शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

राज्यात सोयाबीन व कडधान्य बियाण्यांची भासणार कमतरता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सरकारने ठरवून दिल्याप्रमाणे शेतकरी स्वतःच्या उपयोगासाठी स्वतःचे बियाणे राखून ठेवत नाही. गरज असलेल्या सर्व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सरकारने ठरवून दिल्याप्रमाणे शेतकरी स्वतःच्या उपयोगासाठी स्वतःचे बियाणे राखून ठेवत नाही. गरज असलेल्या सर्व बियाण्यांचा पुरवठा सरकार करू शकत नाही. त्यातूनच यंदाच्या खरिपात राज्यातील एकूण क्षेत्राच्या तुलनेत सोयाबीन तसेच भुईमूग वगैरे कडधान्यांचे बियाणे कमी पडण्याची चिन्हे आहेत.

राज्यात सोयाबीनचे क्षेत्र ४३ लाख ५० हजार हेक्टर आहे. त्यासाठी प्रतिहेक्टर ७५ किलो याप्रमाणे बियाणाची गरज आहे. बदल दराप्रमाणे एकूण गरजेच्या ३५ टक्के म्हणजे ११ लाख ४१ हजार ८७५ क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा पुरवठा सरकारकडून होईल. भुईमूग, तीळ व अन्य कडधान्य पिकांच्या बाबतीतही हेच होऊन ऐन पेरणीच्या वेळेस सोयाबीन व कडधान्यांच्या बियाण्यांची कमतरता भासेल असे दिसत आहे.

त्यामुळेच सोयाबीनसह कडधान्याच्या बियाण्यांसाठी शेतकऱ्र्याने आपल्या शेतातील पिकामधले काही उत्पादन पुढील वर्षाचे बियाणे म्हणून बाजूला राखीव ठेवणे गरजेचे असते. एकदा प्रमाणीत बियाणे घेतले तर तो वाण सलग तीन वर्षे त्याच क्षमतेने चालू शकतो, असे शेतीतज्ज्ञांचे म्हणणे आहे. घरचेच बियाणे वापरले गेले तर खर्चातही बचत होते. म्हणूनच उत्पादनातील काही भाग शेतकऱ्र्यानी बियाणांसाठी राखीव ठेवावा अशी मोहीम सरकार कृषी खात्यामार्फत राबवत असते. मात्र चांगला भाव मिळतो, पैशांची गरज भासते म्हणून शेतकरी सर्व उत्पादनाची विक्री तरी करतो किंवा वापरतो. त्यातूनच बियाण्यांची, विशेषतः सोयाबीनसारख्या महागड्या बियाण्यांची कमतरता निर्माण होते.

महाबीज, बीज निगमकडून पुरवठा

एकूण गरजेएवढ्या बियाण्यांचा पुरवठा करणे सरकारसाठी अशक्य असल्याने सरकारने प्रत्येक बियाण्यांसाठी बदल दर लक्ष्यांक ठरवून दिला आहे. तो वगळूनच जिल्ह्यात किती बियाणे लागेल याचा अंदाज काढला जातो. यंदा त्यानुसार लागणाऱ्र्या ११ लाख ४१ हजार ८७५ क्विंटल सोयाबीन बियाणाचा पुरवठा महाबीज, राष्ट्रीय बीज निगम व खासगी कंपन्यांकडून होईल असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

फोटो- सोयाबीन, कडधान्ये