शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

खोडद ३ महिन्यांत १०० जणांना सर्पदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:12 IST

-- अशोक खरात : खोडद : मे महिन्यापासून जुलै पर्यंत या तीन महिन्यांच्या काळात सुमारे १०० रुग्णांना विविध विषारी ...

--

अशोक खरात : खोडद : मे महिन्यापासून जुलै पर्यंत या तीन महिन्यांच्या काळात सुमारे १०० रुग्णांना विविध विषारी सापांचा दंश झाला आहे.सर्पदंश झालेल्या या १०० रुग्णांमध्ये घोणसने दंश केलेले ४७ रुग्ण आहेत.सर्पदंश झालेल्या या १०० रुग्णांचा जीव वाचविण्यात नारायणगाव येथील डॉ.सदानंद राऊत व डॉ.सौ.पल्लवी राऊत यांना यश आले आहे.

मे महिन्यात तीव्र उन्हाळा असल्याने या काळात अति उष्माघातामुळे सकाळी व संध्याकाळच्या वेळी गारव्याला साप बाहेर पडतात. पावसाळ्यात पाऊस पडल्यानंतर पाणी बिळात जाते व त्यामुळे साप बिळातून बाहेर पडतात. या दरम्यान शेतकरी आपल्या शेतीच्या मशागतीची कामे करण्यात व्यस्त असतात. यावेळी शेतात कामे करत असताना शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना सर्पदंश होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. शेतात काम करत असतानाच सर्पदंशाचे होण्याचे प्रमाण अधिक आहे.

दरवर्षी वर्षभरात सर्पदंश झालेल्या १०० रुग्णांची वाढ होत असते, मात्र या यावर्षी फक्त तीन महिन्यांतच १०० जणांना झालेला सर्पदंश म्हणजे ही चिंतेची बाब आहे. यात घोणसने दंश केलेले रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्याखालोखाल नाग, मण्यार, फुरसे या विषारी सापांचे दंशाचे प्रमाण आहे.

डॉ. राऊत यांनी सुरू केलेल्या 'शून्य सर्पदंश मृत्यूदर प्रकल्पाचे' जागतिक आरोग्य संघटना, सर्पदंश क्षेत्रातील तज्ज्ञ, डॉक्टर्स यांच्याकडून जगभरातून कौतुक होत आहे. लंडन येथील ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वतीने देखील जगभरातील डॉक्टरांसाठी डॉ. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विघ्नहर नार्सिंग होम मध्ये सर्पदंश उपचार पद्धतीविषयी प्रशिक्षण देण्यासाठी शैक्षणिक व्हिडीओ तयार करण्यात येणार आहेत.

--

टेबल

मागील तीन महिन्यांत विविध विषारी जातीच्या सापांचे दंश झालेल्या रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे - घोणस ४७ रुग्ण, फुरसे - ३ रुग्ण , चपट्या घोणस - ६ रुग्ण, नाग - ८ रुग्ण , मण्यार - ४ रुग्ण , माहिती नसलेले व खात्री न झालेले इतर ३२ रुग्ण , असे एकूण १०० रुग्णांना विषारी सापांचा दंश झाला आहे.

--

================================

कोणत्या सापाने दंश केला हे कसे ओळखावे?

नाग : नागाने दंश केलेल्या ठिकाणी सूज येते व वेदना होतात. डोके जड पडते, डोळ्यांच्या पापण्या उचलता येत नाहीत. बोलता येत नाही. शरीराला लुळेपणा येतो. श्वास बंद होतो.

मण्यार : पोट व छाती दुखते.उलटी होते.डोळे उघडता येत नाहीत.बोलता येत नाही.शरीराला लुळेपणा येतो.श्वास बंद होतो.

घोणस : घोणसने दंश केलेल्या ठिकाणी सूज येते तसेच फोड येतात.पोटात दुखते तसेच उलट्या व वेदना होतात.तोंडातून व लघवीतून रक्तस्त्राव होतो.जांघेत व काखेत गाठी येतात.रक्तदाब कमी होतो तसेच किडनी निकामी होते.

--

कोट १

"अलीकडच्या काळात शेतात घोणसचे प्रमाण वाढले आहे.प्रामुख्याने शेतात काम करणाऱ्या लोकांना घोणसचा दंश होण्याचे प्रमाण अधिक आहे. शेतात काम करत असताना काळजी घेणे आवश्यक आहे.आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवावा.सर्पदंश झाल्यानंतर मंत्र तंत्र न करता रुग्णास थेट जवळच्या डॉक्टरांकडे न्यावे. शून्य सर्पदंश मृत्यूदर प्रकल्पांतर्गत सर्पदंशाने होणारे मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्याचा मानस आहे." - डॉ.सदानंद राऊत, सर्पदंश तज्ज्ञ, नारायणगाव

--

कॅप्शन : घोणसने दंश केलेल्या आंबेगाव तालुक्यातील शिनोली येथील सागर अशोक वाघ या ९ वर्षाच्या चिमुरड्याचा डॉ.राऊत यांनी जीव वाचविला.