शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
5
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
6
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
7
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
8
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
9
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
10
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
11
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
12
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
13
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
14
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
15
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
16
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
17
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
18
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
19
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
20
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले

राज्यात सोयाबीन व कडधान्य बियाण्यांची भासणार कमतरता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सरकारने ठरवून दिल्याप्रमाणे शेतकरी स्वतःच्या उपयोगासाठी स्वतःचे बियाणे राखून ठेवत नाही. गरज असलेल्या सर्व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सरकारने ठरवून दिल्याप्रमाणे शेतकरी स्वतःच्या उपयोगासाठी स्वतःचे बियाणे राखून ठेवत नाही. गरज असलेल्या सर्व बियाण्यांचा पुरवठा सरकार करू शकत नाही. त्यातूनच यंदाच्या खरिपात राज्यातील एकूण क्षेत्राच्या तुलनेत सोयाबीन तसेच भुईमूग वगैरे कडधान्यांचे बियाणे कमी पडण्याची चिन्हे आहेत.

राज्यात सोयाबीनचे क्षेत्र ४३ लाख ५० हजार हेक्टर आहे. त्यासाठी प्रतिहेक्टर ७५ किलो याप्रमाणे बियाणाची गरज आहे. बदल दराप्रमाणे एकूण गरजेच्या ३५ टक्के म्हणजे ११ लाख ४१ हजार ८७५ क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा पुरवठा सरकारकडून होईल. भुईमूग, तीळ व अन्य कडधान्य पिकांच्या बाबतीतही हेच होऊन ऐन पेरणीच्या वेळेस सोयाबीन व कडधान्यांच्या बियाण्यांची कमतरता भासेल असे दिसत आहे.

त्यामुळेच सोयाबीनसह कडधान्याच्या बियाण्यांसाठी शेतकऱ्र्याने आपल्या शेतातील पिकामधले काही उत्पादन पुढील वर्षाचे बियाणे म्हणून बाजूला राखीव ठेवणे गरजेचे असते. एकदा प्रमाणीत बियाणे घेतले तर तो वाण सलग तीन वर्षे त्याच क्षमतेने चालू शकतो, असे शेतीतज्ज्ञांचे म्हणणे आहे. घरचेच बियाणे वापरले गेले तर खर्चातही बचत होते. म्हणूनच उत्पादनातील काही भाग शेतकऱ्र्यानी बियाणांसाठी राखीव ठेवावा अशी मोहीम सरकार कृषी खात्यामार्फत राबवत असते. मात्र चांगला भाव मिळतो, पैशांची गरज भासते म्हणून शेतकरी सर्व उत्पादनाची विक्री तरी करतो किंवा वापरतो. त्यातूनच बियाण्यांची, विशेषतः सोयाबीनसारख्या महागड्या बियाण्यांची कमतरता निर्माण होते.

महाबीज, बीज निगमकडून पुरवठा

एकूण गरजेएवढ्या बियाण्यांचा पुरवठा करणे सरकारसाठी अशक्य असल्याने सरकारने प्रत्येक बियाण्यांसाठी बदल दर लक्ष्यांक ठरवून दिला आहे. तो वगळूनच जिल्ह्यात किती बियाणे लागेल याचा अंदाज काढला जातो. यंदा त्यानुसार लागणाऱ्र्या ११ लाख ४१ हजार ८७५ क्विंटल सोयाबीन बियाणाचा पुरवठा महाबीज, राष्ट्रीय बीज निगम व खासगी कंपन्यांकडून होईल असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

फोटो- सोयाबीन, कडधान्ये