शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ७४ ग्रामपंचायतींमध्ये वायफाय सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : केंद्र शासनाच्या ‘भारत नेट’ अंतर्गत ग्रामीण भागात गावा-गावांत बीबीएनल व सीएससीच्या वतीने फायबर ऑपटिक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : केंद्र शासनाच्या ‘भारत नेट’ अंतर्गत ग्रामीण भागात गावा-गावांत बीबीएनल व सीएससीच्या वतीने फायबर ऑपटिक इंटरनेट लाईन टाकण्यात आली आहे. याच्या पुढच्या टप्प्यात ग्रामपंचायतींना मोफत वायफाय सुविधा देण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात सुमारे ५८१ ग्रामपंचायतींना ही मोफत वायफाय सुविधा पुरविण्यात येणार आहेत. परंतु, आतापर्यंत केवळ ७४ ग्रामपंचायतींमध्ये ही सुविधा सुरू झाली आहे.

पुणे जिल्ह्यात एकूण ८६२ ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा पोहोचली आहे. आता पुढील टप्प्यात ग्रामपंचायतींना मोफत वायफाय देण्यात येणार आहे. यात जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ५८१ ग्रामपंचायतींना मोफत वायफाय देण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयासह टपाल कार्यालय, रेशन दुकान, जिल्हा परिषद शाळा, बँक, पोलीस ठाणे, ग्रामीण रुग्णालय, अंगणवाडी, तलाठी कार्यालयांना मोफत वायफाय सुविधा देण्यात येणार आहे.

याशिवाय सर्वच शासकीय कार्यालय, वैयक्तिक घरी आणि दुकानदार, व्यापाऱ्यांना वायफाय ब्रॉड बॅन्ड कनेक्टिव्हिटीचा वापर करण्यात येईल. ग्रामीण भागातील उद्योग-व्यवसाय, सेतू सुविधा, शेतमाल खरेदी-विक्री, बँक सेवा, टेलिमेडिसिन, ई-कोर्ट, मोबाईल बँकिंग, नोकरी मार्गदर्शन केंद्र, महिला बचत गट केंद्र, गॅस बुकिंग केंद्र, ऑनलाइन शिक्षण, डिजिटल व्यवहार, ऑनलाइन सेवा केंद्रांना इंटरनेटचा फायदा होणार आहे. परंतु सध्या मोफत वायफाय देण्याचे काम खूपच कासव गतीने सुरू आहे. जिल्ह्यातील ५८१ ग्रामपंचायती पैकी आतापर्यंत केवळ ७४ ग्रामपंचायतींना मोफत वायफाय सुविधा उपलब्ध झाली आहे.

------

जिल्ह्यात आंबेगाव, दौंड आणि बारामतीत मोफत वायफाय

जिल्ह्यात तेरा तालुक्यांतील ५८१ गावांमध्ये मोफत वायफाय सुविधा पुरविण्यात येणार आहे. पण आतापर्यंत केवळ ७४ ठिकाणी मोफत वायफाय सुविधा देण्यात आली असून, आंबेगाव तालुक्यातील ४१, बारामती तालुक्यातील १४ आणि दौंड तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींना ही सुविधा मिळाली आहे.

-----