शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
2
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
3
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
4
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
5
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
6
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
7
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
8
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
9
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
10
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
11
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
12
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
13
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
14
Rana Daggubati Weight Loss: नॉनव्हेज पूर्ण बंद, मीठ कमी आणि...; तब्बल ३० किलो वजन घटवण्याचा 'भल्लालदेव' फॉर्म्युला
15
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
16
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
17
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
18
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
19
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
20
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
Daily Top 2Weekly Top 5

... तर कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी ईडी कार्यालयावर मोर्चा काढू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 19:14 IST

सध्या देशात सत्ताधारी भाजपच्या कारभाराविरोधात आवाज उठविणाऱ्या विरोधकांच्या मागे सीबीआय, (अंमलबजावणी संचालनालय) ईडीमार्फत चौकशी लावली जात आहे.

पुणे  : सध्या देशात सत्ताधारी भाजपच्या कारभाराविरोधात आवाज उठविणाऱ्या विरोधकांच्या मागे सीबीआय, (अंमलबजावणी संचालनालय) ईडीमार्फत चौकशी लावली जात आहे. त्यामुळे विरोधक भयभीत झाले आहे. तसेच सामान्य शेतकऱ्यांची फसवणूक झालेल्या कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी संबंधित दोषींवर ईडी मार्फत चौकशी न झाल्यास लवकरच ईडी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिला.     पुण्यात विविध पुरोगामी पक्ष, संघटनांनी एकत्र येत प्रजा लोकशाही परिषद या आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीची घोषणा करताना ते बोलत होते. बेरोजगारी, महापुराचे संकट, कर्ज माफी, तरुणांना किती रोजगार दिले. शासकीय योजना किती यशस्वी झाल्या. यावर महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधतील अशी अपेक्षा होती. मात्र यावर एकही शब्द बोलत नाहीत. यामुळे मुख्यमंत्र्यांना अनेक ठिकाणी रोषाला सामोरे जावे लागले आहे. तर ही महाजनादेश यात्रा नसून जनतेवर लादलेली यात्रा आहे. अशा शब्दात  राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेवर टीका केली.       बारा बलुतेदार अठरा अलुतेदार व भटके, ओबीसी अशा वंचित घटकांना  हक्क, न्याय मिळावा.  यासाठी परिषेदेच्या माध्यमातून चळवळ उभी करणार आहोत. तसेच ही अराजकीय आघाडी असली तरी, यातील प्रत्येत घटकानुसार जे ते नेते विधानसभा निवडणुकीला समोरे जाणार आहेत. जाती, धर्मामध्ये तेढ निर्माण करून राजकारण करणाऱ्या पक्षांच्या विरोधात आम्ही लढणार आहोत. परिषेदेचा मेळावा  येत्या २० सप्टेंबर पुण्यात घेतला जाणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. निवणुकीमध्ये नक्कीच परिषद परिणाकारक ठरले, असेही ते म्हणाले. विधानसभा निवडणुक स्वाभिमानी पक्ष लढविणार का या प्रश्नावर उत्तर ते म्हणाले की, भाजप आणि शिवसेना या जातीवादी पक्षाला बाजूला ठेवण्यासाठी राज्यातील छोटे छोटे पक्ष एकत्रित करून महाआघाडी करूनच आगामी निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.पाकिस्तानवर भाजपचे विशेष प्रेमकांद्याचे भाव दोन रुपये किलो असताना, कांदा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली, त्यावेळी सरकार कुठे होते. आताही शेतकऱ्यांना २३ रुपयांवर भाव मिळत नाही, तर रिटेलमध्ये कांदा ३९ रुपये किलोला विकला जातो, याची सरकारने माहिती घ्यावी. शेतकाऱ्यांना दोन पैसे मिळत असताना सरकारने कांदा आयात करू नये. कोणत्याही देशातून कांदा आयात करण्यास आमचा विरोध आहे. मात्र, या सरकारला पाकिस्तानचा कांदा, साखर गोड लागते. त्यामुळे सरकारचे पाकिस्तानवर विशेष प्रेम दिसून येते, इम्रान खान यांचे हात बळकट करत आहात का? असा सवाल शेट्टी उपस्थित केला.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSadabhau Khotसदाभाउ खोत