शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानांची हानी महत्त्वाची नाही, ती का झाली याचा शोध घेणे अधिक महत्त्वाचे- CDS
2
जागतिक दूध दिन: काय सांगता? प्रत्येकाच्या वाट्याला येते फक्त एवढेच दूध! अहवाल काय सांगतो?
3
पुण्यात पुन्हा ‘कार’नामा, भावे हायस्कूलजवळ कारचालकाने १२ जणांना उडविले, तिघांना फ्रॅक्चर
4
पाेहता आले नाही; दम लागून ४ मुले बुडाली; सहावी-सातवीच्या वर्गात शिकणारी होती सर्व मुले
5
वैष्णवी प्रकरण: नीलेशच्या घरातून तीन मोबाइल, पिस्तूल जप्त; पासपोर्ट, शस्त्र परवानाही सापडला!
6
पालघरमध्ये अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार; दोन ट्रकमध्ये अडकलेल्या कारचा चक्काचूर
7
थायलंडच्या या सुंदरीने जिंकली ७२ वी मिस वर्ल्ड स्पर्धा; नंदिनी गुप्ता टॉप 8 मधून बाहेर पडली
8
काळजी घ्या! देशात कोरोनाचे रुग्ण ३ हजारांवर, कर्नाटक, महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढली
9
Pune Car Accident : अनाचक चालकाचे नियंत्रण सुटले, समोर असलेल्या चहाच्या टपरीवर कार घुसली; अपघाताचा व्हिडीओ आला समोर
10
Pune Car Accident : 'चहा घ्यायला थांबलाे अन् पाय गमावून बसलाे'! तरुणाने सांगितली आपबीती
11
Pune Car Accident : पुण्यात कारने १२ जणांना उडवले, अपघातामधील जखमींची यादी आली समोर
12
Pune Car Accident : पुण्यातील कार अपघातातील चालकाची मोठी चूक; धक्कादायक माहिती आली समोर
13
MI ला नशिबाची एवढी साथ कशी मिळते? २०१८ च्या हंगामात तर... नेमकं काय म्हणाला आर. अश्विन?
14
Pune Accident: टपरीवर चहा पिणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना भरधाव कारने उडवले; पुण्याच्या सदाशिव पेठेतील घटना
15
शासकीय नोकरी करणाऱ्या लाडक्या बहिणी सरकारच्या रडारवर; बावनकुळेंनी दिला कारवाईचा इशारा
16
टीम इंडियाकडून खेळणाऱ्या या गड्याला कोहलीची आयकॉनिक १८ क्रमांकाची जर्सी कशी काय मिळाली?
17
'नेपाळी तिथे जाऊ शकतात, भारत तुम्हाला जामीनही देणार नाही'; चीनने नागरिकांना इशारा का दिला?
18
सायरन वाजला, स्ट्रेचरवर लोकांना आरोग्य कर्मचारी घेऊन जाऊ लागले; पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या राज्यांमध्ये मॉक ड्रिल
19
तिघांची एकत्र चौकशी करायची आहे; निलेशसहीत सासरा, दीर यांनाही ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी
20
साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी रुग्ण संख्या तीनवर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

पोलिसांची गाडी दिसताच तो शिरला थेट आत

By admin | Updated: July 2, 2015 23:58 IST

अपहरणकर्त्यांनी त्याच्या डोळ्यांवरील पट्टी काढली़... कॉईन बॉक्स दिसल्यावर तेथून ‘घरी फोन करून २० लाख रुपये द्यायला सांग,’ अशी त्याला धमकी दिली़ तो गाडीतून खाली

