसटी कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना एसटी महामंडळ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : प्रवाशांशी थेट संपर्कात येऊन एसटी कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना एसटी महामंडळ आर्थिक मदत करीत आहे. पण महामंडळातील अन्य विभागातील कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर त्यांच्या कुटुंबीयांना मात्र कोणतीही आर्थिक मदत केली जात नाही. एसटीच्या या निकषामुळे अनेक कुटुंबीये मदतीपासून वंचित राहत असल्याने एसटी प्रशासनाने आपल्या निकषात बदल करावा, अशी मागणी होत आहे.

राज्य परिवहन महामंडळाचे आतापर्यंत जवळपास ८५०० कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. तर यातील २५७ कर्मचारी मृत झालेले आहे. यातील केवळ ११ कर्मचाऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत केली आहे. उरलेले कर्मचारी हे महामंडळाच्या निकषात बसत नसल्याने त्यांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. हा एक प्रकारे कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा असल्याची भावना कर्मचारी व वारसांमध्ये निर्माण होत आहे.

एसटीने काढलेल्या

परिपत्रकात प्रवाशांची प्रत्यक्ष संपर्कात येणारे चालक-वाहक, स्थानकावरील काम करणारे वाहतूक नियंत्रक तसेच सुरक्षारक्षक हे साहाय्य मिळण्यासाठी पात्र ठरतील असे नमूद करण्यात आलेले आहे. खरे तर चालक, वाहक ज्या वेळी कामगिरीवरून आगारात येतात. त्या वेळी वाहकांचा संपर्क रोकड शाखेतील कर्मचाऱ्यांशी येतो, तसेच चालकांचा संपर्क कार्यशाळेतील यांत्रिक कर्मचाऱ्यांची येतो. याशिवाय आगार व्यवस्थापक, चालक व वाहकांची कामगिरी लावणारे पर्यवेक्षक तसेच इतर कर्मचारी यांचा संबंध येतो. त्याचप्रमाणे विभागीय कार्यालय, विभागीय कार्यशाळा,मध्यवर्ती कार्यालय व एसटी महामंडळाची इतर सर्व कार्यालये या ठिकाणीसुद्धा कामगिरीवर येणारे कर्मचारी पर्यवेक्षक अधिकारी बस, रेल्वे व इतर वाहनातून कामगिरीवर येतात. त्यामुळे त्या सर्वांचा हस्ते परहस्ते इतर नागरिकांची संपर्क येतो व त्यामुळे सुद्धा बरेच कर्मचारी व अधिकारी कोरोना बाधित होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे. तेव्हा थेट प्रवाशांच्याच संपर्कात येऊन मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांनाच मदत करणे हा निकष बदलणे गरजेचे आहे.

------------------------

बहुतांशी कर्मचाऱ्यांच्या वारसांना कोणताही आर्थिक लाभ मिळाला नाही. त्यांच्या वारसांनासुद्धा अनुकंपा तत्त्वावरील नोकरी मिळालेल्या नाहीत. कर्मचाऱ्यांच्या वारसाला नियम अटी व निकष बदलून एक वेगळा पर्याय म्हणून तत्काळ पात्रतेनुसार नोकऱ्या देण्यात याव्यात.

- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस