शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठातून सामाजिक एकता पेरावी

By admin | Updated: April 27, 2017 05:21 IST

देशभरात असहिष्णुता वाढत असून, अतिरेकी धर्मांधता फोफावत आहे. अशा द्वेषाच्या पायावर देश महासत्ता कदापि होऊ शकणार नाही.

पुणे : देशभरात असहिष्णुता वाढत असून, अतिरेकी धर्मांधता फोफावत आहे. अशा द्वेषाच्या पायावर देश महासत्ता कदापि होऊ शकणार नाही. याविरोधात लढण्याची वेळ आली असून, विद्यापीठांतून सामाजिक एकतेची बीजे पेरली जावीत, असे मत ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.कात्रज येथील भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या २२ व्या स्थापना दिन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख, प्रसिद्ध विनोदी साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार, फिजिशियन आणि समाजसेवक डॉ. विनोद शहा, माजी कुलगुरु डॉ. एस. एफ. पाटील यांना भारती विद्यापीठ विश्वविद्यालय जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यापीठ विश्वविद्यालयाचे संस्थापक, कुलपती डॉ. पतंगराव कदम, कुलगुरू प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह विश्वजित कदम, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, माजी कुलगुरू उत्तमराव भोईटे, कुलसचिव जी. जयकुमार उपस्थित होते. काळे म्हणाले, ‘‘भौतिक ज्ञानाच्या विकासावर देश महासत्ता होणार नाही, त्याला सांस्कृतिक संचिताचीही जोड देणे गरजेचे आहे. खरे तर सामाजिक हेतू नसणारे ज्ञान हे व्यर्थच असते. आज त्या ज्ञानात जातीयतेचे हिरवे, भगवे आणि निळे रंग मिसळले जात आहेत. आपल्या धर्माच्या अतिरेकी प्रेमावर आणि इतर धर्माच्या अविवेकी द्वेषावर या देशाच्या महासत्तेची इमारत उभी राहू शकणार नाही. देशात असहिष्णुता वाढत असून, सत्तेसाठी धर्माचे राजकारण केले जात आहे. त्याविरोधात लढण्याची वेळ आली आहे.’’