शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

समाजकार्य महाविद्यालये करणार समाजाभिमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लोकांपासून बाजूला पडलेली राज्यातील समाजकार्य महाविद्यालये आता कात टाकत आहेत. सामाजिक न्याय विभागाने सर्व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : लोकांपासून बाजूला पडलेली राज्यातील समाजकार्य महाविद्यालये आता कात टाकत आहेत. सामाजिक न्याय विभागाने सर्व महाविद्यालये समाजाभिमुख करण्याचा निर्णय घेतला असून, त्यादृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

या महाविद्यालयांचा जुना झालेला अभ्यासक्रम बदलण्यात येत आहे. त्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांंनी नुकतीच सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेतली. आता या महाविद्यालयांमधील प्राध्यापकांची ऑनलाईन कार्यशाळा होत आहे.

राज्यात एकूण ५४ समाजकार्य महाविद्यालये आहेत. ‘बॅचलर ऑफ सोशल वर्क’ पदवी व ‘मास्टर ऑफ सोशल वर्क’ हे पदव्युत्तर शिक्षण तिथे दिले जाते. समाजात राहून सामाजिक काम करणारे युवक तयार व्हावेत, यासाठी या महाविद्यालयांची स्थापना झाली. मात्र, आता तो उद्देश बाजूला पडला असून केवळ काहीतरी पदवी मिळवायची म्हणून काम सुरू आहे. त्यामुळेच आता नव्या बदलानुसार अभ्यासक्रमाची रचना होत आहे.

यात प्रामुख्याने विद्यार्थी एखाद्या उद्योगाबरोबर, मोठ्या प्रकल्पाबरोबर जोडून देण्यात येतील. कामगार, प्रकल्पबाधित यांच्याशी उद्योगाच्या, सरकारच्यावतीने संवाद साधणे, त्यांच्यासाठी नव्या योजना तयार करणे, असे काम कार्यानुभव म्हणून विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात येईल. याशिवाय वंचित, उपेक्षित लोकसमूहाशी संवाध साधणे, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सरकारसमोर आणणे, कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व फंडाचा (सीएसआर) वापर रचनात्मक कामांसाठी करणे, अशी कामेही त्यांना शिकवण्यात येतील.

चौकट

“समाज आणि सरकार, उद्योग आणि कर्मचारी, प्रकल्प आणि त्यामुळे होणारे बाधित यांच्यातील दुवा म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना व घेतल्यानंतरही कार्यरत व्हावे हे अपेक्षित आहे. यातूनच नोकरीही मिळेल. समाजकार्य महाविद्यालये शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आहे.”

-डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, सामाजिक न्याय विभाग