शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

सलग चौथ्या दिवशी धुवाधार

By admin | Updated: October 5, 2015 01:50 IST

खेडच्या पूर्व, तसेच शिरूरच्या पश्चिम पट्ट्यात सलग चौथ्या दिवशी ईशान्य मोसमी वळवाच्या मुसळधार पावसाने थैमान घातले.

शेलपिंपळगाव : खेडच्या पूर्व, तसेच शिरूरच्या पश्चिम पट्ट्यात सलग चौथ्या दिवशी ईशान्य मोसमी वळवाच्या मुसळधार पावसाने थैमान घातले. मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटसह झालेल्या पावसाने परिसरात सर्वत्रच पाणीच-पाणी झाले असून, वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे शेतांनाच ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तसेच, पाण्यामुळे शेतांचे बांध फुटून शेतातील माती पाण्याबरोबर वाहून गेली आहे. एकीकडे वरुणराजाच्या कृपेने पाण्याची चिंता दूर होऊ लागली असताना सततच्या पडणाऱ्या मोठ्या पावसाने शेतातील पिके पाण्यात जाऊन सडून वाया जाण्याची भीती शेतकरीवर्गात निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदात कुठेतरी चिंतेचेही वातावरण पाहावयास मिळत आहे. खरीप हंगामात पावसाने दीर्घकाळ ओढ दिल्याने हंगामातील पिकांचे पाण्याच्या तुटवड्याअभावी सिंचन करता न आल्याने उत्पादनात कमालीची घट उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावी लागली. परिणामी, हंगामातील आर्थिक उत्पन्नही घटून शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली होती. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पादनाच्या आशेवर शेतकरी भिस्त ठेवून होता. त्यातच रब्बी हंगामाच्या तोंडावर परतीच्या मुसळधार पावसाने सलग दहा-बारा दिवस कृपा करून शेतकऱ्यांची पाण्याची चिंता दूर केली. पाण्याची तरतूद झाल्याने शेतकरी आनंदाने शेतीच्या कामाला लागला आहे. रब्बी हंगामातील प्रमुख पीक अर्थात कांद्याच्या लागवडींना शेतकऱ्यांनी विशेष प्राध्यान्य देऊन त्या उरकविण्याचा जोर धरला आहे. गेल्या चार दिवसांपासून वातावरणातील उकाड्याचे पावसात रूपांतर होत असून, खेडसह शिरूर तालुक्याला मुसळधार पाऊस झोडपून काढत आहे. आज सकाळी-सकाळीच शिरूरच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस येऊ लागल्याने नागरिकांची दिवसाची सुरुवात पावसाने झाली. मात्र, सायंकाळी चारच्या सुमारास दक्षिण बाजूकडून आलेल्या काळेकुट्ट ढगांनी बरसण्यास सुरुवात केली अन् काही क्षणांतच सगळीकडे जलमय परिस्थिती तयार झाली. तब्बल दोन तासांहून अधिक वेळ झालेल्या मुसळधार पावसाने परिसरातील ओढ्या-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आले असून, भीमा-भामा नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ घडून आली आहे. (वार्ताहर)