शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

निर्णय होताच श्रेयासाठी स्पर्धा

By admin | Updated: March 13, 2016 01:12 IST

कुंटे समितीच्या अहवालाच्या आधारे राज्यातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचा निर्णय घेण्यात आल्याने शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे

पिंपरी : कुंटे समितीच्या अहवालाच्या आधारे राज्यातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचा निर्णय घेण्यात आल्याने शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. निर्णय होताच जाहिरात फ्लेक्स झळकले. श्रेयासाठी धडपड सुरू झाली आहे. परंतु, नियमितीकरणासाठी नेमके किती शुल्क भरावे लागणार? दंड आकारून कोणती बांधकामे नियमित होणार आहेत? याबद्दलची शंका नागरिकांच्या मनात कायम आहे. त्यांच्या मनातील संभ्रम दूर कोण करणार, असा मुद्दा नागरिक उपस्थित करू लागले आहेत. अनधिकृत बांधकामाच्या प्रश्नावर तोडगा निघाला, अशी घोषणा करून अनेकदा पेढे वाटप करण्यात आले आहेत. नागरिकांच्या भावनांशी खेळण्याचे प्रकार राजकारण्यांकडून झाले आहेत. त्यांनी घोषणा केल्यानंतरही महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाची कारवाई सुरू राहिली आहे.एकीकडे अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सुटला. एक वीटही पडणार नाही, असे सांगण्यात आले. तर, दुसरीकडे महापालिकेची कारवाई मात्र थांबलेली नाही. हा अनुभव शहरातील नागरिकांनी यापूर्वी घेतला आहे. शासनाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयाने शहरातील नागरिक आनंदित झाले आहेत. शहरातील सर्व दीड लाख बांधकामे नियमित होणार, की त्यातील काही बांधकामे नियमित होणार? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. नियमित होतील अशी बांधकामे कोणती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या शहरातील महत्त्वाच्या प्रश्नावर तोडगा निघूनही नागरिकांमध्ये अपेक्षित उत्साह जाणवत नाही.३१ डिसेंबर २०१५पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार ५० टक्के बांधकामधारकांना याचा लाभ मिळणार आहे. कुंटे समितीने दिलेल्या अहवालातील शिफारशींच्या आधारे नियमात बसविणे शक्य होईल, अशीच अनधिकृत बांधकामे नियमित होणार आहेत. निवडणुका जवळ येताच अशा बांधकामांचा सुळसुळाट होतो. याचा प्रत्यय मागणील दहा वर्षांत आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेची अतिक्रमण कारवाई सुरू असतानाच्या काळातही न घाबरता अनेकांनी अनधिकृत बांधकामे केली आहेत. त्यांची बांधकामे नियमित होणार की नाही. नियमित होणारी बांधकामे कोणती याबाबत संभ्रम कायम आहे. (प्रतिनिधी)प्राधिकरण हद्दीतील बांधकामे, तसेच संरक्षण खात्याने प्रतिबंधित केलेल्या रेड झोन हद्दीतील बांधकामे आरक्षणावरील बांधकामे आणि नदीपात्रातील बांधकामे नियमित होण्यास अडचणी आहेत. नागरिकांना दिलासा देणारा निर्णय शासनाने घेतल्यानंतर आता अनधिकृत बांधकामे थांबतील का? महापालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांवर, बीट निरीक्षकांवर अनधिकृत बांधकामे होणार नाहीत, याची दक्षता घेण्याची जबाबदारी सोपवली आहे, त्या अधिकाऱ्यांवर यापुढे तरी कारवाई होणार का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.