शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
6
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
7
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
8
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
9
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
10
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
11
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
12
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
13
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
14
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
15
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
16
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
17
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
18
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
19
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
20
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश

सलग चौथ्या दिवशी धुवाधार

By admin | Updated: October 5, 2015 01:50 IST

खेडच्या पूर्व, तसेच शिरूरच्या पश्चिम पट्ट्यात सलग चौथ्या दिवशी ईशान्य मोसमी वळवाच्या मुसळधार पावसाने थैमान घातले.

शेलपिंपळगाव : खेडच्या पूर्व, तसेच शिरूरच्या पश्चिम पट्ट्यात सलग चौथ्या दिवशी ईशान्य मोसमी वळवाच्या मुसळधार पावसाने थैमान घातले. मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटसह झालेल्या पावसाने परिसरात सर्वत्रच पाणीच-पाणी झाले असून, वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे शेतांनाच ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तसेच, पाण्यामुळे शेतांचे बांध फुटून शेतातील माती पाण्याबरोबर वाहून गेली आहे. एकीकडे वरुणराजाच्या कृपेने पाण्याची चिंता दूर होऊ लागली असताना सततच्या पडणाऱ्या मोठ्या पावसाने शेतातील पिके पाण्यात जाऊन सडून वाया जाण्याची भीती शेतकरीवर्गात निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदात कुठेतरी चिंतेचेही वातावरण पाहावयास मिळत आहे. खरीप हंगामात पावसाने दीर्घकाळ ओढ दिल्याने हंगामातील पिकांचे पाण्याच्या तुटवड्याअभावी सिंचन करता न आल्याने उत्पादनात कमालीची घट उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावी लागली. परिणामी, हंगामातील आर्थिक उत्पन्नही घटून शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली होती. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पादनाच्या आशेवर शेतकरी भिस्त ठेवून होता. त्यातच रब्बी हंगामाच्या तोंडावर परतीच्या मुसळधार पावसाने सलग दहा-बारा दिवस कृपा करून शेतकऱ्यांची पाण्याची चिंता दूर केली. पाण्याची तरतूद झाल्याने शेतकरी आनंदाने शेतीच्या कामाला लागला आहे. रब्बी हंगामातील प्रमुख पीक अर्थात कांद्याच्या लागवडींना शेतकऱ्यांनी विशेष प्राध्यान्य देऊन त्या उरकविण्याचा जोर धरला आहे. गेल्या चार दिवसांपासून वातावरणातील उकाड्याचे पावसात रूपांतर होत असून, खेडसह शिरूर तालुक्याला मुसळधार पाऊस झोडपून काढत आहे. आज सकाळी-सकाळीच शिरूरच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस येऊ लागल्याने नागरिकांची दिवसाची सुरुवात पावसाने झाली. मात्र, सायंकाळी चारच्या सुमारास दक्षिण बाजूकडून आलेल्या काळेकुट्ट ढगांनी बरसण्यास सुरुवात केली अन् काही क्षणांतच सगळीकडे जलमय परिस्थिती तयार झाली. तब्बल दोन तासांहून अधिक वेळ झालेल्या मुसळधार पावसाने परिसरातील ओढ्या-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आले असून, भीमा-भामा नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ घडून आली आहे. (वार्ताहर)