शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

धुव्वाधार पावसाने पुन्हा त्रेधातिरपीट

By admin | Updated: March 30, 2015 05:34 IST

सलग दुसऱ्या दिवशी, रविवारी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने शहर आणि मावळ व मुळशी तालुक्यांत हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत पावसाची थांबून थांबून संततधार कायम होती.

पिंपरी : सलग दुसऱ्या दिवशी, रविवारी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने शहर आणि मावळ व मुळशी तालुक्यांत हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत पावसाची थांबून थांबून संततधार कायम होती. पावसामुळे नागरिकांना साप्ताहिक सुटीचा आनंद घेता आला नाही. ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचून तळी तयार झाली. त्यामुळे वाहतूककोंडी झाली. सकाळपासून रविवारी वातावरण ढगाळ होते. अंधकारमय वातावरण होते. तापमानात कमालीची वाढ झाली होती. दुपारी चारच्या दरम्यान आकाशात काळे ढग जमा झाले. परिसरात ढगांनी गर्दी केली होती. सायंकाळी पावसाची रिपरिप सुरू झाली. शहरातील अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. सोबत जोरदार वारे वाहत होते. निगडी, पिंपरी-चिंचवड, भोसरी, कासारवाडी, दापोडी, सांगवी, पिंपळे गुरव, आकुर्डी, थेरगाव, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, नेहरुनगर, रहाटणी आदी ठिकाणी त्याचबरोबर मावळ आणि मुळशी तालुका परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गारा- वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पावसाने झोडपून काढले. जोरदार पावसामुळे थोड्याच वेळेत रस्ते जलमय झाले. सखल भागात पाणी साचले. सर्वच भुयारी मार्गांत गुडघाभर पाणी साचले. घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची आणि सुटीची मजा घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या कुटुंबीयांची, दुचाकीस्वारांची पावसाबरोबरच सुटलेल्या वाऱ्यामुळे दैना उडाली. पथारीवाले, फेरीवाले, विक्रेते आणि दुकानदारांचीही तारांबळ उडाली. साहित्याची जुळवाजुळव करताना त्यांची त्रेधा उडाली. शहरातील काही भागांत झाड्याच्या फांदा तुटून पडल्या. वादळी पावसात कोणतीही आपत्तीजनक घटना घडू नये, यासाठी अनेक भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पिकात पाणी साचले. मार्र्च महिन्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी हवालदिल आहेत. सामना पाहता आला नाही शहरातील अनेक झाडे उन्मळून पडली. त्यामुळे वीजवाहक तारा तुटल्याने काही भागांतील वीज गुल झाली. पिंपळे गुरव, सांगवी, काळेवाडी, पिंपरी आदी भागांत वीज खंडित झाली. अनेक भागांत रविवारीही वीज गायब होती. अनेकांना विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्याचा आनंद घेता आला नाहीसध्या शालेय आणि महाविद्यालयीन वार्षिक परीक्षा सुरू आहे. खंडित विजेमुळे त्यांना रात्री अभ्यास करणे शक्य झाले नाही. रात्री उकाडा आणि डासांच्या त्रासाने नागरिक हैराण झाले. चिंचवड : उकाड्यामुळे अंगाची लाही लाही होत असतानाच चिंचवड परिसरात सलग दुसऱ्या दिवशी सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांच्या मुसळधार पाऊस कोसळला. रविवारी सकाळपासून हवेत उष्मा होता. ढगांच्या गडगडाटासह दुपारी साडेचारला पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे पथारीवाले व हातगाडी व्यावसायिकांचे हाल झाले. चाकरमान्यांनाही भिजत जावे लागले. बहुतांश रस्त्यांवर पाणी साचले होते.हळूहळू पावसाचा जोर वाढत गेला. यामुळे अनेकांची धांदल उडाली. साडेपाचला गारा पडण्यास सुरुवात झाली. रस्त्यावर शुकशुकाट होता. अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले. अनेकांनी आडोशाला आश्रय घेतला. वाहनांमध्ये पाणी शिरल्याने अनेक जण वाहने ढकलताना दिसत होते. किवळे : रावेत, किवळे परिसरात पिकांचे मोठे नुकसान झाले असून, ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर देहूरोड व चिंचोली परिसरात मोठ्या आकाराच्या गारा पडल्याने सिमेंट पत्र्याच्या घरात राहणारे नागरिक भयभीत झाले होते. किवळे परिसरातही थोड्या प्रमाणात गारा पडल्या. शेतकरीवर्ग त्रस्त झाला असून, शेतातील फुलोऱ्यावर (कणसावर) आलेली बाजरी, तसेच चारापिके शेतात आडवी झाली आहेत. गव्हाचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. गहुंजे, सांगवडे भागात जनावरांसाठी राखून ठेवलेल्या शेतातील गवताचे मोठे नुकसान झाले आहे. देहूरोड, चिंचोली परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह व गारांच्या पावसाने हजेरी लावली. अर्धा तास गारांचा पाऊस पडल्याचे चिंचोली येथील विठ्ठल जाधव, बाळासाहेब जाधव यांनी सांगितले . मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गानजीक दोन ठिकाणी झाडे पडली होती, तर विविध ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या होत्या. देहूरोड - विकासनगर रस्त्यावर महावितरणचा खांब कोसळला आहे. त्यामुळे श्रीकृष्णनगर भागातील वीजपुरवठा शनिवार रात्रीपासून सुरळीत झालेला नाही. आढले बुद्रुक : वादळवाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शनिवारी दुपारपासून पवन मावळातील आढले बुद्रुक,आढले खुर्द, चांदखेड, दिवड, डोणे, ओव्हळे, राजेवाडी, पाचाणे, पुसाणे, कुसगाव या दहा गावांसह वाड्या-वस्त्यांचा वीजपुरवठा खंडित झाला. ३० तास उलटूनही रविवारी संध्याकाळपर्यंत तो सुरळीत झाला नव्हता.दोन दिवसांपासून वीज नसल्यामुळे या गावांतील जनजीवन पूर्णपणे कोलमडले आहे. अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणचे विजेचे खांब वाकले, कोलमडून पडले. विद्युतवाहक तारा तुटल्या. त्यामुळे दोन दिवसांपासून ही गावे अंधारात आहेत. वीज नसल्याने पीठगिरणी बंद होत्या. त्यामुळे नागरिकांना दळण दळण्यासाठी १५ किलोमीटर अंतरावरील परंदवडी - सोमाटणेला जावे लागले. वीजपुरवठा खंडित झाला. (प्रतिनिधी)