लोणी काळभोर : अपहरणकर्त्यांनी त्याच्या डोळ्यांवरील पट्टी काढली़... कॉईन बॉक्स दिसल्यावर तेथून ‘घरी फोन करून २० लाख रुपये द्यायला सांग,’ अशी त्याला धमकी दिली़ तो गाडीतून खाली उतरला़ कॉईन बॉक्सकडे जात असतानाच पोलिसांची गाडी दिसली अन तो पळत जाऊन गाडीत बसला़... अपहरणकर्त्यांनी पोलिसांना पाहताच धूम ठोकली़ २० लाखांच्या खंडणीसाठी उदगीरहून अपहरण करून आणलेल्या तरुणाने दाखविलेल्या समयसूचकतेमुळे सुटका होऊ शकली़बाळू शंकरराव पाटोदे (वय २५, रा. कृष्णाई गार्डनशेजारी, उदगीर, जि. लातूर) असे या तरुणाचे नाव आहे़याबाबतची हकीकत अशी : पहाटे पावणेचारच्या सुमारास दरवाजा ठोठाविल्याच्या आवाज आल्याने बाळू उघडण्यासाठी जात असतानाच दरवाजा तोडून चार जण घरात शिरले़ त्याच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकली व पकडून नेऊन स्कार्पिओ गाडीत (एमएच १४-डीएक्स ९९११) बसविले़ गाडी पुण्याच्या दिशेने निघाल्यानंतर त्याचे डोळे बांधण्यात आले. त्यातील एकाने ‘तू २० लाख रुपये आजच्या आज दे, नाही तर तुझा खून करू,’ अशी धमकी दिली. त्या वेळी त्यांच्याकडे पिस्तुल, तलवारी व चाकू होते. गाडी उदगीरच्या पुढे आल्यावर त्यांनी त्याच्या हातातील प्रत्येकी अर्धा तोळा वजनाच्या तीन अंगठ्या, दोन तोळ्यांचे ब्रेसलेट व दोन साखळ्या, असा एकूण ८ तोळ्यांचा सोन्याचा ऐवज हिसकावून काढून घेतला.स्कार्पिओ सोलापूर-पुणे महामार्गावरील यवत टोलनाक्यावर आल्यानंतर बाळूच्या डोळ्यांवरील पट्टी सोडण्यात आली. ते थेऊर येथे एका दुकानातील कॉईन बॉक्स दाखवून ‘तू घरी फोन करून घरच्यांना सायंकाळपर्यंत २० लाख रुपये आणण्यास सांग, तसेच पैसे न आणता पोलिसांना कळविण्याचा प्रयत्न केला, तर तुझा मर्डर झाला समज’ अशी धमकी देऊन त्याला खाली उतरववले... आणि तो थेट पोलिसांच्या गाडीत जावून बसला.हवालदार दत्तात्रय गिरमकर व बाळासाहेब चोरामले हे पेट्रोलिंग करीत होते. बाळूने त्यांना आपले आपहरण झाल्याचे सांगताच त्यांनी कोलवडीपर्यंत गाडीचा पाठलाग केला; परंतु अपहरणकर्ते पळून जाण्यात यशस्वी ठरले. पोलीस निरीक्षक कोंडूभैरी यांनी सांगितले, आम्ही सर्व बाबी पडताळून पाहत आहोत. अपहरणकर्त्यांच्या मागावर पोलीस पथक पाठविण्यात आले असून, त्यांच्याबद्दल माहिती मिळाल्याने लवकरात लवकर त्यांना जेरबंद करण्यात येईल. बाळूचे नातेवाईक उदगीरहून पुण्याकडे येण्यास निघाले आहेत़सुटका करता आली, हे समाधानहवालदार दत्तात्रय गिरमकर यांनी सांगितले, की आम्ही पेट्रोलिंग करीत थेऊरला आलो असताना अचानक एक तरुण धावत आमच्या गाडीपाशी आला़ आपले तोंड गाडीत घालून ‘ते मला मारतात-मारतात’ असे म्हणून लागला़ मी त्याला तसाच गाडीत घेतला़ त्या वेळी काही मुले गाडीजवळ आली़ ‘हे मारतात का?’ असे विचारल्यावर ‘हे नाही, ते’ असे सांगून त्याने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या काही जणांकडे हात दाखविला़ त्याबरोबर ते सर्व जण पळत गाडीत जाऊन बसले़ मी मुलांना ओरडून सांगितले, ‘अरे पकडा त्यांना.’ तेव्हा तेथील मुलेही त्यांच्यामागे धावली़; पण तोपर्यंत त्यांनी गाडी सुरू करून पळायला सुरुवात केली़ आम्ही गाडीतून व काही मुलांनी मोटारसायकलवरून त्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली़ केसनंदपर्यंत पाठलाग केला़ वाटेत एक ट्रेलर आडवा आल्याने ते पळून गेले़मात्र बाळूची सुटका करता आली याचे समाधान आहे.