शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

एसआरएची साह्य समिती रद्द

By admin | Updated: October 29, 2016 04:35 IST

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आर्किटेक्टकडून धमकावल्याच्या प्रकाराची पालकमंत्र्यांनी शुक्रवारी गंभीर दखल घेऊन कारवाईचा

पुणे : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आर्किटेक्टकडून धमकावल्याच्या प्रकाराची पालकमंत्र्यांनी शुक्रवारी गंभीर दखल घेऊन कारवाईचा इशारा दिला असल्याच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी अचानक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील एसआरएची साह्य समिती रद्द करण्याचे आदेश नगरविकास मंत्रालयातून काढण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.पुणे शहरात ४८६ झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्ट्यांचे रूप पालटण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) राबविली जात आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवड क्षेत्रासाठी झोपडपटटी पुनर्वसन प्राधिकरण निर्माण करण्यात आले आहे. शहरातील मोक्याच्या जागांवर असलेल्या झोपड्यांचे पुनर्वसन करण्याचा महत्त्वाचा विषय असल्याने या प्राधिकरणाचे अध्यक्षपद मुख्यमंत्र्यांकडे ठेवण्यात आले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना याचे अध्यक्षपद मुख्यमंत्र्यांकडे असावे की पालकमंत्र्यांकडे, यावरून बराच गदारोळ झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना याचे पदसिद्ध अध्यक्षपद देण्यात आले होते. त्याचबरोबर, प्राधिकरणाला मार्गदर्शन करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १७ जानेवारी २०१६ रोजी साह्य समिती गठित करण्यात आली. या समितीत पालकमंत्र्यांसह पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील लोकसभा सदस्य, विधानसभा सदस्य, पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे महापौर आणि आयुक्त, विधान परिषद सदस्य आणि पोलीस आयुक्त आदी सदस्यांचा समावेश होता.शुक्रवारी मुंबईमध्ये एसआरएबाबत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर अचानक साह्य समितीच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी एसआरएच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना झालेली दमदाटी, या प्रकरणामध्ये पालकमंत्र्यांनी घातलेले लक्ष या पार्श्वभूमीवर सायंकाळी साह्य समितीच रद्द करण्याचा निर्णय झाल्याने विविध तर्कविर्तक लढविण्यात येत आहेत.(प्रतिनिधी)२००६ मध्ये झाली होती स्थापनासाह्य समितीची स्थापना २००६मध्ये झाल्यानंतर प्रत्यक्षात या समितीच्या खूपच कमी बैठका झाल्या. एसआरएची नियमावली २०१४मध्ये बदलण्यात आली. त्यानंतर एसआरए प्रकल्पाबाबत अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. जुन्या प्रकल्पांना जुने नियम लागू आहेत की नवीन, यावरून बरेच वाद निर्माण झाले आहेत. यामुळे एसआरएच्या अनेक योजना रखडल्या आहेत. एसआरए प्रकल्पाच्या कामात निर्माण झालेल्या अडचणी सोडविण्यासाठी साह्य समित्यांची भूमिका महत्त्वाची होती. मात्र, समितीकडून प्रत्यक्षात त्यासाठी खूपच कमी प्रयत्न झाले. एसआरएचे रखडलेले प्रकल्प मार्गी लागावेत, यासाठी बांधकाम व्यावसायिकांकडून दबाव वाढत चालला आहे. त्यातून वादविवादाचे प्रसंग निर्माण होत आहेत.