शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

स्मार्ट पुणे होईना स्वच्छ

By admin | Updated: May 5, 2017 03:14 IST

कचऱ्याचा प्रश्न पेटल्याने संपूर्ण शहराला कचराकुंडीचे स्वरूप येण्याची भीती निर्माण झाली असताना स्वच्छतेच्या बाबतीत राष्ट्रीय पातळीवर

पुणे : कचऱ्याचा प्रश्न पेटल्याने संपूर्ण शहराला कचराकुंडीचे स्वरूप येण्याची भीती निर्माण झाली असताना स्वच्छतेच्या बाबतीत राष्ट्रीय पातळीवर पुण्याची कामगिरी चांगली झाली आहे. मात्र, गेल्या वर्षीपासून स्मार्ट सिटी योजना सुरू होऊनही महापालिका प्रशासनाला केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात मात्र उल्लेखनीय कामगिरी करून दाखवता आलेली नाही. देशातील अन्य शहरांच्या तुलनेत मागील वर्षी असलेला ११ वा क्रमांक याहीवर्षी पुणे शहराने कायम राखला. पुढचा क्रमांक मिळवण्याची मनीषा प्रशासनाला प्रत्यक्षात आणता आलेली नाही.केंद्र सरकारच्या नगर विकास मंत्रालयाच्या वतीने देशातील शहरांचे स्वच्छ शहरे या निकषातंर्गत सर्वेक्षण करण्यात येते. क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया या संस्थेच्या वतीने देशभरातील मेट्रो शहरांचे यात सर्वेक्षण केले जाते. घनकचरा व्यवस्थापनासाठी केलेली उपाययोजना, त्यातील उल्लेखनीय प्रयोग, त्यांची यशस्विता, शहरातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, असे काही निकष लावून हे सर्वेक्षण करण्यात येते. कचरा डंप करण्याची मर्यादा संपणारसलग १८ दिवस कचरा हा कचरा डेपोमध्ये नेता आला नसला तरी वेगवेगळ्या प्रक्रिया प्रकल्पांमध्ये कचरा डंप करण्यात येत आहे. दिशा तसेच अजिंक्य प्रकल्पांच्या जागेत हा कचरा नेण्यात येत आहे. मात्र आता या प्रकल्पांची कचरा सामावून घेण्याची क्षमता पूर्ण होत आली आहे. कचरा डेपोची समस्या आणखी काही दिवस अशीच लांबणीवर पडत राहिली तर शहरात लवकरच कचरा साचून राहील. अवकाळी पाऊस झाला तर ही समस्या शहराला साथीच्या आजारांकडे घेऊन जाण्याची दाट शक्यता आहे. क्रमांक अकरावा  की तेरावा ?मागील वर्षी पुणे शहर या यादीत ११ व्या क्रमाकांवर होते. यावेळी एकूण ५०० शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले. मात्र त्यात देशातील लहान शहरांचाही (३ लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या) समावेश होता. त्यातही पुणे शहराला १३ वा क्रमांक मिळाला. मात्र ११ व १२ या क्रमाकांवर लहान शहरे आहेत, त्यामुळे मेट्रो सिटीमध्ये पुण्याचा क्रमांक ११ वाच आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.