शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

काहींची दिवाळी, तर काहींचे दिवाळे

By admin | Updated: October 21, 2014 05:12 IST

नातेवाईक - मित्रपरिवाराकडून उसनवारीपासून ते मालमत्ता विकण्यापर्यंत आणि दागिने गहाण ठेवण्यापर्यंतच्या निवडणुकीतील सुरस कहाण्यांची चर्चा सध्या सर्वत्र सुरू झाली आहे

पुणे : नातेवाईक - मित्रपरिवाराकडून उसनवारीपासून ते मालमत्ता विकण्यापर्यंत आणि दागिने गहाण ठेवण्यापर्यंतच्या निवडणुकीतील सुरस कहाण्यांची चर्चा सध्या सर्वत्र सुरू झाली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च झाला. चौरंगी - पंचरंगी लढतीत काहींची लॉटरी लागली, त्यांची दिवाळी साजरी होतेय, मात्र पराभव झालेल्यांचे दिवाळे वाजले आहे. दर पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुका या राजकीय नेत्यांच्या दृष्टीने एक युद्धच असते़ ते सर्व शक्तीनुसार लढविताना केवळ विजय मिळवायचा या एकमेव ध्येयाने प्रत्येकजण साम, दाम, दंड, भेद अशा सर्व मार्गांचा अवलंब करीत असतो़ त्यात अनेकदा त्यांना स्वकियांकडूनच अडथळे येतात़ यंदाच्या निवडणुकीतही हे दिसून आले. त्यामुळे अनेक उमेदवारांकडून झालेला खर्च आणि प्रत्यक्षात मिळालेली मते यांचे गणित कोठेच जुळत नसल्याचे दिसत असल्याने मनस्तापाची वेळ आली आहे. आघाडी आणि युतीमुळे अनेक मतदारसंघातील आमदारकीच्या इच्छुकांना आपल्या आकांक्षांना मुरड घालावी लागत होती. क्षमता असूनही आघाडीच्या राजकारणात लढण्याची संधी मिळत नव्हती. पण, निवडणुकीचे अर्ज भरण्याची मुदत संपत असतानाच आघाडी आणि युती तुटली़ त्यामुळे या इच्छुकांना पर्याय मिळाला. आमदारकीचे स्वप्न समोर दिसू लागल्याने अनेकांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला़ जवळ आलेली दिवाळी लक्षात घेऊन पणत्या, सुवासिक साबण, उटणे अशा वस्तू मतदारांना पुरविल्या़ कार्यकर्त्यांना जपताना अनेकांनी चांदीच्या भेटवस्तूही दिल्या़ काहींनी ब्रेसलेटही पुरविली़ प्रचारात त्यांना कोठेही कमी पडू नये, म्हणून त्यांची बडदास्त ठेवली़ कार्यकर्त्यांच्या मागण्याही वाढत होत्या. दररोजचा भत्ता वाढवून देण्याची मागणी होत होती. संपूर्ण प्रचारात एका उमेदवाराचा प्रचार करत असताना मतदानाच्या दिवशी मतदान प्रतिनिधी म्हणून दुसरा उमेदवार अधिक पैसे देत असल्याचे पाहून त्याचे काम करण्यासही पुढे - मागे पाहिले नाही़ (प्रतिनिधी)