शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

नोटाबंदीमुळे शेतमालाला आली मंदी

By admin | Updated: January 12, 2017 01:50 IST

नरेंद्र मोदींनी केली नोटाबंदी, आली शेतमालाला मंदी, हातची गेली संधी, शेतकरी झाला कर्जदाराचा बंदी.

टाकळी हाजी : नरेंद्र मोदींनी केली नोटाबंदी, आली शेतमालाला मंदी, हातची गेली संधी, शेतकरी झाला कर्जदाराचा बंदी... अशी परस्थिती ग्रामीण भाागतील झाली असून, शहरातील लोकांसाठी गृहकर्जाच्या दरात कपात केली. मात्र, आम्हाला शेतमाल फेकून देऊनही सरकारनं काय दिलंय? असा सवाल शेतकरीवर्गातून केला जात आहे.नोटाबंदीला ६० दिवसांहून जास्त दिवस झालेत; मात्र अजूनही त्याचा परिणाम ग्रामीण भागात दिसून येत आहे. पंतप्रधान मोदींनी ५० दिवसांचे आवाहन केले होत. त्यानतंरही अजूनही ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवरील झालेल्या परिणामामध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही. याबाबत बोलताना कवठे येमाई येथील तरुण शेतकरी दीपक पोकळे यांनी सांगितले, की तरुणाला शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही. आपल्या वडिलोपार्जित जमिनीमध्येच तो अत्याधुनिक पद्धतीने शेती करत आहे. त्यासाठी बँकेचे कर्ज घेतलेय. मात्र, सध्या डाळिंब असो की कांदे, टोमॅटो, बटाटा या कोणत्याच मालाला बाजारभाव नाही. उत्पादन खर्चसुद्धा मिळत नाही. या देशात ७० टक्के अर्थव्यवस्था ग्रामीण भागातील शेतीवर अवलंबून आहे. मात्र, या सरकारने ६० दिवसांमध्ये बळीराजा व ग्रामीण भागातील जनतेचा विचार केला नाही, तर शहरातील लोकांना फक्त गृहकर्जाचे व्याजदर कमी केले. मग हे सरकार फक्त शहरातील लोकांसाठीच का? असा सवाल त्यांनी केला. पीककर्जावरील ६० दिवसांचे व्याज माफ म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असल्याने तरुणवर्ग शेतापासून दूर चालला असून, त्यामध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. (वार्ताहर)