शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सामाजिक असमतोल धोकादायक

By admin | Updated: February 6, 2017 05:54 IST

जागतिकीकरणात देशात आर्थिक उलाढाल वाढली. परंतु, त्याचा फायदा १५ टक्के श्रीमंतांना झाला. गरीब-श्रीमंतीचा असमतोल दूर झाला नाही.

बारामती : जागतिकीकरणात देशात आर्थिक उलाढाल वाढली. परंतु, त्याचा फायदा १५ टक्के श्रीमंतांना झाला. गरीब-श्रीमंतीचा असमतोल दूर झाला नाही. त्यामुळे भविष्यात देशातील कामगार, दलित, शोषित बंड करून उठेल, हे भारतीय लोकशाहीसमोर मोठे आव्हान आहे, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले.बारामतीमध्ये आयोजित रमाई व्याख्यानमालेत मुणगेकर बोलत होते. सतत वाढणारी गरीब-श्रीमंतीची दरी अडचणीची ठरत आहे. जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश म्हणून भारताची ओळख आहे. विविध जाती, पंथ, धर्म असताना संसदीय प्रणालीचा आत्मा असणारा हा खंडप्राय देश केवळ राज्यघटनेमुळेच एकसंध आहे. परंतु, अलीकडच्या काळात वाढलेली असहिष्णूता देशासमोर मोठे आव्हान आहे. त्याचबरोबर स्त्रियांवरील अत्याचार, धार्मिक तेढ आणि सर्वांत महत्त्वाचे मतदानासाठी मतदाराला पैशाची अपेक्षा ठेवण्याचा प्रकार हा धोकादायक आहे. याच व्याख्यानमालेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्त्वज्ञान देशाला प्रगतीच्या दिशेने नेणारे आहे. बाबासाहेबांनी स्त्रियांना प्रसूतीची पगारी रजा देशातील सर्वधर्मीयांबरोबरच शेतकरी, शेतमजुरांचा विचार केला. महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वतंत्र कायद्याची मागणी केली. नदीजोड प्रकल्प हा त्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. त्यांच्याच काळात मोठी धरणे झाली. नदीजोड प्रकल्प कार्यान्वित झाले असते तर आज शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली नसती, असे ज्येष्ठ समीक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी या वेळी सांगितले. डॉ. मंगल ससाणे, प्रा. डॉ. मिलिंद कांबळे, प्रा. डॉ. प्रदीप सरवदे, डॉ. करुणा कांबळे यांचा पीएचडी पदवी मिळविल्याबद्दल गौरव करण्यात आला. त्याचबरोबर माजी प्राचार्य तथा विचारवंत डॉ. एस. पी. कदम यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी पांडुरंग शेलार, प्रा. महेंद्रकुमार साळवे यांची भाषणे झाली. प्रा. बालाजी कांबळे, प्रा. राजेंद्र चाटसे, प्रा. ज्योती चव्हाण, डॉ. निलकंठ ढोणे, डॉ. विलास आढाव, नगरसेवक सचिन सातव, संजय मोरे, धनपाल भोसले यांच्यासह माता रमाई आंबेडकर प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. (वार्ताहर)