शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

स्मार्ट सिटीसाठी स्मार्ट धोरणांची गरज

By admin | Updated: March 22, 2016 01:53 IST

जागतिक हवामान बदलामुळे आपण वापरत असलेल्या नैसर्गिक स्रोतांचा किती वापर करायचा, याचा विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे शाश्वत विकासाठी स्मार्ट सिटीतील तंत्रज्ञानापेक्षाही स्मार्ट

पुणे : जागतिक हवामान बदलामुळे आपण वापरत असलेल्या नैसर्गिक स्रोतांचा किती वापर करायचा, याचा विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे शाश्वत विकासाठी स्मार्ट सिटीतील तंत्रज्ञानापेक्षाही स्मार्ट धोरणे तयार करून ती राबवणे अधिक आवश्यक आहे, असे मत पर्यावरणतज्ज्ञ डॉ. प्रियदर्शनी कर्वे यांनी व्यक्त केले.शारदा शक्ती या महिला संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या २५ व्या विज्ञान कट्टा या कार्यक्रमात ‘पुणे : स्मार्ट शहर’ या विषयावर डॉ. कर्वे बोलत होत्या. या वेळी शारदा शक्तीच्या राष्ट्रीय सचिव डॉ. लिना बावडेकर, डॉ. राजश्री कशाळकर उपस्थित होत्या. शारदाशक्तीच्या पुणे शाखेने दोन वर्षांपूर्वी विज्ञान कट्टा हा व्याख्यानाचा अभिनव उपक्रम सुरू केला. त्यातील २५वे व्याख्यान स्मार्ट सिटी या विषयावर आयोजित करण्यात आले होते.त्या म्हणाल्या, की पुणे शहरातील दळणवळण आणि पाणीपुरवठा या दोन प्रकल्पांना शहर पातळीवर प्राधान्य असल्याचे केंद्राला दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. त्यासाठी सुमारे तीन हजार कोटींचा प्रकल्प आराखडा तयार केला आहे. स्मार्ट सिटीसाठी औंध-बाणेर-बालेवाडी भागाची निवड केली असून, या एकूण निधीतील ७५ टक्के खर्च या भागावर तर २५ टक्के खर्च अन्य शहरात करण्यात येणार आहे. मात्र, खर्चवसुलीसाठी सरचार्ज लावला तर तो फक्त त्या सेवा घेणाऱ्या नागरिकांना असेल की पूर्ण शहरातील सर्वांना द्यावा लागेल, याबाबतही संदिग्धता आहे. पुण्यात पीएमपीएमएल या कंपनीचा अनुभव जमेस असताना पुन्हा एकदा स्मार्ट सिटीसाठी विकासाचे हक्क स्वतंत्र कंपनीला देण्यात येणार आहेत, असे सांगून कर्वे म्हणाल्या, की या कंपनीवर महापालिकेचे नियंत्रण असणार नाही तर संचालक मंडळाचेच म्हणजे अधिकाऱ्यांचे नियंत्रण असेल. पीएमपीएमएलवर अधिकाऱ्यांचे नियंत्रण असूनही त्याचे म्हणावे तसे परिणाम का दिसत नाहीत, असा सवालही त्यांनी केला.