शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शिरूर तालुक्यातील रस्त्यांच्या कामाला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:09 IST

टाकळी हाजी : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वामुळे शिरूर तालुक्यातील ३९ गावांतील रस्त्यांच्या कामासाठी भरीव निधी प्राप्त ...

टाकळी हाजी : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वामुळे शिरूर तालुक्यातील ३९ गावांतील रस्त्यांच्या कामासाठी भरीव निधी प्राप्त झाल्याने रस्त्यांच्या कामाला गती येणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार पोपटराव गावडे यांनी केले.

जिल्हा परिषदमधून ३० लाख रुपये मंजूर झालेल्या म्हसे ते डोंगरगण या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात व बापूसाहेब गावडे विद्यालय येथे वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील, घोडगंगाचे संचालन राजेंद्र गावडे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष बाळासाहेब भोर, मीना शाखा कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रकाश वायसे, पुणे जिल्हा भष्ट्राचार व मानव अधिकार संघटनेचे अध्यक्ष दत्ता मुसळे, बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सोनभाऊ मुसळे, ग्रामविकास अधिकारी राजेश खराडे, प्राचार्य आर. बी. गावडे, माजी उपसरपंच तुकाराम उचाळे, ग्रामपंचायत सदस्य काळुराम पवार, जयवंत मुसळे, बाळासाहेब मदगे, कोंडीभाऊ खाडे, शिवाजी चाटे, मुख्याध्यापक मिलन मिसाळ, अशोक गाडेकर, सुभाष चोरे, नवनाथ चोरे, संजय खाडे उपस्थित होते.

या वेळी भीमाशंकरचे संचालक प्रदीप वळसे पाटील म्हणाले की, गृहमंत्री वळसे पाटील व माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या नेतृत्वाखाली रस्ते, वीज, पूल, पाणी हे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येत आहे . कोरोनाच्या संकटाशी सामना करीत जगावे लागणार आहे. या वेळी जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे, राजेंद्र गावडे यांची भाषणे झाली.

प्रास्ताविक मीना शाखा कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रकाश वायसे यांनी तर सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मुसळे यांनी केले. आभार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सोनभाऊ मुसळे यांनी मानले.

म्हसे ते डोंगरगण रस्त्याचे भूमिपूजन करताना माजी आमदार पोपटराव गावडे, प्रदीप वळसे पाटील, सुनीता गावडे, राजेंद्र गावडे व ग्रामस्थ.