शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

प्रवाशांशी थेट संपर्क असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच एसटीची मदत, अन्य कर्मचारी वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : प्रवाशांशी थेट संपर्कात येऊन एसटी कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना एसटी महामंडळ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : प्रवाशांशी थेट संपर्कात येऊन एसटी कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना एसटी महामंडळ आर्थिक मदत करीत आहे. पण महामंडळातील अन्य विभागातील कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर त्यांच्या कुटुंबीयांना मात्र कोणतीही आर्थिक मदत केली जात नाही. एसटीच्या या निकषामुळे अनेक कुटुंबीये मदतीपासून वंचित राहत असल्याने एसटी प्रशासनाने आपल्या निकषात बदल करावा, अशी मागणी होत आहे.

राज्य परिवहन महामंडळाचे आतापर्यंत जवळपास ८५०० कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. तर यातील २५७ कर्मचारी मृत झालेले आहे. यातील केवळ ११ कर्मचाऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत केली आहे. उरलेले कर्मचारी हे महामंडळाच्या निकषात बसत नसल्याने त्यांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. हा एक प्रकारे कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा असल्याची भावना कर्मचारी व वारसांमध्ये निर्माण होत आहे.

एसटीने काढलेल्या

परिपत्रकात प्रवाशांची प्रत्यक्ष संपर्कात येणारे चालक-वाहक, स्थानकावरील काम करणारे वाहतूक नियंत्रक तसेच सुरक्षारक्षक हे साहाय्य मिळण्यासाठी पात्र ठरतील असे नमूद करण्यात आलेले आहे. खरे तर चालक, वाहक ज्या वेळी कामगिरीवरून आगारात येतात. त्या वेळी वाहकांचा संपर्क रोकड शाखेतील कर्मचाऱ्यांशी येतो, तसेच चालकांचा संपर्क कार्यशाळेतील यांत्रिक कर्मचाऱ्यांची येतो. याशिवाय आगार व्यवस्थापक, चालक व वाहकांची कामगिरी लावणारे पर्यवेक्षक तसेच इतर कर्मचारी यांचा संबंध येतो. त्याचप्रमाणे विभागीय कार्यालय, विभागीय कार्यशाळा,मध्यवर्ती कार्यालय व एसटी महामंडळाची इतर सर्व कार्यालये या ठिकाणीसुद्धा कामगिरीवर येणारे कर्मचारी पर्यवेक्षक अधिकारी बस, रेल्वे व इतर वाहनातून कामगिरीवर येतात. त्यामुळे त्या सर्वांचा हस्ते परहस्ते इतर नागरिकांची संपर्क येतो व त्यामुळे सुद्धा बरेच कर्मचारी व अधिकारी कोरोना बाधित होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे. तेव्हा थेट प्रवाशांच्याच संपर्कात येऊन मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांनाच मदत करणे हा निकष बदलणे गरजेचे आहे.

------------------------

बहुतांशी कर्मचाऱ्यांच्या वारसांना कोणताही आर्थिक लाभ मिळाला नाही. त्यांच्या वारसांनासुद्धा अनुकंपा तत्त्वावरील नोकरी मिळालेल्या नाहीत. कर्मचाऱ्यांच्या वारसाला नियम अटी व निकष बदलून एक वेगळा पर्याय म्हणून तत्काळ पात्रतेनुसार नोकऱ्या देण्यात याव्यात.

- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस