शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

अंबिकानगरमध्ये धुडगूस

By admin | Updated: January 20, 2016 01:32 IST

बिबवेवाडी भागातील अप्परमधील अंबिकानगर भागामध्ये सुमारे २० ते २५ गुंडांच्या टोळक्याने दहशत माजवत दिसेल त्याच्यावर हल्ला चढवत अनेक गाड्यांची तोडफोड केली

बिबवेवाडी : बिबवेवाडी भागातील अप्परमधील अंबिकानगर भागामध्ये सुमारे २० ते २५ गुंडांच्या टोळक्याने दहशत माजवत दिसेल त्याच्यावर हल्ला चढवत अनेक गाड्यांची तोडफोड केली. घरांवर दगडफेक करीत मोठे नुकसान केले. ही घटना मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली़ अंबिकानगरच्या एका गल्लीत गुंडांचा जवळपास अर्धा तास नंगा नाच सुरू होता़ अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे या भागात दहशतीचे वातावरण पसरले आहे.विकास जठार (वय २०), बाळू जोगदंड (वय ५५) अशी जखमींची नावे असून, त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे़ विकास जठार हा रिक्षामध्ये बसला होता़ तितक्यात काही तरुण हातात कोयते, दगड घेऊन आले़ त्यांनी विकास याच्या डोक्यावर, हातावर कोयत्याने वार केले़ बाळू जोगदंड यांच्या हाताला दगड लागल्याने तेही जखमी झाले आहेत़ याविषयी अधिक माहिती अशी की, अप्पर भागामध्ये अज्ञात २० ते २५ युवकांचे टोळके रात्री साडेआठच्या सुमारास आले़ त्यांनी लांबवर आपल्या गाड्या लावल्या़ तेथून ते चालत अंबिकानगरमधील गल्लीत शिरले आणि तुफान दगडफेक करण्यास सुरुवात केली़ हातात हत्यारे घेऊन दिसेल त्यांच्यावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तीन नागरिक जखमी झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी अंबिकानगर येथे राहणाऱ्या अमोल जोगदंड व अप्पर भागात राहणाऱ्या अक्षय लोखंडे यांच्यामध्ये भांडणे झाले होती. मात्र, स्थानिक राजकीय नेत्यांच्या मदतीने ही भांडणे मिटवण्यातदेखील आली होती. त्याच भांडणामुळे आजचा प्रकार घडला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. घटनास्थळी पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त मिलिंद मोहिते, पोलीस निरीक्षक दीपक निकम, सर्जेराव बाबर यांनी मोठ्या फौजफाट्यासह धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सर्व आरोपी पसार झाले होते. या गुंडांनी भागातील सुमारे १२ हून अधिक गाड्या फोडल्या असून, अनेक घरांवर दगडफेक केलेली आहे. हे गुंड मोठमोठ्याने ओरडत दिसेल त्याला मारत होते. त्यांच्या हातात अनेक धारदार शस्त्रे होती. ते बहुतेक कुणाला तरी ठार मारण्याच्या उद्देशानेच आले होते, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. या प्रकारामुळे भागात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही या भागात गाड्या फोडण्याचे काही प्रकार घडले आहेत.या भागात पोलीस चौकी व्हावी, तसेच बिबवेवाडी पोलीस स्टेशनला मंजूर असलेला पूर्ण स्टाफ तरी मिळावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे़