शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

‘सोमेश्वर’च्या कारभाराची चौकशी रद्द

By admin | Updated: April 12, 2017 04:02 IST

येथील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची १२६ कोटी रुपयांच्या अनियमितता संदर्भातील सुरू असलेल्या कलम ८८ अंतर्गत चौकशीचा निकाल लागला आहे.

सोमेश्वरनगर : येथील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची १२६ कोटी रुपयांच्या अनियमितता संदर्भातील सुरू असलेल्या कलम ८८ अंतर्गत चौकशीचा निकाल लागला आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी याबाबतची चौकशी रद्द केली असल्याची माहिती सोमेश्वर कारखाना प्रशासनाने दिली आहे. सन २०१३—१४ च्या गाळप हंगामात गाळप हंगाम संपला, दिवाळी आली; मात्र सभासदांना दिवाळीला देण्यासाठी कारखान्याकडे पैशांची कमतरता भासू लागली. याअगोदर मात्र कारखान्याकडे भरपूर पैशांची उपलब्धता होती. अचानक काय झाले म्हणून कारखान्याने सनदी लेखापरीक्षक एल. एम. जोशी यांचेकडून लेखापरीक्षण करून घेतल्यानंतर लेखापरीक्षक जोशी यांच्या असे लक्षात आले की, सन २००८—०९ ते २०१२—१३ या पाच वर्षांच्या कालावधीत ऊसतोडणी खर्च, साखरदर, तसेच बँकांची व इतर कर्जे याची आकारणी न केल्यामुळे ताळेबंद फुगला आहे. यामध्ये लांबणीवर टाकलेल्या खर्चासह १२६ कोटी रूपयांची अनियमितता असल्याचे लेखापरीक्षक जोशी यांना आढळून आले. त्यांनी तो गोपनीय अहवाल साखर आयुक्तांना दिला. यावर साखर आयुक्तांनी सोमेश्वर कारखान्याचे पुन्हा चाचणी लेखापरीक्षक म्हणून शेख यांची नियुक्ती केली. त्यांनीही सन २००८—०९ ते २०१२—१३ या कालावधीतील लेखापरीक्षण केले. यामध्ये १२६ कोटी रुपयांच्या अनियमिततेबाबत त्या कालावधीतील कारखान्याचे संचालक मंडळ व मुख्य लेखापाल यांच्यावर ठपका ठेवला होता. शेख यांनी त्यांचा अहवाल साखर आयुक्तांना सादर केल्यावर साखर आयुक्तांनी २७ एप्रिल २०१५ रोजी कलम ८८ अन्वये कारखान्याच्या चौकशीचे आदेश दिले. या कलम ८८ अन्वये संचालकांवर या १२६ कोटी रुपयांची जबाबदारी निश्चित करून सेवानिवृत्त प्रादेशिक सहसंचालक डी. आर. घोडे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.या कलम ८८ अंतर्गत अनेक वेळा सुनावण्या पार पडल्या आहेत. याबाबतचा कधी निकाल लागणार याकडे साखर वर्तुळाच्या नजरा लागल्या होत्या. २२ जून २०१६ रोजी तत्कालीन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कलम ८८ ची फाईल निकालासाठी बंद केली होती. त्याचदरम्यान सहकारमंत्री पद हे बदलून सुभाष देशमुख यांच्याकडे याचा पदभार देण्यात आला. सुभाष देशमुख यांनी नुकताच याचा निकाल दिला आहे. त्यांनी १२६ कोटी रूपयांच्या अनियमिततेबाबत संचालक मंडळावरील ठपका रद्द केला आहे.(वार्ताहर)संचालकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास...सन २००८—०९ ते २०१२—१३ या पाच वर्षांच्या कालावधीत ऊसतोडणी खर्च, साखर दर, तसेच बँकांची व इतर कर्जे याची आक ारणी न केल्याने १२६ कोटी रुपयांची अनियमितता दिसत होती. मात्र लेखापरीक्षकांनी त्या कार्यकालातील संचालक मंडळाला बळीचा बकरा बनवित दोषी ठरविण्यात आले होते. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून तत्कालीन संचालक मंडळावर कारवाईची टांगती तलवार होती. आजच्या निकालाने संचालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.