शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘सोमेश्वर’च्या कारभाराची चौकशी रद्द

By admin | Updated: April 12, 2017 04:02 IST

येथील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची १२६ कोटी रुपयांच्या अनियमितता संदर्भातील सुरू असलेल्या कलम ८८ अंतर्गत चौकशीचा निकाल लागला आहे.

सोमेश्वरनगर : येथील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची १२६ कोटी रुपयांच्या अनियमितता संदर्भातील सुरू असलेल्या कलम ८८ अंतर्गत चौकशीचा निकाल लागला आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी याबाबतची चौकशी रद्द केली असल्याची माहिती सोमेश्वर कारखाना प्रशासनाने दिली आहे. सन २०१३—१४ च्या गाळप हंगामात गाळप हंगाम संपला, दिवाळी आली; मात्र सभासदांना दिवाळीला देण्यासाठी कारखान्याकडे पैशांची कमतरता भासू लागली. याअगोदर मात्र कारखान्याकडे भरपूर पैशांची उपलब्धता होती. अचानक काय झाले म्हणून कारखान्याने सनदी लेखापरीक्षक एल. एम. जोशी यांचेकडून लेखापरीक्षण करून घेतल्यानंतर लेखापरीक्षक जोशी यांच्या असे लक्षात आले की, सन २००८—०९ ते २०१२—१३ या पाच वर्षांच्या कालावधीत ऊसतोडणी खर्च, साखरदर, तसेच बँकांची व इतर कर्जे याची आकारणी न केल्यामुळे ताळेबंद फुगला आहे. यामध्ये लांबणीवर टाकलेल्या खर्चासह १२६ कोटी रूपयांची अनियमितता असल्याचे लेखापरीक्षक जोशी यांना आढळून आले. त्यांनी तो गोपनीय अहवाल साखर आयुक्तांना दिला. यावर साखर आयुक्तांनी सोमेश्वर कारखान्याचे पुन्हा चाचणी लेखापरीक्षक म्हणून शेख यांची नियुक्ती केली. त्यांनीही सन २००८—०९ ते २०१२—१३ या कालावधीतील लेखापरीक्षण केले. यामध्ये १२६ कोटी रुपयांच्या अनियमिततेबाबत त्या कालावधीतील कारखान्याचे संचालक मंडळ व मुख्य लेखापाल यांच्यावर ठपका ठेवला होता. शेख यांनी त्यांचा अहवाल साखर आयुक्तांना सादर केल्यावर साखर आयुक्तांनी २७ एप्रिल २०१५ रोजी कलम ८८ अन्वये कारखान्याच्या चौकशीचे आदेश दिले. या कलम ८८ अन्वये संचालकांवर या १२६ कोटी रुपयांची जबाबदारी निश्चित करून सेवानिवृत्त प्रादेशिक सहसंचालक डी. आर. घोडे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.या कलम ८८ अंतर्गत अनेक वेळा सुनावण्या पार पडल्या आहेत. याबाबतचा कधी निकाल लागणार याकडे साखर वर्तुळाच्या नजरा लागल्या होत्या. २२ जून २०१६ रोजी तत्कालीन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कलम ८८ ची फाईल निकालासाठी बंद केली होती. त्याचदरम्यान सहकारमंत्री पद हे बदलून सुभाष देशमुख यांच्याकडे याचा पदभार देण्यात आला. सुभाष देशमुख यांनी नुकताच याचा निकाल दिला आहे. त्यांनी १२६ कोटी रूपयांच्या अनियमिततेबाबत संचालक मंडळावरील ठपका रद्द केला आहे.(वार्ताहर)संचालकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास...सन २००८—०९ ते २०१२—१३ या पाच वर्षांच्या कालावधीत ऊसतोडणी खर्च, साखर दर, तसेच बँकांची व इतर कर्जे याची आक ारणी न केल्याने १२६ कोटी रुपयांची अनियमितता दिसत होती. मात्र लेखापरीक्षकांनी त्या कार्यकालातील संचालक मंडळाला बळीचा बकरा बनवित दोषी ठरविण्यात आले होते. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून तत्कालीन संचालक मंडळावर कारवाईची टांगती तलवार होती. आजच्या निकालाने संचालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.