शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

ग्रामीण भागातील वीजबिलाचं भिजत घोंगडं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:17 IST

कुरकुंभ : ग्रामीण भागातील गावांच्या रस्त्यावरील विजेच्या खोळंबलेल्या कोट्यवधी रुपयांच्या बिलाच्या रकमेमुळे सध्या महावितरण कंपनीने वीजतोड केली आहे. त्यामुळे ...

कुरकुंभ : ग्रामीण भागातील गावांच्या रस्त्यावरील विजेच्या खोळंबलेल्या कोट्यवधी रुपयांच्या बिलाच्या रकमेमुळे सध्या महावितरण कंपनीने वीजतोड केली आहे. त्यामुळे रात्री ग्रामीण भागातील रस्त्यांवर सर्वत्र काळोख पसरलेला आहे. या अंधाराचा फायदा घेत घरफोड्या व किरकोळ चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांना जागते रहो, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

वाढत्या नागरीकरणामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला ग्रामस्थांना रस्ते, वीज, पाणी अशा मूलभूत समस्या प्राथमिकतेने सोडवल्या जातात. परिणामी जिल्हा परिषद व तत्सम यंत्रणेच्या मंजूर असलेल्या कामांच्या नियमबाह्य कामे करून सुविधा उपलब्ध केल्या जातात. यामुळे गावातील गावठाण, वाड्यावस्त्या, नवीन तयार झालेल्या वसाहती तसेच जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक विद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, बाजारतळ, मुख्य चौकांसह गावातून जाणारे रस्ते व इतर सामाजिक ठिकाणे यावर विजेचे खांब उभे केले जातात. मात्र, दिवसेंदिवस याचे प्रमाण वाढल्याने वीजबिलाची थकीत रक्कम कोट्यवधीपर्यंत पोचली आहे. याचा तोटा महावितरणला होत आहे.

वीजबिलाची रक्कम जिल्हा परिषदेच्या मार्फत भरली जात होती. ती बंद करण्यात आली व ही रक्कम कोणी व कशी भरावी याबाबत काहीच नियमावली शासनाच्या वतीने करण्यात आली नसल्याने थकलेल्या बिलाच्या रकमेत वाढ झालेली आहे. मात्र याबाबत शासनस्तरावर गांभीर्याने विषय मांडून तो सोडवून घेण्याऐवजी थेट वीजप्रवाह खंडित करण्याची आडमुठी भूमिका महावितरण व तत्सम विभागाने घेतल्याने सर्वसामान्य नागरिक यामध्ये भरडून निघत आहे.

याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्णय घेण्याची भूमिका मांडली असली तरी अद्यापपर्यंत त्यामध्ये फारशी सुधारणा झालेली आढळत नाही.

ग्रामपंचायत सरपंच व इतर अधिकारी वर्गाकडून ही रक्कम ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या सातव्या वेतन आयोगाच्या रकमेतून खर्च करावी लागणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, याबाबत कोणीच शासक नसल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस खेड्यांचे स्वरूप बदलत असताना ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या निधीत वाढ होण्याऐवजी वीजबिलाच्या माध्यमातून त्यावर आणखी गदाच येणार. मात्र यामुळे ग्रामीण भागातील सुरक्षा यंत्रणा चांगलीच प्रभावित झाल्याचे दिसून येत आहे.