शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

स्मार्ट सिटी : विकास की राजकारण?

By admin | Updated: December 11, 2015 01:00 IST

गेल्या चोवीस तासांत स्मार्ट सिटी योजनेवरून सुरू असलेल्या वेगाने घडमोडींवरून स्मार्ट सिटीचा नेमका अजेंडा शहराचा विकास की महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रशासनाचा वापर करून

पुणे : गेल्या चोवीस तासांत स्मार्ट सिटी योजनेवरून सुरू असलेल्या वेगाने घडमोडींवरून स्मार्ट सिटीचा नेमका अजेंडा शहराचा विकास की महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रशासनाचा वापर करून की राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी करण्यात येत असलेले सोयीचे राजकरण, अशी चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. केंद्र शासनाने या योजनेचा आराखडा १५ डिसेंबरपर्यंत पाठविण्याची अंतिम मुदत होती. गेल्या सहा महिन्यांपासून महापालिका प्रशासनाकडून महापालिकेचे सर्व कामकाज बाजूला ठेवत या योजनेची तयारी करण्यात आली होती. महापालिका आयुक्त या प्रस्तावासाठी विशेष आग्रही होते. नगरसेवकांकडून अनेकदा डावलल्याचा आरोप केला जात होता. त्यासाठी आयुक्तांनी नगरसेवकांची नाराजीही स्वीकारली होती. अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत आराखड्याचा वापर स्पर्धक शहरांकडून होईल, असे कारण देत नगरसेवकांनाही माहितीपासून वंचित ठेवण्यात आले. या सगळ्या नाराजीचा स्फोट बुधवारी झालेल्या सभेत झाला. सभा कामकाज नियमावली आणि कायद्यातील तरतुदींचा आधार घेत हा प्रस्ताव मुख्यसभेत एकत्र आलेल्या मनसे, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने मान्य अथवा रद्दही केला नाही. उलट तो तहकूब ठेवून प्रशासनाची कोंडी केली. या प्रस्तावास प्रशासनाने मेहनत घेतल्याने मुख्यसभेच्या निर्णयाने नाराज झालेल्या महापालिका आयुक्तांनीही तत्काळ राज्य शासनास पत्र पाठवून स्मार्ट सिटीबाबत १४ डिसेंबरपर्यंत स्पष्ट निर्णय घेण्याबाबत सूचना कराव्यात, अशी मागणी केली. त्यास शासनाने सकारात्मक प्रतिसादही दिला. महापालिका आयुक्तांनी गुरूवारी तातडीने नागपूर गाठत राज्य शासनाचे पत्र घेतले आहे. आयुक्त स्वत: नागपूरला गेले. त्यामुळे महापालिका आयुक्त थेट मुख्यसभेलाच आव्हान देत असल्याचे नगरसेवकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. प्रशासन म्हणून त्यांनी त्यांचे काम करणे योग्य आहे. पण आयुक्त प्रशासकीय अधिकारी असताना, मुख्यसभेच्या विरोधात जाऊन याच प्रस्तावासाठी का आग्रह करत आहेत, असा सवाल नगरसेवक उपस्थित करीत आहेत. स्मार्ट सिटी हा भाजपचा अजेंडा असल्याने आगामी महापालिका निवडणुकीत भाजपच्या प्रचार अजेंडयावर हाच विषय आहे. त्यामुळे शहर विकासाच्या आशेने या प्रस्तावास मान्यता दिली तरी, सत्तेत असलेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला या योजनेचे भांडवल करता येणार नाही. विरोध केला तर शहर विकासाला अडथळा आणला म्हणून टिका होणार. त्यामुळे हे राजकीय पक्ष द्विधा मनस्थितीत आहेत. याच कोंडीचा फायदा घेऊन मंजुरीसाठी आग्रह आहे का सवाल आहे.