शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

खोडद ३ महिन्यांत १०० जणांना सर्पदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:12 IST

-- अशोक खरात : खोडद : मे महिन्यापासून जुलै पर्यंत या तीन महिन्यांच्या काळात सुमारे १०० रुग्णांना विविध विषारी ...

--

अशोक खरात : खोडद : मे महिन्यापासून जुलै पर्यंत या तीन महिन्यांच्या काळात सुमारे १०० रुग्णांना विविध विषारी सापांचा दंश झाला आहे.सर्पदंश झालेल्या या १०० रुग्णांमध्ये घोणसने दंश केलेले ४७ रुग्ण आहेत.सर्पदंश झालेल्या या १०० रुग्णांचा जीव वाचविण्यात नारायणगाव येथील डॉ.सदानंद राऊत व डॉ.सौ.पल्लवी राऊत यांना यश आले आहे.

मे महिन्यात तीव्र उन्हाळा असल्याने या काळात अति उष्माघातामुळे सकाळी व संध्याकाळच्या वेळी गारव्याला साप बाहेर पडतात. पावसाळ्यात पाऊस पडल्यानंतर पाणी बिळात जाते व त्यामुळे साप बिळातून बाहेर पडतात. या दरम्यान शेतकरी आपल्या शेतीच्या मशागतीची कामे करण्यात व्यस्त असतात. यावेळी शेतात कामे करत असताना शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना सर्पदंश होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. शेतात काम करत असतानाच सर्पदंशाचे होण्याचे प्रमाण अधिक आहे.

दरवर्षी वर्षभरात सर्पदंश झालेल्या १०० रुग्णांची वाढ होत असते, मात्र या यावर्षी फक्त तीन महिन्यांतच १०० जणांना झालेला सर्पदंश म्हणजे ही चिंतेची बाब आहे. यात घोणसने दंश केलेले रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्याखालोखाल नाग, मण्यार, फुरसे या विषारी सापांचे दंशाचे प्रमाण आहे.

डॉ. राऊत यांनी सुरू केलेल्या 'शून्य सर्पदंश मृत्यूदर प्रकल्पाचे' जागतिक आरोग्य संघटना, सर्पदंश क्षेत्रातील तज्ज्ञ, डॉक्टर्स यांच्याकडून जगभरातून कौतुक होत आहे. लंडन येथील ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वतीने देखील जगभरातील डॉक्टरांसाठी डॉ. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विघ्नहर नार्सिंग होम मध्ये सर्पदंश उपचार पद्धतीविषयी प्रशिक्षण देण्यासाठी शैक्षणिक व्हिडीओ तयार करण्यात येणार आहेत.

--

टेबल

मागील तीन महिन्यांत विविध विषारी जातीच्या सापांचे दंश झालेल्या रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे - घोणस ४७ रुग्ण, फुरसे - ३ रुग्ण , चपट्या घोणस - ६ रुग्ण, नाग - ८ रुग्ण , मण्यार - ४ रुग्ण , माहिती नसलेले व खात्री न झालेले इतर ३२ रुग्ण , असे एकूण १०० रुग्णांना विषारी सापांचा दंश झाला आहे.

--

================================

कोणत्या सापाने दंश केला हे कसे ओळखावे?

नाग : नागाने दंश केलेल्या ठिकाणी सूज येते व वेदना होतात. डोके जड पडते, डोळ्यांच्या पापण्या उचलता येत नाहीत. बोलता येत नाही. शरीराला लुळेपणा येतो. श्वास बंद होतो.

मण्यार : पोट व छाती दुखते.उलटी होते.डोळे उघडता येत नाहीत.बोलता येत नाही.शरीराला लुळेपणा येतो.श्वास बंद होतो.

घोणस : घोणसने दंश केलेल्या ठिकाणी सूज येते तसेच फोड येतात.पोटात दुखते तसेच उलट्या व वेदना होतात.तोंडातून व लघवीतून रक्तस्त्राव होतो.जांघेत व काखेत गाठी येतात.रक्तदाब कमी होतो तसेच किडनी निकामी होते.

--

कोट १

"अलीकडच्या काळात शेतात घोणसचे प्रमाण वाढले आहे.प्रामुख्याने शेतात काम करणाऱ्या लोकांना घोणसचा दंश होण्याचे प्रमाण अधिक आहे. शेतात काम करत असताना काळजी घेणे आवश्यक आहे.आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवावा.सर्पदंश झाल्यानंतर मंत्र तंत्र न करता रुग्णास थेट जवळच्या डॉक्टरांकडे न्यावे. शून्य सर्पदंश मृत्यूदर प्रकल्पांतर्गत सर्पदंशाने होणारे मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्याचा मानस आहे." - डॉ.सदानंद राऊत, सर्पदंश तज्ज्ञ, नारायणगाव

--

कॅप्शन : घोणसने दंश केलेल्या आंबेगाव तालुक्यातील शिनोली येथील सागर अशोक वाघ या ९ वर्षाच्या चिमुरड्याचा डॉ.राऊत यांनी जीव वाचविला.