शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वस्ताईचा गुड ॲण्ड सिम्पल टॅक्स! जीएसटीचे ५% आणि १८% असे दोनच दर; विमा पॉलिसींना करसूट, सिमेंटवर १८% जीएसटी
2
Yamuna Flood: यमुनेचा रौद्रवतार, दिल्लीच्या नाकातोंडात पाणी! घरं पाण्याखाली, रस्तेही बंद; थरकाप उडवणारी दृश्ये
3
अमिताभ बच्चन आणि क्रिती सनॉन यांच्यानंतर कार्तिक आर्यननंही अलिबागमध्ये खरेदी केली जमीन; किती कोटींना झाली डील?
4
श्रेयस, यशस्वी अन् शार्दुल... टीम इंडियाच्या स्टार त्रिकुटाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष
5
"मुंबईत कधी आपलेपणा वाटला नाही...", असं का म्हणाले मनोज वायपेयी? शहर सोडायचा आला विचार
6
GST Rate Cut: पहिले महिन्याला भरत होता ₹१७,७०० चा हेल्थ इन्शुरन्स प्रीमिअम, आता किती वाचतील; ३६ हजारांच्या टीव्हीवर किती बचत?
7
ये कैसी ‘फॉरेन पॉलिसी’, ये तो ‘फौरन पॉलिसी’ है, भैया!
8
सर्वसामान्यांना दिलासा देणारे GST चे नवीन दर कधी लागू होणार? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिले उत्तर
9
चातुर्मासातील पहिला शुक्र प्रदोष: सुख-सुबत्ता-वैभव, ‘असे’ करा व्रत; मंत्र जपाने शिव प्रसन्न!
10
GST दरातील कपातीनंतर शेअर बाजार सुस्साट; Sensex ५४७ अंकांनी वधारला, या शेअर्समध्ये जोरदार तेजी
11
आंदोलनाचा व्यापाराला १०० कोटींचा फटका, रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचा दावा 
12
GSTबाबत सरकारकडून भेट, दैनंदिन वापरातील वस्तू कुठल्या स्लॅबमध्ये आल्या? पाहा संपूर्ण यादी
13
जीएसटीमध्ये नेमके काय बदल झाले? काय किती स्वस्त झाले? जाणून घ्या एका क्लिकवर...!
14
40 GST: 'या' लोकांच्या खिशावर पडणार ताण, कोणत्या वस्तुंवर ४० टक्के जीएसटी?
15
दसरा, दिवाळीत करा बंपर वस्तू खरेदी; जीएसटी लागणार कमी
16
आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार? प्रतिज्ञापत्र सादर करा, उच्च न्यायालयाचे निर्देश
17
पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल
18
'संगीत देवबाभळी' फेम शुभांगी सदावर्तेचा घटस्फोट; पती पोस्ट करत म्हणाला, "काही वर्षांपूर्वीच..."
19
जीआर नव्हे, ही तर माहिती पुस्तिका, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांची टीका
20
आता कंत्राटदारांच्या आत्महत्या; ‘लाडकी बहीण' सारख्या योजनांवर कोट्यवधी खर्च, थकबाकी भागवायला पैसा नाही!

सलग चौथ्या दिवशी धुवाधार

By admin | Updated: October 5, 2015 01:50 IST

खेडच्या पूर्व, तसेच शिरूरच्या पश्चिम पट्ट्यात सलग चौथ्या दिवशी ईशान्य मोसमी वळवाच्या मुसळधार पावसाने थैमान घातले.

शेलपिंपळगाव : खेडच्या पूर्व, तसेच शिरूरच्या पश्चिम पट्ट्यात सलग चौथ्या दिवशी ईशान्य मोसमी वळवाच्या मुसळधार पावसाने थैमान घातले. मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटसह झालेल्या पावसाने परिसरात सर्वत्रच पाणीच-पाणी झाले असून, वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे शेतांनाच ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तसेच, पाण्यामुळे शेतांचे बांध फुटून शेतातील माती पाण्याबरोबर वाहून गेली आहे. एकीकडे वरुणराजाच्या कृपेने पाण्याची चिंता दूर होऊ लागली असताना सततच्या पडणाऱ्या मोठ्या पावसाने शेतातील पिके पाण्यात जाऊन सडून वाया जाण्याची भीती शेतकरीवर्गात निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदात कुठेतरी चिंतेचेही वातावरण पाहावयास मिळत आहे. खरीप हंगामात पावसाने दीर्घकाळ ओढ दिल्याने हंगामातील पिकांचे पाण्याच्या तुटवड्याअभावी सिंचन करता न आल्याने उत्पादनात कमालीची घट उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावी लागली. परिणामी, हंगामातील आर्थिक उत्पन्नही घटून शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली होती. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पादनाच्या आशेवर शेतकरी भिस्त ठेवून होता. त्यातच रब्बी हंगामाच्या तोंडावर परतीच्या मुसळधार पावसाने सलग दहा-बारा दिवस कृपा करून शेतकऱ्यांची पाण्याची चिंता दूर केली. पाण्याची तरतूद झाल्याने शेतकरी आनंदाने शेतीच्या कामाला लागला आहे. रब्बी हंगामातील प्रमुख पीक अर्थात कांद्याच्या लागवडींना शेतकऱ्यांनी विशेष प्राध्यान्य देऊन त्या उरकविण्याचा जोर धरला आहे. गेल्या चार दिवसांपासून वातावरणातील उकाड्याचे पावसात रूपांतर होत असून, खेडसह शिरूर तालुक्याला मुसळधार पाऊस झोडपून काढत आहे. आज सकाळी-सकाळीच शिरूरच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस येऊ लागल्याने नागरिकांची दिवसाची सुरुवात पावसाने झाली. मात्र, सायंकाळी चारच्या सुमारास दक्षिण बाजूकडून आलेल्या काळेकुट्ट ढगांनी बरसण्यास सुरुवात केली अन् काही क्षणांतच सगळीकडे जलमय परिस्थिती तयार झाली. तब्बल दोन तासांहून अधिक वेळ झालेल्या मुसळधार पावसाने परिसरातील ओढ्या-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आले असून, भीमा-भामा नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ घडून आली आहे. (वार्ताहर)