शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

समाजकार्य महाविद्यालये करणार समाजाभिमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लोकांपासून बाजूला पडलेली राज्यातील समाजकार्य महाविद्यालये आता कात टाकत आहेत. सामाजिक न्याय विभागाने सर्व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : लोकांपासून बाजूला पडलेली राज्यातील समाजकार्य महाविद्यालये आता कात टाकत आहेत. सामाजिक न्याय विभागाने सर्व महाविद्यालये समाजाभिमुख करण्याचा निर्णय घेतला असून, त्यादृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

या महाविद्यालयांचा जुना झालेला अभ्यासक्रम बदलण्यात येत आहे. त्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांंनी नुकतीच सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेतली. आता या महाविद्यालयांमधील प्राध्यापकांची ऑनलाईन कार्यशाळा होत आहे.

राज्यात एकूण ५४ समाजकार्य महाविद्यालये आहेत. ‘बॅचलर ऑफ सोशल वर्क’ पदवी व ‘मास्टर ऑफ सोशल वर्क’ हे पदव्युत्तर शिक्षण तिथे दिले जाते. समाजात राहून सामाजिक काम करणारे युवक तयार व्हावेत, यासाठी या महाविद्यालयांची स्थापना झाली. मात्र, आता तो उद्देश बाजूला पडला असून केवळ काहीतरी पदवी मिळवायची म्हणून काम सुरू आहे. त्यामुळेच आता नव्या बदलानुसार अभ्यासक्रमाची रचना होत आहे.

यात प्रामुख्याने विद्यार्थी एखाद्या उद्योगाबरोबर, मोठ्या प्रकल्पाबरोबर जोडून देण्यात येतील. कामगार, प्रकल्पबाधित यांच्याशी उद्योगाच्या, सरकारच्यावतीने संवाद साधणे, त्यांच्यासाठी नव्या योजना तयार करणे, असे काम कार्यानुभव म्हणून विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात येईल. याशिवाय वंचित, उपेक्षित लोकसमूहाशी संवाध साधणे, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सरकारसमोर आणणे, कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व फंडाचा (सीएसआर) वापर रचनात्मक कामांसाठी करणे, अशी कामेही त्यांना शिकवण्यात येतील.

चौकट

“समाज आणि सरकार, उद्योग आणि कर्मचारी, प्रकल्प आणि त्यामुळे होणारे बाधित यांच्यातील दुवा म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना व घेतल्यानंतरही कार्यरत व्हावे हे अपेक्षित आहे. यातूनच नोकरीही मिळेल. समाजकार्य महाविद्यालये शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आहे.”

-डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, सामाजिक न्याय विभाग