शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील वीजबिलाचं भिजत घोंगडं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:17 IST

कुरकुंभ : ग्रामीण भागातील गावांच्या रस्त्यावरील विजेच्या खोळंबलेल्या कोट्यवधी रुपयांच्या बिलाच्या रकमेमुळे सध्या महावितरण कंपनीने वीजतोड केली आहे. त्यामुळे ...

कुरकुंभ : ग्रामीण भागातील गावांच्या रस्त्यावरील विजेच्या खोळंबलेल्या कोट्यवधी रुपयांच्या बिलाच्या रकमेमुळे सध्या महावितरण कंपनीने वीजतोड केली आहे. त्यामुळे रात्री ग्रामीण भागातील रस्त्यांवर सर्वत्र काळोख पसरलेला आहे. या अंधाराचा फायदा घेत घरफोड्या व किरकोळ चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांना जागते रहो, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

वाढत्या नागरीकरणामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला ग्रामस्थांना रस्ते, वीज, पाणी अशा मूलभूत समस्या प्राथमिकतेने सोडवल्या जातात. परिणामी जिल्हा परिषद व तत्सम यंत्रणेच्या मंजूर असलेल्या कामांच्या नियमबाह्य कामे करून सुविधा उपलब्ध केल्या जातात. यामुळे गावातील गावठाण, वाड्यावस्त्या, नवीन तयार झालेल्या वसाहती तसेच जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक विद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, बाजारतळ, मुख्य चौकांसह गावातून जाणारे रस्ते व इतर सामाजिक ठिकाणे यावर विजेचे खांब उभे केले जातात. मात्र, दिवसेंदिवस याचे प्रमाण वाढल्याने वीजबिलाची थकीत रक्कम कोट्यवधीपर्यंत पोचली आहे. याचा तोटा महावितरणला होत आहे.

वीजबिलाची रक्कम जिल्हा परिषदेच्या मार्फत भरली जात होती. ती बंद करण्यात आली व ही रक्कम कोणी व कशी भरावी याबाबत काहीच नियमावली शासनाच्या वतीने करण्यात आली नसल्याने थकलेल्या बिलाच्या रकमेत वाढ झालेली आहे. मात्र याबाबत शासनस्तरावर गांभीर्याने विषय मांडून तो सोडवून घेण्याऐवजी थेट वीजप्रवाह खंडित करण्याची आडमुठी भूमिका महावितरण व तत्सम विभागाने घेतल्याने सर्वसामान्य नागरिक यामध्ये भरडून निघत आहे.

याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्णय घेण्याची भूमिका मांडली असली तरी अद्यापपर्यंत त्यामध्ये फारशी सुधारणा झालेली आढळत नाही.

ग्रामपंचायत सरपंच व इतर अधिकारी वर्गाकडून ही रक्कम ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या सातव्या वेतन आयोगाच्या रकमेतून खर्च करावी लागणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, याबाबत कोणीच शासक नसल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस खेड्यांचे स्वरूप बदलत असताना ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या निधीत वाढ होण्याऐवजी वीजबिलाच्या माध्यमातून त्यावर आणखी गदाच येणार. मात्र यामुळे ग्रामीण भागातील सुरक्षा यंत्रणा चांगलीच प्रभावित झाल्याचे दिसून येत आहे.