शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

‘स्मार्ट’मध्ये विकासकामांकडे दुर्लक्ष!

By admin | Updated: September 23, 2015 03:43 IST

केंद्र शासनाकडून जाहीर होणाऱ्या स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यात समावेश व्हावा याकरिता महापालिकेकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत असतानाच स्मार्ट अभियान चालविताना शहरातील अनेक विकासकामे रखडत आहेत

पुणे : केंद्र शासनाकडून जाहीर होणाऱ्या स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यात समावेश व्हावा याकरिता महापालिकेकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत असतानाच स्मार्ट अभियान चालविताना शहरातील अनेक विकासकामे रखडत आहेत, याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका, अशा शब्दांमध्ये महापौर दत्तात्रय धनकवडे, सभागृहनेते बंडू केमसे, स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम यांनी आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांनी महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कुणाल कुमार यांच्यासमवेत सोमवारी बैठक घेतली. नदीसुरक्षा, स्वच्छता, कचरा प्रश्न आणि इतर नागरी प्रश्न रखडत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. जानेवारी २०१५मध्ये प्रशासनाने स्वच्छतागृहांची स्वच्छताविषयक कामे मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल, असे सांगितले होते. त्यावर कार्यवाही झाली नाही. नदीपात्रात अतिक्रमण, राडारोडा टाकणे थांबलेले नाही. त्यामुळे त्याकरिता सुरक्षारक्षक नेमण्यात यावेत. शहर कंटेनर मुक्त करताना प्रशासनाने कंटेनर हलविले आहेत. मात्र, कचऱ्याची पर्यायी व्यवस्था केली नाही. २१ प्रभागांत शून्य कचरा प्रकल्प राबविताना उर्वरित सर्व प्रभागांतील कचऱ्याचे काय, या बाबतचेही धोरण प्रशासनाने निश्चित केले पाहिजे. सार्वजनिक भिंतीवर पोस्टर्स लावून शहर विद्रूप केले जात आहे, त्यांच्यावर काहीच कारवाई केली जात नाही, अशी तक्रार चव्हाण यांनी केली. पर्यटन वाढण्यासाठी पालिकेने स्वतंत्र अधिकारी नियुक्त केला पाहिजे. मात्र, अनेक विभाग त्यावर स्वतंत्रपणे काम करीत आहेत अशीही सूचना या बैठकीमध्ये करण्यात आली.याबाबत कुणाल कुमार म्हणाले, ‘‘सार्वजनिक स्वच्छतागृहांची १५ मशिन गाड्यांद्वारे दररोज यांत्रिक पद्धतीने स्वच्छता करण्यात येणार आहे, ही स्वच्छता दोन शिफ्ट्समध्ये केली जाईल. यासाठी स्वच्छता समिती स्थापन केली जाईल.’’ कचरासमस्यावर उपाय म्हणून प्रभाग अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा घेण्यात यावी, जेणेकरून कचरा साचण्यावर प्रतिबंध येतील, ही सूचना आयुक्तांनी मान्य केली.