शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

राज्यात सोयाबीन व कडधान्य बियाण्यांची भासणार कमतरता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सरकारने ठरवून दिल्याप्रमाणे शेतकरी स्वतःच्या उपयोगासाठी स्वतःचे बियाणे राखून ठेवत नाही. गरज असलेल्या सर्व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सरकारने ठरवून दिल्याप्रमाणे शेतकरी स्वतःच्या उपयोगासाठी स्वतःचे बियाणे राखून ठेवत नाही. गरज असलेल्या सर्व बियाण्यांचा पुरवठा सरकार करू शकत नाही. त्यातूनच यंदाच्या खरिपात राज्यातील एकूण क्षेत्राच्या तुलनेत सोयाबीन तसेच भुईमूग वगैरे कडधान्यांचे बियाणे कमी पडण्याची चिन्हे आहेत.

राज्यात सोयाबीनचे क्षेत्र ४३ लाख ५० हजार हेक्टर आहे. त्यासाठी प्रतिहेक्टर ७५ किलो याप्रमाणे बियाणाची गरज आहे. बदल दराप्रमाणे एकूण गरजेच्या ३५ टक्के म्हणजे ११ लाख ४१ हजार ८७५ क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा पुरवठा सरकारकडून होईल. भुईमूग, तीळ व अन्य कडधान्य पिकांच्या बाबतीतही हेच होऊन ऐन पेरणीच्या वेळेस सोयाबीन व कडधान्यांच्या बियाण्यांची कमतरता भासेल असे दिसत आहे.

त्यामुळेच सोयाबीनसह कडधान्याच्या बियाण्यांसाठी शेतकऱ्र्याने आपल्या शेतातील पिकामधले काही उत्पादन पुढील वर्षाचे बियाणे म्हणून बाजूला राखीव ठेवणे गरजेचे असते. एकदा प्रमाणीत बियाणे घेतले तर तो वाण सलग तीन वर्षे त्याच क्षमतेने चालू शकतो, असे शेतीतज्ज्ञांचे म्हणणे आहे. घरचेच बियाणे वापरले गेले तर खर्चातही बचत होते. म्हणूनच उत्पादनातील काही भाग शेतकऱ्र्यानी बियाणांसाठी राखीव ठेवावा अशी मोहीम सरकार कृषी खात्यामार्फत राबवत असते. मात्र चांगला भाव मिळतो, पैशांची गरज भासते म्हणून शेतकरी सर्व उत्पादनाची विक्री तरी करतो किंवा वापरतो. त्यातूनच बियाण्यांची, विशेषतः सोयाबीनसारख्या महागड्या बियाण्यांची कमतरता निर्माण होते.

महाबीज, बीज निगमकडून पुरवठा

एकूण गरजेएवढ्या बियाण्यांचा पुरवठा करणे सरकारसाठी अशक्य असल्याने सरकारने प्रत्येक बियाण्यांसाठी बदल दर लक्ष्यांक ठरवून दिला आहे. तो वगळूनच जिल्ह्यात किती बियाणे लागेल याचा अंदाज काढला जातो. यंदा त्यानुसार लागणाऱ्र्या ११ लाख ४१ हजार ८७५ क्विंटल सोयाबीन बियाणाचा पुरवठा महाबीज, राष्ट्रीय बीज निगम व खासगी कंपन्यांकडून होईल असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

फोटो- सोयाबीन, कडधान्ये