शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

कही खुशी कही गम...शिरूर तुपाशी, खेड उपाशी

By admin | Updated: May 10, 2017 03:57 IST

चासकमान धरणातून शिरूर तालुक्यासाठी २० दिवसांकरिता डाव्या कालव्यातून सोडलेले पाणी ३६ दिवस उलटूनही ते अजूनही सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदावडी : चासकमान धरणातून शिरूर तालुक्यासाठी २० दिवसांकरिता डाव्या कालव्यातून सोडलेले पाणी ३६ दिवस उलटूनही ते अजूनही सुरू आहे. खेड तालुक्याला धरणातील पाणी संपल्यानंतर, पाणी मिळणार का, असा सवाल शेतकरी विचारत आहे. या धरणासाठी आमच्या जमिनी गेल्या, मात्र शिरूर तालुका तुपाशी, खेड तालुका उपाशी असे चित्र दिसत आहे. हे आवर्तन अजून किती दिवस चालणार आहे, या धरणाच्या पाण्याला कोणी वाली आहे का नाही,असे शेतकरी प्रश्न विचारू लागला आहे.चासकमान धरणातून (दि.३) डाव्या कालव्यातून ५५० क्युसेक्स वेगाने पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले होते. १४४ किलोमीटर डावा कालवा लांबीचा आहे. ४५ दिवस चालणाऱ्या या आवर्तनामध्ये ५ दिवस पाणी वहनासाठी २० दिवस शिरूरसाठी व २०दिवस खेड तालुक्यासाठी असे नियोजन या आवर्तनाचे करण्यात आले होते; मात्र आता ३६ दिवस उलटूनही अजून खेड तालुक्यतील शेतकऱ्यांसाठी पाणी खुले केले नाही, पाणीचोरी होऊ नये म्हणून खेड तालुक्यातील कडधे, कान्हेवाडी, कमान,चास, आखरवाडी, बुट्टेवाडी, पांगरी, काळेचीवाडी, तिन्हेवाडी सातकरस्थळ , भांबुरवाडी, टाकळकरवाडी, मांडवळा रेटवडी,निमगाव, दावडी, चिचोंशी येथे असलेल्या डाव्या कालव्याच्या मोऱ्या-चाऱ्या वर मुरुम टाकून बंद केल्या आहे. शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी कालव्यातून वाहणारेपाणी शेतीसाठी घेऊ नये, यासाठी पोलिसाचे भरारी पथक ठेवण्यात आले आहे.कालव्याच्या रस्त्याने दिवस-रात्र पोलीस कडधेपासून ते दावडीपर्यंत लक्ष ठेवून आहे. तसेच, डाव्या कालव्यावर असणाऱ्या कृषिपंपाचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी चासकमान धरणाच्या पाण्याच्या भरवशावर घेतलेली उन्हाळी पिके जळून गेली आहेत. चासकमान धरणामध्ये १४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाळ्यात मे महिन्याचे २२ दिवस शिल्लक आहे. विचार केला असता पाण्याचा योग्य व काटकसरीने वापर करणे गरजेचे असताना आता हे ४५ दिवसांचे आवर्तन हे शिरूर तालुक्यासाठीच होणार काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. खेड तालुक्यासाठी किती दिवस पाणी मिळणार, अशा चिंतेते शेतकरी आहेत, पाटबंधारे अधिकाऱ्याकडून शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.