शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
7
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
8
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
9
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
10
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
11
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
12
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
13
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
15
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
16
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
17
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
18
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
20
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP

विद्यापीठातून सामाजिक एकता पेरावी

By admin | Updated: April 27, 2017 05:21 IST

देशभरात असहिष्णुता वाढत असून, अतिरेकी धर्मांधता फोफावत आहे. अशा द्वेषाच्या पायावर देश महासत्ता कदापि होऊ शकणार नाही.

पुणे : देशभरात असहिष्णुता वाढत असून, अतिरेकी धर्मांधता फोफावत आहे. अशा द्वेषाच्या पायावर देश महासत्ता कदापि होऊ शकणार नाही. याविरोधात लढण्याची वेळ आली असून, विद्यापीठांतून सामाजिक एकतेची बीजे पेरली जावीत, असे मत ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.कात्रज येथील भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या २२ व्या स्थापना दिन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख, प्रसिद्ध विनोदी साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार, फिजिशियन आणि समाजसेवक डॉ. विनोद शहा, माजी कुलगुरु डॉ. एस. एफ. पाटील यांना भारती विद्यापीठ विश्वविद्यालय जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यापीठ विश्वविद्यालयाचे संस्थापक, कुलपती डॉ. पतंगराव कदम, कुलगुरू प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह विश्वजित कदम, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, माजी कुलगुरू उत्तमराव भोईटे, कुलसचिव जी. जयकुमार उपस्थित होते. काळे म्हणाले, ‘‘भौतिक ज्ञानाच्या विकासावर देश महासत्ता होणार नाही, त्याला सांस्कृतिक संचिताचीही जोड देणे गरजेचे आहे. खरे तर सामाजिक हेतू नसणारे ज्ञान हे व्यर्थच असते. आज त्या ज्ञानात जातीयतेचे हिरवे, भगवे आणि निळे रंग मिसळले जात आहेत. आपल्या धर्माच्या अतिरेकी प्रेमावर आणि इतर धर्माच्या अविवेकी द्वेषावर या देशाच्या महासत्तेची इमारत उभी राहू शकणार नाही. देशात असहिष्णुता वाढत असून, सत्तेसाठी धर्माचे राजकारण केले जात आहे. त्याविरोधात लढण्याची वेळ आली आहे.’’