शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

... तर कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी ईडी कार्यालयावर मोर्चा काढू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 19:14 IST

सध्या देशात सत्ताधारी भाजपच्या कारभाराविरोधात आवाज उठविणाऱ्या विरोधकांच्या मागे सीबीआय, (अंमलबजावणी संचालनालय) ईडीमार्फत चौकशी लावली जात आहे.

पुणे  : सध्या देशात सत्ताधारी भाजपच्या कारभाराविरोधात आवाज उठविणाऱ्या विरोधकांच्या मागे सीबीआय, (अंमलबजावणी संचालनालय) ईडीमार्फत चौकशी लावली जात आहे. त्यामुळे विरोधक भयभीत झाले आहे. तसेच सामान्य शेतकऱ्यांची फसवणूक झालेल्या कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी संबंधित दोषींवर ईडी मार्फत चौकशी न झाल्यास लवकरच ईडी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिला.     पुण्यात विविध पुरोगामी पक्ष, संघटनांनी एकत्र येत प्रजा लोकशाही परिषद या आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीची घोषणा करताना ते बोलत होते. बेरोजगारी, महापुराचे संकट, कर्ज माफी, तरुणांना किती रोजगार दिले. शासकीय योजना किती यशस्वी झाल्या. यावर महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधतील अशी अपेक्षा होती. मात्र यावर एकही शब्द बोलत नाहीत. यामुळे मुख्यमंत्र्यांना अनेक ठिकाणी रोषाला सामोरे जावे लागले आहे. तर ही महाजनादेश यात्रा नसून जनतेवर लादलेली यात्रा आहे. अशा शब्दात  राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेवर टीका केली.       बारा बलुतेदार अठरा अलुतेदार व भटके, ओबीसी अशा वंचित घटकांना  हक्क, न्याय मिळावा.  यासाठी परिषेदेच्या माध्यमातून चळवळ उभी करणार आहोत. तसेच ही अराजकीय आघाडी असली तरी, यातील प्रत्येत घटकानुसार जे ते नेते विधानसभा निवडणुकीला समोरे जाणार आहेत. जाती, धर्मामध्ये तेढ निर्माण करून राजकारण करणाऱ्या पक्षांच्या विरोधात आम्ही लढणार आहोत. परिषेदेचा मेळावा  येत्या २० सप्टेंबर पुण्यात घेतला जाणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. निवणुकीमध्ये नक्कीच परिषद परिणाकारक ठरले, असेही ते म्हणाले. विधानसभा निवडणुक स्वाभिमानी पक्ष लढविणार का या प्रश्नावर उत्तर ते म्हणाले की, भाजप आणि शिवसेना या जातीवादी पक्षाला बाजूला ठेवण्यासाठी राज्यातील छोटे छोटे पक्ष एकत्रित करून महाआघाडी करूनच आगामी निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.पाकिस्तानवर भाजपचे विशेष प्रेमकांद्याचे भाव दोन रुपये किलो असताना, कांदा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली, त्यावेळी सरकार कुठे होते. आताही शेतकऱ्यांना २३ रुपयांवर भाव मिळत नाही, तर रिटेलमध्ये कांदा ३९ रुपये किलोला विकला जातो, याची सरकारने माहिती घ्यावी. शेतकाऱ्यांना दोन पैसे मिळत असताना सरकारने कांदा आयात करू नये. कोणत्याही देशातून कांदा आयात करण्यास आमचा विरोध आहे. मात्र, या सरकारला पाकिस्तानचा कांदा, साखर गोड लागते. त्यामुळे सरकारचे पाकिस्तानवर विशेष प्रेम दिसून येते, इम्रान खान यांचे हात बळकट करत आहात का? असा सवाल शेट्टी उपस्थित केला.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSadabhau Khotसदाभाउ खोत