शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

निर्णय होताच श्रेयासाठी स्पर्धा

By admin | Updated: March 13, 2016 01:12 IST

कुंटे समितीच्या अहवालाच्या आधारे राज्यातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचा निर्णय घेण्यात आल्याने शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे

पिंपरी : कुंटे समितीच्या अहवालाच्या आधारे राज्यातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचा निर्णय घेण्यात आल्याने शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. निर्णय होताच जाहिरात फ्लेक्स झळकले. श्रेयासाठी धडपड सुरू झाली आहे. परंतु, नियमितीकरणासाठी नेमके किती शुल्क भरावे लागणार? दंड आकारून कोणती बांधकामे नियमित होणार आहेत? याबद्दलची शंका नागरिकांच्या मनात कायम आहे. त्यांच्या मनातील संभ्रम दूर कोण करणार, असा मुद्दा नागरिक उपस्थित करू लागले आहेत. अनधिकृत बांधकामाच्या प्रश्नावर तोडगा निघाला, अशी घोषणा करून अनेकदा पेढे वाटप करण्यात आले आहेत. नागरिकांच्या भावनांशी खेळण्याचे प्रकार राजकारण्यांकडून झाले आहेत. त्यांनी घोषणा केल्यानंतरही महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाची कारवाई सुरू राहिली आहे.एकीकडे अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सुटला. एक वीटही पडणार नाही, असे सांगण्यात आले. तर, दुसरीकडे महापालिकेची कारवाई मात्र थांबलेली नाही. हा अनुभव शहरातील नागरिकांनी यापूर्वी घेतला आहे. शासनाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयाने शहरातील नागरिक आनंदित झाले आहेत. शहरातील सर्व दीड लाख बांधकामे नियमित होणार, की त्यातील काही बांधकामे नियमित होणार? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. नियमित होतील अशी बांधकामे कोणती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या शहरातील महत्त्वाच्या प्रश्नावर तोडगा निघूनही नागरिकांमध्ये अपेक्षित उत्साह जाणवत नाही.३१ डिसेंबर २०१५पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार ५० टक्के बांधकामधारकांना याचा लाभ मिळणार आहे. कुंटे समितीने दिलेल्या अहवालातील शिफारशींच्या आधारे नियमात बसविणे शक्य होईल, अशीच अनधिकृत बांधकामे नियमित होणार आहेत. निवडणुका जवळ येताच अशा बांधकामांचा सुळसुळाट होतो. याचा प्रत्यय मागणील दहा वर्षांत आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेची अतिक्रमण कारवाई सुरू असतानाच्या काळातही न घाबरता अनेकांनी अनधिकृत बांधकामे केली आहेत. त्यांची बांधकामे नियमित होणार की नाही. नियमित होणारी बांधकामे कोणती याबाबत संभ्रम कायम आहे. (प्रतिनिधी)प्राधिकरण हद्दीतील बांधकामे, तसेच संरक्षण खात्याने प्रतिबंधित केलेल्या रेड झोन हद्दीतील बांधकामे आरक्षणावरील बांधकामे आणि नदीपात्रातील बांधकामे नियमित होण्यास अडचणी आहेत. नागरिकांना दिलासा देणारा निर्णय शासनाने घेतल्यानंतर आता अनधिकृत बांधकामे थांबतील का? महापालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांवर, बीट निरीक्षकांवर अनधिकृत बांधकामे होणार नाहीत, याची दक्षता घेण्याची जबाबदारी सोपवली आहे, त्या अधिकाऱ्यांवर यापुढे तरी कारवाई होणार का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.