शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

समाजाला हवे उद्बोधक साहित्य : प्रतिभाताई पाटील; पुण्यात अ‍ॅड. रावसाहेब शिंदे पुरस्कार वितरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 13:24 IST

उद्बोधक साहित्याची आणि हिऱ्यासारख्या साहित्यिकांची समाजाला गरज आहे, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केले.

ठळक मुद्देज्यांच्यासमोर नैवेद्य ठेवावा आणि ज्यांचा प्रसाद घ्यावा, असे देव आता उरलेले नाहीत : कर्णिक मागच्या पिढीने दिलेले देणे या पिढीने जपून ठेवले पाहिजे : कदम

पुणे : नवसमाजरचनेमध्ये अक्षर साहित्य समाजोपयोगी असण्याची गरज आहे. शरीराला ज्याप्रमाणे भरणपोषणाची आवश्यकता असते, त्याप्रमाणे मनाच्या उद्बोधनासाठी साहित्य, विचार, चिंतनाची गरज असते. जे लेखन वाचकांना अस्वस्थ करते, आत्मपरीक्षण करायला लावत नव्या जाणिवांचे दालन खुले करते, जुन्या मूल्यांची नव्याने जाणीव करून देते, अशा उद्बोधक साहित्याची आणि हिऱ्यासारख्या साहित्यिकांची समाजाला गरज आहे, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केले.महाराष्ट्र साहित्य कलाप्रसारिणी सभेतर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी अ‍ॅड. रावसाहेब शिंदे यांचा स्मृतिदिन आणि पुरस्कार प्रदान सोहळा गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ कमलकिशोर कदम यांना गौरविण्यात आले. उद्योजक विक्रम उरमोडे, कवयित्री सुप्रिया वाईकर, रवींद्र डोमळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य होते. प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, शशिकला रावसाहेब शिंदे उपस्थित होते. पाटील म्हणाल्या, ‘ऋषी, साधू होण्यासाठी हातात कमंडलू घेऊन, विशिष्ट रंगाचे कपडे घालून हिमालयात जायला पाहिजे, असे नाही. राजकारण, समाजकारणात उत्तम काम करूनही ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आकाराला येते. रावसाहेबांना भेटल्यावर माहेरच्या माणसाला भेटल्यासारखा आनंद व्हायचा. 

ज्यांच्यासमोरनैवेद्य ठेवावा आणि ज्यांचा प्रसाद घ्यावा, असे देव आता उरलेले नाहीत. रावसाहेब शिंदे यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाच्या नावाचा पुरस्कार म्हणजे प्रसाद आहे. समाजाची सात्त्विकता, सुसंस्कृतता आणि सामाजिकता जपणारी आमची बहुधा शेवटची पिढी आहे. - मधू मंगेश कर्णिक

कदम म्हणाले, ‘शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या मोठ्या माणसांनी या शहराचा समृद्ध इतिहास घडवला. मागच्या पिढीने दिलेले देणे या पिढीने जपून ठेवले पाहिजे, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवावे. त्यातूनच महाराष्ट्राचे उजवल भवितव्य घडेल.’

भावे म्हणाले, ‘निवडणुकीत ८० टक्के मतदान गरीब तर २० टक्के मतदान श्रीमंत करतात. मात्र, निवडणुकीनंतर २० टक्के श्रीमंत लोकांनाच लाभ मिळतो. सध्या पद्मावती हा प्रश्न नाही, तर रोजगार हा खरा प्रश्न आहे.’

वैद्य म्हणाले, ‘रावसाहेब शिंदे यांचे जीवन म्हणजे ध्यासपर्व आहे. प्रत्येक कामामध्ये त्यांनी सर्वस्व अर्पण केले. आपल्या देशातील माणसे अशी सुसंस्कृत झाली तर आपला देश जगातील संस्कृतीच्या शिखरावर जाऊन बसेल.’

उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. सचिन ईटकर यांनी प्रास्ताविक केले.

टॅग्स :Pratibha Devisingh Patilप्रतिभा देवीसिंग पाटीलBhai Vaidyaभाई वैद्य