शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

ग्रामीण भागातील वीजबिलाचं भिजत घोंगडं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:17 IST

कुरकुंभ : ग्रामीण भागातील गावांच्या रस्त्यावरील विजेच्या खोळंबलेल्या कोट्यवधी रुपयांच्या बिलाच्या रकमेमुळे सध्या महावितरण कंपनीने वीजतोड केली आहे. त्यामुळे ...

कुरकुंभ : ग्रामीण भागातील गावांच्या रस्त्यावरील विजेच्या खोळंबलेल्या कोट्यवधी रुपयांच्या बिलाच्या रकमेमुळे सध्या महावितरण कंपनीने वीजतोड केली आहे. त्यामुळे रात्री ग्रामीण भागातील रस्त्यांवर सर्वत्र काळोख पसरलेला आहे. या अंधाराचा फायदा घेत घरफोड्या व किरकोळ चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांना जागते रहो, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

वाढत्या नागरीकरणामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला ग्रामस्थांना रस्ते, वीज, पाणी अशा मूलभूत समस्या प्राथमिकतेने सोडवल्या जातात. परिणामी जिल्हा परिषद व तत्सम यंत्रणेच्या मंजूर असलेल्या कामांच्या नियमबाह्य कामे करून सुविधा उपलब्ध केल्या जातात. यामुळे गावातील गावठाण, वाड्यावस्त्या, नवीन तयार झालेल्या वसाहती तसेच जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक विद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, बाजारतळ, मुख्य चौकांसह गावातून जाणारे रस्ते व इतर सामाजिक ठिकाणे यावर विजेचे खांब उभे केले जातात. मात्र, दिवसेंदिवस याचे प्रमाण वाढल्याने वीजबिलाची थकीत रक्कम कोट्यवधीपर्यंत पोचली आहे. याचा तोटा महावितरणला होत आहे.

वीजबिलाची रक्कम जिल्हा परिषदेच्या मार्फत भरली जात होती. ती बंद करण्यात आली व ही रक्कम कोणी व कशी भरावी याबाबत काहीच नियमावली शासनाच्या वतीने करण्यात आली नसल्याने थकलेल्या बिलाच्या रकमेत वाढ झालेली आहे. मात्र याबाबत शासनस्तरावर गांभीर्याने विषय मांडून तो सोडवून घेण्याऐवजी थेट वीजप्रवाह खंडित करण्याची आडमुठी भूमिका महावितरण व तत्सम विभागाने घेतल्याने सर्वसामान्य नागरिक यामध्ये भरडून निघत आहे.

याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्णय घेण्याची भूमिका मांडली असली तरी अद्यापपर्यंत त्यामध्ये फारशी सुधारणा झालेली आढळत नाही.

ग्रामपंचायत सरपंच व इतर अधिकारी वर्गाकडून ही रक्कम ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या सातव्या वेतन आयोगाच्या रकमेतून खर्च करावी लागणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, याबाबत कोणीच शासक नसल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस खेड्यांचे स्वरूप बदलत असताना ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या निधीत वाढ होण्याऐवजी वीजबिलाच्या माध्यमातून त्यावर आणखी गदाच येणार. मात्र यामुळे ग्रामीण भागातील सुरक्षा यंत्रणा चांगलीच प्रभावित झाल्याचे दिसून येत आहे.