शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

कही खुशी कही गम...शिरूर तुपाशी, खेड उपाशी

By admin | Updated: May 10, 2017 03:57 IST

चासकमान धरणातून शिरूर तालुक्यासाठी २० दिवसांकरिता डाव्या कालव्यातून सोडलेले पाणी ३६ दिवस उलटूनही ते अजूनही सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदावडी : चासकमान धरणातून शिरूर तालुक्यासाठी २० दिवसांकरिता डाव्या कालव्यातून सोडलेले पाणी ३६ दिवस उलटूनही ते अजूनही सुरू आहे. खेड तालुक्याला धरणातील पाणी संपल्यानंतर, पाणी मिळणार का, असा सवाल शेतकरी विचारत आहे. या धरणासाठी आमच्या जमिनी गेल्या, मात्र शिरूर तालुका तुपाशी, खेड तालुका उपाशी असे चित्र दिसत आहे. हे आवर्तन अजून किती दिवस चालणार आहे, या धरणाच्या पाण्याला कोणी वाली आहे का नाही,असे शेतकरी प्रश्न विचारू लागला आहे.चासकमान धरणातून (दि.३) डाव्या कालव्यातून ५५० क्युसेक्स वेगाने पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले होते. १४४ किलोमीटर डावा कालवा लांबीचा आहे. ४५ दिवस चालणाऱ्या या आवर्तनामध्ये ५ दिवस पाणी वहनासाठी २० दिवस शिरूरसाठी व २०दिवस खेड तालुक्यासाठी असे नियोजन या आवर्तनाचे करण्यात आले होते; मात्र आता ३६ दिवस उलटूनही अजून खेड तालुक्यतील शेतकऱ्यांसाठी पाणी खुले केले नाही, पाणीचोरी होऊ नये म्हणून खेड तालुक्यातील कडधे, कान्हेवाडी, कमान,चास, आखरवाडी, बुट्टेवाडी, पांगरी, काळेचीवाडी, तिन्हेवाडी सातकरस्थळ , भांबुरवाडी, टाकळकरवाडी, मांडवळा रेटवडी,निमगाव, दावडी, चिचोंशी येथे असलेल्या डाव्या कालव्याच्या मोऱ्या-चाऱ्या वर मुरुम टाकून बंद केल्या आहे. शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी कालव्यातून वाहणारेपाणी शेतीसाठी घेऊ नये, यासाठी पोलिसाचे भरारी पथक ठेवण्यात आले आहे.कालव्याच्या रस्त्याने दिवस-रात्र पोलीस कडधेपासून ते दावडीपर्यंत लक्ष ठेवून आहे. तसेच, डाव्या कालव्यावर असणाऱ्या कृषिपंपाचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी चासकमान धरणाच्या पाण्याच्या भरवशावर घेतलेली उन्हाळी पिके जळून गेली आहेत. चासकमान धरणामध्ये १४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाळ्यात मे महिन्याचे २२ दिवस शिल्लक आहे. विचार केला असता पाण्याचा योग्य व काटकसरीने वापर करणे गरजेचे असताना आता हे ४५ दिवसांचे आवर्तन हे शिरूर तालुक्यासाठीच होणार काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. खेड तालुक्यासाठी किती दिवस पाणी मिळणार, अशा चिंतेते शेतकरी आहेत, पाटबंधारे अधिकाऱ्याकडून शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.