शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

समाजकार्य महाविद्यालये करणार समाजाभिमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लोकांपासून बाजूला पडलेली राज्यातील समाजकार्य महाविद्यालये आता कात टाकत आहेत. सामाजिक न्याय विभागाने सर्व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : लोकांपासून बाजूला पडलेली राज्यातील समाजकार्य महाविद्यालये आता कात टाकत आहेत. सामाजिक न्याय विभागाने सर्व महाविद्यालये समाजाभिमुख करण्याचा निर्णय घेतला असून, त्यादृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

या महाविद्यालयांचा जुना झालेला अभ्यासक्रम बदलण्यात येत आहे. त्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांंनी नुकतीच सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेतली. आता या महाविद्यालयांमधील प्राध्यापकांची ऑनलाईन कार्यशाळा होत आहे.

राज्यात एकूण ५४ समाजकार्य महाविद्यालये आहेत. ‘बॅचलर ऑफ सोशल वर्क’ पदवी व ‘मास्टर ऑफ सोशल वर्क’ हे पदव्युत्तर शिक्षण तिथे दिले जाते. समाजात राहून सामाजिक काम करणारे युवक तयार व्हावेत, यासाठी या महाविद्यालयांची स्थापना झाली. मात्र, आता तो उद्देश बाजूला पडला असून केवळ काहीतरी पदवी मिळवायची म्हणून काम सुरू आहे. त्यामुळेच आता नव्या बदलानुसार अभ्यासक्रमाची रचना होत आहे.

यात प्रामुख्याने विद्यार्थी एखाद्या उद्योगाबरोबर, मोठ्या प्रकल्पाबरोबर जोडून देण्यात येतील. कामगार, प्रकल्पबाधित यांच्याशी उद्योगाच्या, सरकारच्यावतीने संवाद साधणे, त्यांच्यासाठी नव्या योजना तयार करणे, असे काम कार्यानुभव म्हणून विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात येईल. याशिवाय वंचित, उपेक्षित लोकसमूहाशी संवाध साधणे, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सरकारसमोर आणणे, कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व फंडाचा (सीएसआर) वापर रचनात्मक कामांसाठी करणे, अशी कामेही त्यांना शिकवण्यात येतील.

चौकट

“समाज आणि सरकार, उद्योग आणि कर्मचारी, प्रकल्प आणि त्यामुळे होणारे बाधित यांच्यातील दुवा म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना व घेतल्यानंतरही कार्यरत व्हावे हे अपेक्षित आहे. यातूनच नोकरीही मिळेल. समाजकार्य महाविद्यालये शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आहे.”

-डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, सामाजिक न्याय विभाग