शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

समाजाला हवे उद्बोधक साहित्य : प्रतिभाताई पाटील; पुण्यात अ‍ॅड. रावसाहेब शिंदे पुरस्कार वितरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 13:24 IST

उद्बोधक साहित्याची आणि हिऱ्यासारख्या साहित्यिकांची समाजाला गरज आहे, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केले.

ठळक मुद्देज्यांच्यासमोर नैवेद्य ठेवावा आणि ज्यांचा प्रसाद घ्यावा, असे देव आता उरलेले नाहीत : कर्णिक मागच्या पिढीने दिलेले देणे या पिढीने जपून ठेवले पाहिजे : कदम

पुणे : नवसमाजरचनेमध्ये अक्षर साहित्य समाजोपयोगी असण्याची गरज आहे. शरीराला ज्याप्रमाणे भरणपोषणाची आवश्यकता असते, त्याप्रमाणे मनाच्या उद्बोधनासाठी साहित्य, विचार, चिंतनाची गरज असते. जे लेखन वाचकांना अस्वस्थ करते, आत्मपरीक्षण करायला लावत नव्या जाणिवांचे दालन खुले करते, जुन्या मूल्यांची नव्याने जाणीव करून देते, अशा उद्बोधक साहित्याची आणि हिऱ्यासारख्या साहित्यिकांची समाजाला गरज आहे, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केले.महाराष्ट्र साहित्य कलाप्रसारिणी सभेतर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी अ‍ॅड. रावसाहेब शिंदे यांचा स्मृतिदिन आणि पुरस्कार प्रदान सोहळा गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ कमलकिशोर कदम यांना गौरविण्यात आले. उद्योजक विक्रम उरमोडे, कवयित्री सुप्रिया वाईकर, रवींद्र डोमळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य होते. प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, शशिकला रावसाहेब शिंदे उपस्थित होते. पाटील म्हणाल्या, ‘ऋषी, साधू होण्यासाठी हातात कमंडलू घेऊन, विशिष्ट रंगाचे कपडे घालून हिमालयात जायला पाहिजे, असे नाही. राजकारण, समाजकारणात उत्तम काम करूनही ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आकाराला येते. रावसाहेबांना भेटल्यावर माहेरच्या माणसाला भेटल्यासारखा आनंद व्हायचा. 

ज्यांच्यासमोरनैवेद्य ठेवावा आणि ज्यांचा प्रसाद घ्यावा, असे देव आता उरलेले नाहीत. रावसाहेब शिंदे यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाच्या नावाचा पुरस्कार म्हणजे प्रसाद आहे. समाजाची सात्त्विकता, सुसंस्कृतता आणि सामाजिकता जपणारी आमची बहुधा शेवटची पिढी आहे. - मधू मंगेश कर्णिक

कदम म्हणाले, ‘शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या मोठ्या माणसांनी या शहराचा समृद्ध इतिहास घडवला. मागच्या पिढीने दिलेले देणे या पिढीने जपून ठेवले पाहिजे, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवावे. त्यातूनच महाराष्ट्राचे उजवल भवितव्य घडेल.’

भावे म्हणाले, ‘निवडणुकीत ८० टक्के मतदान गरीब तर २० टक्के मतदान श्रीमंत करतात. मात्र, निवडणुकीनंतर २० टक्के श्रीमंत लोकांनाच लाभ मिळतो. सध्या पद्मावती हा प्रश्न नाही, तर रोजगार हा खरा प्रश्न आहे.’

वैद्य म्हणाले, ‘रावसाहेब शिंदे यांचे जीवन म्हणजे ध्यासपर्व आहे. प्रत्येक कामामध्ये त्यांनी सर्वस्व अर्पण केले. आपल्या देशातील माणसे अशी सुसंस्कृत झाली तर आपला देश जगातील संस्कृतीच्या शिखरावर जाऊन बसेल.’

उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. सचिन ईटकर यांनी प्रास्ताविक केले.

टॅग्स :Pratibha Devisingh Patilप्रतिभा देवीसिंग पाटीलBhai Vaidyaभाई वैद्य