शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

जलतरण तलावांत पुणेकरांच्या जिवाशी ‘खेळ’

By admin | Updated: April 8, 2015 03:49 IST

एकीकडे उन्हाचा कडाका वाढल्याने; तसेच शाळांना सुट्या लागल्याने पुणेकरांचे पाय जलतरण तलावाकडे वळत आहेत. दुसरीकडे मात्र या जलतरण

पुणे : एकीकडे उन्हाचा कडाका वाढल्याने; तसेच शाळांना सुट्या लागल्याने पुणेकरांचे पाय जलतरण तलावाकडे वळत आहेत. दुसरीकडे मात्र या जलतरण तलावांमध्ये सुरक्षा नियमांची पायमल्ली केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महापालिकेकडून शहरात चालविल्या जाणाऱ्या काही प्रमुख जलतरण तलावांची ‘टीम लोकमत’ने पाहणी केली असता, तलावांच्या ठिकाणी महापालिकेने घालून दिलेले नियम; तसेच सुरक्षा नियमावलीस हरताळ फासला जात असल्याचे समोर आले आहे. शहरात महापालिकेचे २१ तलाव असले, तरी त्याच्या कितीतरी अधिक पटीने खासगी सोसायट्या, हॉटेल्स; तसेच क्लबचे जलतरण तलाव आहेत. या तलावांच्या ठिकाणी सुरक्षा नियम पाळले जातात की नाही, याची तपासणी करणारी कोणतीही यंत्रणा पालिकेकडे नाही. मागील वर्षी महापालिकेच्या; तसेच एका खासगी मालकीच्या जलतरण तलावात दोघांना प्राण गमवावे लागल्यानंतर पालिका प्रशासनाकडून शहरातील जलतरण तलावांचे सेफ्टी आॅडिट करण्यासाठी विशेष समिती नेमली होती. या समितीने महिनाभर शहर पिंजून काढले. सुमारे ३५० तलावांचे सर्वेक्षण केले. त्यात २२५ हून अधिक तलावांमध्ये सुरक्षा साधनांचा अभाव असल्याचा अहवाल समितीने दिला आहे. त्यातील ८० तलावांची सुरक्षाव्यवस्था बिकट असून, त्यांना तत्काळ सुधारणांसाठी नोटिसा बजाविल्या होत्या. तसेच, सुरक्षा साधनांची पूर्तता न केल्यास, तलाव सील करण्याचा निर्णयही घेतला होता. मात्र, पावसाळा सरताच या नोटीसचे पुढे काय झाले, याची माहितीही प्रशासनास नाही.