शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

स्मार्ट सिटी : विकास की राजकारण?

By admin | Updated: December 11, 2015 01:00 IST

गेल्या चोवीस तासांत स्मार्ट सिटी योजनेवरून सुरू असलेल्या वेगाने घडमोडींवरून स्मार्ट सिटीचा नेमका अजेंडा शहराचा विकास की महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रशासनाचा वापर करून

पुणे : गेल्या चोवीस तासांत स्मार्ट सिटी योजनेवरून सुरू असलेल्या वेगाने घडमोडींवरून स्मार्ट सिटीचा नेमका अजेंडा शहराचा विकास की महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रशासनाचा वापर करून की राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी करण्यात येत असलेले सोयीचे राजकरण, अशी चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. केंद्र शासनाने या योजनेचा आराखडा १५ डिसेंबरपर्यंत पाठविण्याची अंतिम मुदत होती. गेल्या सहा महिन्यांपासून महापालिका प्रशासनाकडून महापालिकेचे सर्व कामकाज बाजूला ठेवत या योजनेची तयारी करण्यात आली होती. महापालिका आयुक्त या प्रस्तावासाठी विशेष आग्रही होते. नगरसेवकांकडून अनेकदा डावलल्याचा आरोप केला जात होता. त्यासाठी आयुक्तांनी नगरसेवकांची नाराजीही स्वीकारली होती. अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत आराखड्याचा वापर स्पर्धक शहरांकडून होईल, असे कारण देत नगरसेवकांनाही माहितीपासून वंचित ठेवण्यात आले. या सगळ्या नाराजीचा स्फोट बुधवारी झालेल्या सभेत झाला. सभा कामकाज नियमावली आणि कायद्यातील तरतुदींचा आधार घेत हा प्रस्ताव मुख्यसभेत एकत्र आलेल्या मनसे, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने मान्य अथवा रद्दही केला नाही. उलट तो तहकूब ठेवून प्रशासनाची कोंडी केली. या प्रस्तावास प्रशासनाने मेहनत घेतल्याने मुख्यसभेच्या निर्णयाने नाराज झालेल्या महापालिका आयुक्तांनीही तत्काळ राज्य शासनास पत्र पाठवून स्मार्ट सिटीबाबत १४ डिसेंबरपर्यंत स्पष्ट निर्णय घेण्याबाबत सूचना कराव्यात, अशी मागणी केली. त्यास शासनाने सकारात्मक प्रतिसादही दिला. महापालिका आयुक्तांनी गुरूवारी तातडीने नागपूर गाठत राज्य शासनाचे पत्र घेतले आहे. आयुक्त स्वत: नागपूरला गेले. त्यामुळे महापालिका आयुक्त थेट मुख्यसभेलाच आव्हान देत असल्याचे नगरसेवकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. प्रशासन म्हणून त्यांनी त्यांचे काम करणे योग्य आहे. पण आयुक्त प्रशासकीय अधिकारी असताना, मुख्यसभेच्या विरोधात जाऊन याच प्रस्तावासाठी का आग्रह करत आहेत, असा सवाल नगरसेवक उपस्थित करीत आहेत. स्मार्ट सिटी हा भाजपचा अजेंडा असल्याने आगामी महापालिका निवडणुकीत भाजपच्या प्रचार अजेंडयावर हाच विषय आहे. त्यामुळे शहर विकासाच्या आशेने या प्रस्तावास मान्यता दिली तरी, सत्तेत असलेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला या योजनेचे भांडवल करता येणार नाही. विरोध केला तर शहर विकासाला अडथळा आणला म्हणून टिका होणार. त्यामुळे हे राजकीय पक्ष द्विधा मनस्थितीत आहेत. याच कोंडीचा फायदा घेऊन मंजुरीसाठी आग्रह आहे का सवाल आहे.