शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

यात्रा असूनही गावांमध्ये शुकशुकाट

By admin | Updated: April 1, 2017 00:00 IST

आंबेगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात यात्रांचा हंगाम सुरू झाला आहे. ग्रामदैवतांच्या यात्रा पार पडत आहेत

मंचर : आंबेगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात यात्रांचा हंगाम सुरू झाला आहे. ग्रामदैवतांच्या यात्रा पार पडत आहेत. बैलगाडा शर्यतीवर बंदी असल्याने बैलगाडा शर्यतीविना यात्रा पार पडत असल्याने शेतकरीवर्गात नाराजीचा सूर आहे. यात्रेच्या दिवशी शर्यतीच्या घाटात पोलिसांचा फौजफाटा तैनात राहत आहे. यात्रा असूनही गावांमध्ये शुकशुकाट अनुभवायला मिळत आहे.मार्च व एप्रिल या २ महिन्यांत ग्रामीण भागातील गावोगावच्या यात्रा पार पडतात. यात्रांचा हंगाम सुरू झाला आहे. पूर्वी यांत्रामध्ये सर्वत्र महत्त्वाची बैलगाडा शर्यत असायची. मात्र, मागील तीन वर्षांपासून बैलगाडा शर्यतीवर बंदी असल्याने यात्रांमधील उत्साह कमी झाला आहे. आता मुंबईकर, पुणेकर तसेच पाहुणेमंडळी यात्रेसाठी गावाला येण्याचे टाळू लागली आहेत. यात्रा अत्यंत साध्या पद्धतीने साजऱ्या होतात. अखंड हरिनाम सप्ताह, देवजन्माचे कीर्तन, महाप्रसाद एवढेच निवडक कार्यक्रम होतात. एखादा करमणुकीचा कार्यक्रम होऊन यात्रा संपते. बैलगाडा शर्यती नसल्याने यात्रेच्या दिवशी फारशी गर्दी होत नाही.राज्य शासनाने बैलागाडा शर्यती सुरू करण्यासाठी सकारात्मक पावले टाकली आहेत. त्यामुळे बैलगाडा मालकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत; मात्र पोलीस प्रशासन सध्या बैलगाडा शर्यतीबाबत असलेल्या बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत आहे. यात्रेच्या दिवशी शर्यतीच्या घाटात पोलिसांची गाडी उभी केली जाते. पोलीस बंदोबस्त ठेवला जातो. पोलीस त्यांचे काम करीत असले, तरी बैलगाडा मालक व शौकीन नाराज झाले आहेत. आंबेगाव तालुक्यातील साकोरे, लांडेवाडी या दोन महत्त्वाच्या गावांच्या यात्रा बैलगाडा शर्यतीविना पार पडल्या. नजीकच्या काळात अनेक छोट्या-मोठ्या गावांमध्ये यात्रा असून ग्रामदैवतांच्या यात्रा बैलगाडा शर्यतीविना पार पडण्याची शक्यता आहे.(वार्ताहर)शर्यतीवरील बंदीसंदर्भात येत्या आठ दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंदी उठल्यानंतर पुन्हा भिर्रर्रर्र होऊन ग्रामीण भागातील घाट गजबजणार आहेत. तोपर्यंत तरी बैलगाडा शर्यतीविना ग्रामदैवतांच्या यात्रा पार पडत आहेत.