शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

दुर्गम भागातील महिलांसाठी लघुउद्योग उभारावेत : आयुष प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:08 IST

यावेळी ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप, गटविकास अधिकारी अमर माने, गावचे सरपंच गणेश जगताप उपस्थित होते. कोरोनाच्या विळख्यातून बाहेर ...

यावेळी ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप, गटविकास अधिकारी अमर माने, गावचे सरपंच गणेश जगताप उपस्थित होते.

कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडून २८ दिवसांत कोरोनामुक्त गाव केलेल्या काळदरी गावाला आयुष प्रसाद यांनी भेट दिली. परिसराची भौगोलिक परिस्थिती पाहता येथे शेती व शेतीवर आधारित उद्योग-व्यवसाय करावेत नैसर्गिक साधनसंपत्ती अभ्यास करून कृषी पर्यटनाबरोबर लघुउद्योगांची निर्मिती या परिसरात झाल्यास येथील नागरिकांचे स्थलांतर थांबवण्यासाठी मदत होणार असून या कामाला जिल्हा परिषदेच्या वतीने सर्व मदत पुरवण्याचे आश्वासन देऊन आयुष प्रसाद कोरोनामुक्त गाव केल्याबद्दल गावकऱ्यांचे आभार मानून कौतुक केले.

गाव शंभर टक्के कोरोनामुक्त करून ४५ वर्षांवरील ९८ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याचे सरपंच गणेश जगताप यांनी सांगितले. काळदरी परिसरातील माती व वातावरणाचा विचार केला असता या परिसरात अंबा, काजू आदी फळबागांची लागवड करण्यासाठी भरीव तरतूद करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची मागणी सरपंच गणेश जगताप यांनी करून महिला व तरुणांसाठी लघुउद्योग उभारण्याच्या कामात पुढाकार घेणार असल्याचे आश्वासन दिले. गणेश जगताप यांच्या हस्ते आयुष प्रसाद यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय झुरंगे, सभापती नलिनी लोळे, उपसरपंच अनिता कारकर, ग्रामसेवक काशीपती सुतार, हरिभाऊ लोळे, ग्रामपंचायत सदस्य अशोक भगत, देविदास यादव, प्रशांत शेंडकर,शरद कारकर, अंकुश पिसाळ, अतुल थोपटे, पांडुरंग जाधव आदी ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काळदरी (ता.पुरंदर) येथे आयुष प्रसाद यांनी सरपंच गणेश जगताप व ग्रामपंचायत सदस्यांशी संवाद साधला.