शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभूमीतील धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, उच्च न्यायालयात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:11 IST

पुणे: कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये संसर्गाने बळी जाणा-यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे वैकुंठ स्मशानभूमीमध्ये एकाच दिवशी अत्यंस्कारांचे प्रमाण वाढले आहे. स्मशान ...

पुणे: कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये संसर्गाने बळी जाणा-यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे वैकुंठ स्मशानभूमीमध्ये एकाच दिवशी अत्यंस्कारांचे प्रमाण वाढले आहे. स्मशान भूमीतील विद्युत दाहिनीवरील चिमणीची उंची कमी असणे, सतत वाढते धुराचे प्रदूषण, त्यामुळे होणारे वायू प्रदूषण व त्यासोबत परिसरात पसरणारी राख अशा स्मशानभूमीच्या अवैज्ञानिक व्यवस्थापनाविषयी चिंता व्यक्त करणारी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. याचिकेची सुनावणी दि. १२ मे रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुळकर्णी यांच्या समोर होणार आहे.

नवी पेठेतील रहिवासी विक्रांत धनंजय लाटकर यांनी अँड असीम सरोदे,अँड अजित विजय देशपांडे व अँड. अजिंक्य उडाणे यांच्यामार्फत ही याचिका न्यायालयात दाखल केली आहे. स्मशानभूमीच्या वरच्या बाजूला असलेल्या चिमणीने उत्सर्जित केलेल्या गडद व जाड धूरातून आसपासच्या परिसरातली हवा प्रदूषित होत आहे. धूर मानवी आरोग्यासाठी घातक आहे आणि त्याचा नकारात्मक परिणाम हृदय आणि फुफ्फुसांवर दिसून येतो असे याचिकेत नमूद आहे. नवी पेठ. सदाशिवेपेठ, पर्वती पायथा, दांडेकर पूल वस्ती, फाटक बाग परिसर, रामबाग कॉलनी, लोकमान्य नगर, विजया नगर कॉलनी, दत्तवाडी गावठाण, सारसबाग इत्यादी ह्या भागातील नागरिकांना त्रास होत आहे. २५ आॅगस्ट २०२० मध्ये नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल (एनजीटी) ने पीएमसीविरूद्ध आदेश पारित केले असले तरी त्यानुसार कार्य करण्यास पालिका संपूर्णत: अपयशी ठरली आहे.

अ‍ॅड असीम सरोदे यांनी माहिती दिली की, महापालिकेला उच्च प्रतीची उपकरणे तसेच उच्च स्टॅक चिमणी व इतर गॅस चेंबरमधून बाहेर काढण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी याचिकेत आहे. जेणेकर येथील नागरिकांना त्याचा त्रास कमी होणार आहे. महाराष्ट्रातील स्मशानभूमीच्या व्यवस्थापनासाठी योग्य व पर्यावरणास अनुकूल वैज्ञानिक मार्गदर्शक सूचना निश्चित केल्या जाव्यात अशीही मागणी याचिकेत करण्यात आलेली आहे.

---------------------------------------------

सध्या मोठ्या संख्येने मृतदेह शव दहनासाठी आणण्यात येत आहेत, परंतु वास्तविक सत्य हे आहे की, स्मशानभूमीच्या आसपासचे नागरिक विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले दाट धुरामुळे त्रस्त आहेत.

- विक्रांत लाटकर ,याचिकाकर्ते