शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
6
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
7
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
8
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
9
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
10
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
11
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
12
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
13
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
14
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
15
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
16
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
17
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
18
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
19
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
20
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...

ज्वारीची पेरणीही यंदा कमीच

By admin | Updated: October 27, 2015 00:54 IST

खरीप हंगामाला पावसाचा फटका बसल्याने परतीच्या पावसाचा रब्बीला फायदा होईल, असे वाटले होते. मात्र रब्बीतील महत्त्वाचे पीक असलेल्या ज्वारीची पेरणी फक्त २६ टक्केच झाली आहे.

पुणे : खरीप हंगामाला पावसाचा फटका बसल्याने परतीच्या पावसाचा रब्बीला फायदा होईल, असे वाटले होते. मात्र रब्बीतील महत्त्वाचे पीक असलेल्या ज्वारीची पेरणी फक्त २६ टक्केच झाली आहे. यंदा जिल्ह्यात फक्त ८६ टक्के पाऊस झाला आहे. त्यातून जूनची सरासरी ओलांडून पावसाने दडी मारली. त्यामुळे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. खरीप हंगामाला मोठा फटका बसला आहे. भातपिक वगळता सर्वच पिके वाया गेली; मात्र सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाचे पुनरागमन झाले. या महिन्यात सरासरी १४६.०४ मिलिमीटर पाऊस पडतो. तो १८०.७७ मिलिमीटर म्हणजे टक्केवारीत तो १२३.७८ इतका झाला. यामुळे रब्बी हंगामाला काहीसा दिलासा मिळाला. रब्बी हंगामात जिल्ह्यात ज्वारी हे प्रमुख पीक असून ते ४ लाख ३१ हजार ८०० हेक्टरवर घेतले जाते. गेल्या वर्षी ३२ टक्के पेरण्या झाल्या होत्या. यंदा आजपर्यंत १ लाख १२ हजार ४०० हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली असून ती २६ टक्के इतकी आहे. यापुढे ज्वारीचे पेरणी होणे शक्य नाही. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षाही यंदा कमीच क्षेत्रावर ज्वारी पेरणी झाली आहे. त्यात अजून परतीच्या एका पावसाची या पिकासाठी गरज आहे. तो झाला नाही तर हे पीकही हाताला लागणार नाही. बारामती, पुरंदर, आंबेगाव परिसरात चांगल्या पेरण्या झाल्या आहेत. (प्रतिनिधी)गव्हाच्या 0 टक्के पेरण्याजिल्ह्यात रब्बी हंगामात ६५ हजार ४00 हेक्टरवर गहू पीक घेतले जाते. मात्र अद्याप या पिकाच्या 0 टक्के पेरण्या झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. यापुढील काळातही शेतकरी पाणी नसल्याने पीक घेईल का नाही याची शाश्वती नाही.आॅक्टोबर संपला तरी जिल्ह्यात १८ टँकरने १२ गावे ७९ वाड्या-वस्त्यांवर ३८ हजार २१ लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात सर्वाधिक ८ टँकर इंदापूर तालुक्यात सुरू असून, त्यानंतर बारामतीत ५, पुरंदरला ४ व दौंड तालुक्यात १ टँकर सुरू आहे. गेल्या वर्षी या महिन्यात फक्त तीन टँकरने तोही बारामतीत पाणीपुरवठा सुरू होता.