शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘उजनी’चा ‘तो’ आदेश रद्द केल्याने सोलापूर-इंदापूर आमनेसामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:10 IST

कळस : इंदापूर तालुक्यातील सिंचनासाठी उजनी जलाशयावरून मंजूर करण्यात आलेल्या ५ टीएमसी योजनेचा आदेशच रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे ...

कळस : इंदापूर तालुक्यातील सिंचनासाठी उजनी जलाशयावरून मंजूर करण्यात आलेल्या ५ टीएमसी योजनेचा आदेशच रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आता उजनी जलाशयावरील इंदापूर विरूद्ध सोलापूर हा संघर्ष अधिक तीव्र होणार आहे. जिल्ह्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या इंदापूर तालुक्यातील अवर्षणप्रवण भागाला या निर्णयामुळे पाण्यासाठी उपेक्षाच सहन करावी लागणार आहे.

भीमा नदीवरील उजनी धरणासाठी इंदापूर तालुक्याचा मोठा त्याग आहे. मात्र, इंदापूर तालुक्यातील प्रत्येक निवडणुकीला पाण्यावरून राजकारण तापत होते. त्यामुळे गेली ३० वर्षापासून धगधगणा-या खडकवासला कालव्यावरील ३६ गावांचा व नीरा डावा कालव्यावरील २२ गावांचा पाणी प्रश्न उजनीवरील उपसा सिंचनला मंजुरी मिळाल्यामुळे सुटणार ,अशी अपेक्षा शेतक-यांना होती राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी यासाठी मोठी ताकद लावली होती. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या योजनेला कडाडुन विरोध केला. परिणामी जलसंपदा मंत्री जंयत पाटील यांच्याकडुन आदेश करण्यास भाग पाडले. याचे पडसाद तालुक्यात उमटू लागले आहेत. खडकवासला कालव्यावर पुणे शहराचा पाण्याचा भार वाढल्याने तालुका सिंचनासाठी संकटात आला आहे. खडकवासला कालव्याचा पट्टा हा अवर्षण प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या पट्ट्यात तालुक्याच्या इतर भागाच्या तुलनेत पर्जन्यमान कमी असते. कालव्याला पाणीही कधीच वेळेवर येत नसल्याने या भागातील शेतकरी अडचणीत आला आहे. सुमारे २० हजार हेक्टर शेती सिंचनासाठी या कालव्यावर अवलंबुन आहे. दरवर्षी उन्हाळ्यात आवर्तन देण्यास टाळाटाळ केली जाते. महत्वाच्या या पाणीप्रश्नी कायम सापत्नभावाची वागणूक ग्रामीण भागाला दिली जात होती. इंदापुर शहराचा पाणीपुरवठा व शेकडो ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजना या कालव्यावर अवलंबुन आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याचीही अवस्था उन्हाळ्यात गंभीर आहे. नवीन उपसा सिंचनमुळे शेटफळगढेपासून बेडशिंगेपर्यंत सुमारे ३६ गावामधील क्षेत्र बारमाही ओलिताखाली येणार होते.

तसेच खडकवासला कालव्यावरुन सणसर जोड कालव्यामधून २२ गावांना पाणी देण्यासाठी अनेक संघर्ष झाला. अनेक वेळा आंदोलने झाली मात्र अंथुर्णेपासुन पुढे २२ गावांना बारमाही पाणी मिळवण्यासाठी गेली ३० वर्षे लढा चालु होता.खडकवासला धरणसाखळीत पाणी कमी राहत असल्याने सणसर जोड बोगद्यालाही पाणी दिले जात नव्हते. आता या गावांनाही त्याचा मोठा फटका बसणार आहे.

तालुक्याने उजनी धरणासाठी मोठा त्याग केला आहे. २८ गावांना घरदारे जमिनीसह विस्थापित व्हावे लागले आहे. मात्र, त्याच तालुक्याला पाण्यासाठी उपेक्षा करावी लागत आहे.

—————————————————