शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
3
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
4
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
5
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
6
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
7
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
8
IAS Misha Singh : लय भारी! वडील शेतकरी, लेक IAS अधिकारी; LLB नंतर UPSC ची तयारी, केली दमदार कामगिरी
9
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
10
काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...
11
Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक
12
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
13
घनदाट जंगलात शूट झालाय 'कांतारा: चाप्टर १', कुठे आहेत हे नयनरम्य लोकेशन्स?
14
VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
15
IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
16
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
17
कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
18
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
19
छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका
20
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

धुव्वाधार पावसाने पुन्हा त्रेधातिरपीट

By admin | Updated: March 30, 2015 05:34 IST

सलग दुसऱ्या दिवशी, रविवारी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने शहर आणि मावळ व मुळशी तालुक्यांत हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत पावसाची थांबून थांबून संततधार कायम होती.

पिंपरी : सलग दुसऱ्या दिवशी, रविवारी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने शहर आणि मावळ व मुळशी तालुक्यांत हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत पावसाची थांबून थांबून संततधार कायम होती. पावसामुळे नागरिकांना साप्ताहिक सुटीचा आनंद घेता आला नाही. ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचून तळी तयार झाली. त्यामुळे वाहतूककोंडी झाली. सकाळपासून रविवारी वातावरण ढगाळ होते. अंधकारमय वातावरण होते. तापमानात कमालीची वाढ झाली होती. दुपारी चारच्या दरम्यान आकाशात काळे ढग जमा झाले. परिसरात ढगांनी गर्दी केली होती. सायंकाळी पावसाची रिपरिप सुरू झाली. शहरातील अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. सोबत जोरदार वारे वाहत होते. निगडी, पिंपरी-चिंचवड, भोसरी, कासारवाडी, दापोडी, सांगवी, पिंपळे गुरव, आकुर्डी, थेरगाव, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, नेहरुनगर, रहाटणी आदी ठिकाणी त्याचबरोबर मावळ आणि मुळशी तालुका परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गारा- वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पावसाने झोडपून काढले. जोरदार पावसामुळे थोड्याच वेळेत रस्ते जलमय झाले. सखल भागात पाणी साचले. सर्वच भुयारी मार्गांत गुडघाभर पाणी साचले. घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची आणि सुटीची मजा घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या कुटुंबीयांची, दुचाकीस्वारांची पावसाबरोबरच सुटलेल्या वाऱ्यामुळे दैना उडाली. पथारीवाले, फेरीवाले, विक्रेते आणि दुकानदारांचीही तारांबळ उडाली. साहित्याची जुळवाजुळव करताना त्यांची त्रेधा उडाली. शहरातील काही भागांत झाड्याच्या फांदा तुटून पडल्या. वादळी पावसात कोणतीही आपत्तीजनक घटना घडू नये, यासाठी अनेक भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पिकात पाणी साचले. मार्र्च महिन्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी हवालदिल आहेत. सामना पाहता आला नाही शहरातील अनेक झाडे उन्मळून पडली. त्यामुळे वीजवाहक तारा तुटल्याने काही भागांतील वीज गुल झाली. पिंपळे गुरव, सांगवी, काळेवाडी, पिंपरी आदी भागांत वीज खंडित झाली. अनेक भागांत रविवारीही वीज गायब होती. अनेकांना विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्याचा आनंद घेता आला नाहीसध्या शालेय आणि महाविद्यालयीन वार्षिक परीक्षा सुरू आहे. खंडित विजेमुळे त्यांना रात्री अभ्यास करणे शक्य झाले नाही. रात्री उकाडा आणि डासांच्या त्रासाने नागरिक हैराण झाले. चिंचवड : उकाड्यामुळे अंगाची लाही लाही होत असतानाच चिंचवड परिसरात सलग दुसऱ्या दिवशी सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांच्या मुसळधार पाऊस कोसळला. रविवारी सकाळपासून हवेत उष्मा होता. ढगांच्या गडगडाटासह दुपारी साडेचारला पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे पथारीवाले व हातगाडी व्यावसायिकांचे हाल झाले. चाकरमान्यांनाही भिजत जावे लागले. बहुतांश रस्त्यांवर पाणी साचले होते.हळूहळू पावसाचा जोर वाढत गेला. यामुळे अनेकांची धांदल उडाली. साडेपाचला गारा पडण्यास सुरुवात झाली. रस्त्यावर शुकशुकाट होता. अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले. अनेकांनी आडोशाला आश्रय घेतला. वाहनांमध्ये पाणी शिरल्याने अनेक जण वाहने ढकलताना दिसत होते. किवळे : रावेत, किवळे परिसरात पिकांचे मोठे नुकसान झाले असून, ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर देहूरोड व चिंचोली परिसरात मोठ्या आकाराच्या गारा पडल्याने सिमेंट पत्र्याच्या घरात राहणारे नागरिक भयभीत झाले होते. किवळे परिसरातही थोड्या प्रमाणात गारा पडल्या. शेतकरीवर्ग त्रस्त झाला असून, शेतातील फुलोऱ्यावर (कणसावर) आलेली बाजरी, तसेच चारापिके शेतात आडवी झाली आहेत. गव्हाचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. गहुंजे, सांगवडे भागात जनावरांसाठी राखून ठेवलेल्या शेतातील गवताचे मोठे नुकसान झाले आहे. देहूरोड, चिंचोली परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह व गारांच्या पावसाने हजेरी लावली. अर्धा तास गारांचा पाऊस पडल्याचे चिंचोली येथील विठ्ठल जाधव, बाळासाहेब जाधव यांनी सांगितले . मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गानजीक दोन ठिकाणी झाडे पडली होती, तर विविध ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या होत्या. देहूरोड - विकासनगर रस्त्यावर महावितरणचा खांब कोसळला आहे. त्यामुळे श्रीकृष्णनगर भागातील वीजपुरवठा शनिवार रात्रीपासून सुरळीत झालेला नाही. आढले बुद्रुक : वादळवाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शनिवारी दुपारपासून पवन मावळातील आढले बुद्रुक,आढले खुर्द, चांदखेड, दिवड, डोणे, ओव्हळे, राजेवाडी, पाचाणे, पुसाणे, कुसगाव या दहा गावांसह वाड्या-वस्त्यांचा वीजपुरवठा खंडित झाला. ३० तास उलटूनही रविवारी संध्याकाळपर्यंत तो सुरळीत झाला नव्हता.दोन दिवसांपासून वीज नसल्यामुळे या गावांतील जनजीवन पूर्णपणे कोलमडले आहे. अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणचे विजेचे खांब वाकले, कोलमडून पडले. विद्युतवाहक तारा तुटल्या. त्यामुळे दोन दिवसांपासून ही गावे अंधारात आहेत. वीज नसल्याने पीठगिरणी बंद होत्या. त्यामुळे नागरिकांना दळण दळण्यासाठी १५ किलोमीटर अंतरावरील परंदवडी - सोमाटणेला जावे लागले. वीजपुरवठा खंडित झाला. (प्रतिनिधी)