शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

‘उजनी’चा ‘तो’ आदेश रद्द केल्याने सोलापूर-इंदापूर आमनेसामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:10 IST

कळस : इंदापूर तालुक्यातील सिंचनासाठी उजनी जलाशयावरून मंजूर करण्यात आलेल्या ५ टीएमसी योजनेचा आदेशच रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे ...

कळस : इंदापूर तालुक्यातील सिंचनासाठी उजनी जलाशयावरून मंजूर करण्यात आलेल्या ५ टीएमसी योजनेचा आदेशच रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आता उजनी जलाशयावरील इंदापूर विरूद्ध सोलापूर हा संघर्ष अधिक तीव्र होणार आहे. जिल्ह्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या इंदापूर तालुक्यातील अवर्षणप्रवण भागाला या निर्णयामुळे पाण्यासाठी उपेक्षाच सहन करावी लागणार आहे.

भीमा नदीवरील उजनी धरणासाठी इंदापूर तालुक्याचा मोठा त्याग आहे. मात्र, इंदापूर तालुक्यातील प्रत्येक निवडणुकीला पाण्यावरून राजकारण तापत होते. त्यामुळे गेली ३० वर्षापासून धगधगणा-या खडकवासला कालव्यावरील ३६ गावांचा व नीरा डावा कालव्यावरील २२ गावांचा पाणी प्रश्न उजनीवरील उपसा सिंचनला मंजुरी मिळाल्यामुळे सुटणार ,अशी अपेक्षा शेतक-यांना होती राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी यासाठी मोठी ताकद लावली होती. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या योजनेला कडाडुन विरोध केला. परिणामी जलसंपदा मंत्री जंयत पाटील यांच्याकडुन आदेश करण्यास भाग पाडले. याचे पडसाद तालुक्यात उमटू लागले आहेत. खडकवासला कालव्यावर पुणे शहराचा पाण्याचा भार वाढल्याने तालुका सिंचनासाठी संकटात आला आहे. खडकवासला कालव्याचा पट्टा हा अवर्षण प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या पट्ट्यात तालुक्याच्या इतर भागाच्या तुलनेत पर्जन्यमान कमी असते. कालव्याला पाणीही कधीच वेळेवर येत नसल्याने या भागातील शेतकरी अडचणीत आला आहे. सुमारे २० हजार हेक्टर शेती सिंचनासाठी या कालव्यावर अवलंबुन आहे. दरवर्षी उन्हाळ्यात आवर्तन देण्यास टाळाटाळ केली जाते. महत्वाच्या या पाणीप्रश्नी कायम सापत्नभावाची वागणूक ग्रामीण भागाला दिली जात होती. इंदापुर शहराचा पाणीपुरवठा व शेकडो ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजना या कालव्यावर अवलंबुन आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याचीही अवस्था उन्हाळ्यात गंभीर आहे. नवीन उपसा सिंचनमुळे शेटफळगढेपासून बेडशिंगेपर्यंत सुमारे ३६ गावामधील क्षेत्र बारमाही ओलिताखाली येणार होते.

तसेच खडकवासला कालव्यावरुन सणसर जोड कालव्यामधून २२ गावांना पाणी देण्यासाठी अनेक संघर्ष झाला. अनेक वेळा आंदोलने झाली मात्र अंथुर्णेपासुन पुढे २२ गावांना बारमाही पाणी मिळवण्यासाठी गेली ३० वर्षे लढा चालु होता.खडकवासला धरणसाखळीत पाणी कमी राहत असल्याने सणसर जोड बोगद्यालाही पाणी दिले जात नव्हते. आता या गावांनाही त्याचा मोठा फटका बसणार आहे.

तालुक्याने उजनी धरणासाठी मोठा त्याग केला आहे. २८ गावांना घरदारे जमिनीसह विस्थापित व्हावे लागले आहे. मात्र, त्याच तालुक्याला पाण्यासाठी उपेक्षा करावी लागत आहे.

—————————————————