शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
4
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
5
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
6
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
7
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
8
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
9
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
10
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
11
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
12
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
13
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
14
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
15
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
16
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
17
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
18
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
19
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
20
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग

...तर सुंदर, टुमदार पुण्याचे वाट्टोळे निश्चित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:09 IST

दीपक मुनोत पुणे : राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मुदतीच्या अंतिम दिवशी पुणे महापालिका हद्दीत २३ गावांचा समावेश करण्याचा ...

दीपक मुनोत

पुणे : राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मुदतीच्या अंतिम दिवशी पुणे महापालिका हद्दीत २३ गावांचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. हा एकच मुद्दा, गावांच्या समावेशाचा मुद्दा हा पूर्णपणे राजकीय आहे हे स्पष्ट करण्यासाठी पुरेसा आहे. राजकीय हेतू साध्य करतानाच नव्याने समाविष्ट भागाचे योग्य नियोजन न झाल्यास पुण्यासारखे एक चांगले शहर बकाल झाल्याशिवाय राहणार नाही, याची जाणीव सर्व संबंधितांनी ठेवणे गरजेचे आहे.

महापालिका हद्दीत १९९७ साली २३ गावांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर, २०१७ मध्ये आणखी ११ गावांचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर, आता नव्याने पुन्हा २३ गावांचा समावेश करण्यात येत आहे. बुधवारी त्याबाबतची अधिसूचना निघाली.

राज्य निवडणूक आयोगाने, पंधरवड्यापूर्वीच एक आदेश काढला होता. त्यात, राज्यातील ज्या महापालिकांच्या निवडणुका आगामी जानेवारी-फेब्रुवारीत अपेक्षित आहेत त्यांनी आपल्या हद्दीतील बदल ३० जूनपूर्वी करावा, त्यानुसार वॉर्डरचना केली जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार शेवटच्या दिवशी राज्य सरकारने अधिसूचना काढत शिक्कामोर्तब केले.

मुळात, गावांच्या समावेशाचा निर्णय हा प्रथमदर्शनी तरी पूर्ण राजकीय स्वरूपाचा आहे. आगामी महापालिका निवडणुकीत, राजकीयदृष्ट्या जास्तीत जास्त लाभ व्हावा, या हेतूने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आग्रही होते. ग्रामीण भागात ‘राष्ट्रवादी’ची ताकद चांगली आहे. त्यामुळे २३ गावांचा समावेश झाल्यास पक्षासाठी फायदेशीर ठरेल, असा ‘राष्ट्रवादी’चा होरा आहे. त्यामुळेच, उपमुख्यमंत्री अजित पवार हे, महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यापासून २३ गावांच्या समावेशासाठी आग्रही होते. अगदी वर्षभरापूर्वीच त्यांनी पक्षांतर्गत, दहा जणांची एक समिती स्थापन करून त्यातील दोघांकडे २३ गावांच्या विलीनीकरणाच्या सर्वंकष तयारीची जबाबदारी सोपवली होती.

यावरून २३ गावांच्या पुण्यातील समावेशास राष्ट्रवादी काँग्रेस किती महत्त्व देते ते स्पष्ट होते. ग्रामीण भागात राष्ट्रवादी प्रबळ आहे, असे म्हटले जात असले तरी धायरी, खडकवासला आणि नऱ्हे, आंबेगाव या दोन्ही जिल्हा परिषद मतदारसंघात तत्कालीन भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचे उमेदवार विजयी झाले होते ही देखील वस्तुस्थिती आहे. दरम्यानच्या कालावधीत शिवसेना आणि भाजपमध्ये फारकत झाली असली तरी राष्ट्रवादीचे उमेदवार सहज निवडून येतील, अशी परिस्थिती निश्चितच नाही. राष्ट्रवादीला शिवसेना आणि काँग्रेस पक्षाला काहीतरी वाटा दिल्याशिवाय, त्यांचे स्वप्न वास्तवात येणे तितकेसे सोपे नाही.

विलीनीकरण होत असलेल्या २३ गावांमध्ये बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्यादेखील महत्त्वाची आहे. त्यांचे मतदान निर्णायक ठरू शकते आणि त्यांच्यावर भाजप लक्ष केंद्रीत करणार, हे सांगण्यासाठी कोणत्याही राजकीय पंडिताची गरज नाही.

चौकट

२४ वर्षांपूर्वीची २३ गावे आजही बकाल

महापालिका हद्दीत २४ वर्षांपूर्वी समाविष्ट झालेल्या २३ गावांमध्ये आजही प्राथमिक सोयी सुविधांचा विकास झालेला नाही. रस्ते, पुरेसे पाणी, स्वच्छता इतक्या वर्षात होऊ शकत नसेल तर ही लाजिरवाणी बाब ठरते. त्यानंतर, ११ गावांचीही महापालिकेने अशीच वासलात लावली आहे. २०१२ साली तयार केलेल्या सिटी डेव्हलपमेंट प्लॅन (सीडीपी) नुसार, शहरातील मूलभूत सुविधांसाठी तब्बल ८८ हजार कोटी रुपयांची गरज होती. मात्र त्यानंतर १० वर्षांत काय झाले, हा ताजा इतिहास आहे, असा यापूर्वीचा वाईट अनुभव असताना आता या नव्याने समाविष्ट २३ गावांमधील नागरिकांच्या नशिबी काय वाढून ठेवले आहे, हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज नाही. यापूर्वीचा अनुभव खोटा ठरवण्यासाठी राज्यासह स्थानिक सत्ताधाऱ्यांना नियोजन करावे लागेल. तरच या २३ गावांच्या विलीनीकरणाच्या निर्णयाला अर्थ प्राप्त होईल. अन्यथा, महापालिकेच्या एका निवडणुकीसाठी घेतलेला निर्णय, अशी या निर्णयाची नोंद झाल्याशिवाय राहणार नाही.