शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

धुव्वाधार पावसाने पुन्हा त्रेधातिरपीट

By admin | Updated: March 30, 2015 05:34 IST

सलग दुसऱ्या दिवशी, रविवारी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने शहर आणि मावळ व मुळशी तालुक्यांत हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत पावसाची थांबून थांबून संततधार कायम होती.

पिंपरी : सलग दुसऱ्या दिवशी, रविवारी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने शहर आणि मावळ व मुळशी तालुक्यांत हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत पावसाची थांबून थांबून संततधार कायम होती. पावसामुळे नागरिकांना साप्ताहिक सुटीचा आनंद घेता आला नाही. ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचून तळी तयार झाली. त्यामुळे वाहतूककोंडी झाली. सकाळपासून रविवारी वातावरण ढगाळ होते. अंधकारमय वातावरण होते. तापमानात कमालीची वाढ झाली होती. दुपारी चारच्या दरम्यान आकाशात काळे ढग जमा झाले. परिसरात ढगांनी गर्दी केली होती. सायंकाळी पावसाची रिपरिप सुरू झाली. शहरातील अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. सोबत जोरदार वारे वाहत होते. निगडी, पिंपरी-चिंचवड, भोसरी, कासारवाडी, दापोडी, सांगवी, पिंपळे गुरव, आकुर्डी, थेरगाव, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, नेहरुनगर, रहाटणी आदी ठिकाणी त्याचबरोबर मावळ आणि मुळशी तालुका परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गारा- वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पावसाने झोडपून काढले. जोरदार पावसामुळे थोड्याच वेळेत रस्ते जलमय झाले. सखल भागात पाणी साचले. सर्वच भुयारी मार्गांत गुडघाभर पाणी साचले. घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची आणि सुटीची मजा घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या कुटुंबीयांची, दुचाकीस्वारांची पावसाबरोबरच सुटलेल्या वाऱ्यामुळे दैना उडाली. पथारीवाले, फेरीवाले, विक्रेते आणि दुकानदारांचीही तारांबळ उडाली. साहित्याची जुळवाजुळव करताना त्यांची त्रेधा उडाली. शहरातील काही भागांत झाड्याच्या फांदा तुटून पडल्या. वादळी पावसात कोणतीही आपत्तीजनक घटना घडू नये, यासाठी अनेक भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पिकात पाणी साचले. मार्र्च महिन्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी हवालदिल आहेत. सामना पाहता आला नाही शहरातील अनेक झाडे उन्मळून पडली. त्यामुळे वीजवाहक तारा तुटल्याने काही भागांतील वीज गुल झाली. पिंपळे गुरव, सांगवी, काळेवाडी, पिंपरी आदी भागांत वीज खंडित झाली. अनेक भागांत रविवारीही वीज गायब होती. अनेकांना विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्याचा आनंद घेता आला नाहीसध्या शालेय आणि महाविद्यालयीन वार्षिक परीक्षा सुरू आहे. खंडित विजेमुळे त्यांना रात्री अभ्यास करणे शक्य झाले नाही. रात्री उकाडा आणि डासांच्या त्रासाने नागरिक हैराण झाले. चिंचवड : उकाड्यामुळे अंगाची लाही लाही होत असतानाच चिंचवड परिसरात सलग दुसऱ्या दिवशी सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांच्या मुसळधार पाऊस कोसळला. रविवारी सकाळपासून हवेत उष्मा होता. ढगांच्या गडगडाटासह दुपारी साडेचारला पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे पथारीवाले व हातगाडी व्यावसायिकांचे हाल झाले. चाकरमान्यांनाही भिजत जावे लागले. बहुतांश रस्त्यांवर पाणी साचले होते.हळूहळू पावसाचा जोर वाढत गेला. यामुळे अनेकांची धांदल उडाली. साडेपाचला गारा पडण्यास सुरुवात झाली. रस्त्यावर शुकशुकाट होता. अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले. अनेकांनी आडोशाला आश्रय घेतला. वाहनांमध्ये पाणी शिरल्याने अनेक जण वाहने ढकलताना दिसत होते. किवळे : रावेत, किवळे परिसरात पिकांचे मोठे नुकसान झाले असून, ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर देहूरोड व चिंचोली परिसरात मोठ्या आकाराच्या गारा पडल्याने सिमेंट पत्र्याच्या घरात राहणारे नागरिक भयभीत झाले होते. किवळे परिसरातही थोड्या प्रमाणात गारा पडल्या. शेतकरीवर्ग त्रस्त झाला असून, शेतातील फुलोऱ्यावर (कणसावर) आलेली बाजरी, तसेच चारापिके शेतात आडवी झाली आहेत. गव्हाचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. गहुंजे, सांगवडे भागात जनावरांसाठी राखून ठेवलेल्या शेतातील गवताचे मोठे नुकसान झाले आहे. देहूरोड, चिंचोली परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह व गारांच्या पावसाने हजेरी लावली. अर्धा तास गारांचा पाऊस पडल्याचे चिंचोली येथील विठ्ठल जाधव, बाळासाहेब जाधव यांनी सांगितले . मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गानजीक दोन ठिकाणी झाडे पडली होती, तर विविध ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या होत्या. देहूरोड - विकासनगर रस्त्यावर महावितरणचा खांब कोसळला आहे. त्यामुळे श्रीकृष्णनगर भागातील वीजपुरवठा शनिवार रात्रीपासून सुरळीत झालेला नाही. आढले बुद्रुक : वादळवाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शनिवारी दुपारपासून पवन मावळातील आढले बुद्रुक,आढले खुर्द, चांदखेड, दिवड, डोणे, ओव्हळे, राजेवाडी, पाचाणे, पुसाणे, कुसगाव या दहा गावांसह वाड्या-वस्त्यांचा वीजपुरवठा खंडित झाला. ३० तास उलटूनही रविवारी संध्याकाळपर्यंत तो सुरळीत झाला नव्हता.दोन दिवसांपासून वीज नसल्यामुळे या गावांतील जनजीवन पूर्णपणे कोलमडले आहे. अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणचे विजेचे खांब वाकले, कोलमडून पडले. विद्युतवाहक तारा तुटल्या. त्यामुळे दोन दिवसांपासून ही गावे अंधारात आहेत. वीज नसल्याने पीठगिरणी बंद होत्या. त्यामुळे नागरिकांना दळण दळण्यासाठी १५ किलोमीटर अंतरावरील परंदवडी - सोमाटणेला जावे लागले. वीजपुरवठा खंडित झाला. (प्रतिनिधी)