शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

नोटाबंदीमुळे शेतमालाला आली मंदी

By admin | Updated: January 12, 2017 01:50 IST

नरेंद्र मोदींनी केली नोटाबंदी, आली शेतमालाला मंदी, हातची गेली संधी, शेतकरी झाला कर्जदाराचा बंदी.

टाकळी हाजी : नरेंद्र मोदींनी केली नोटाबंदी, आली शेतमालाला मंदी, हातची गेली संधी, शेतकरी झाला कर्जदाराचा बंदी... अशी परस्थिती ग्रामीण भाागतील झाली असून, शहरातील लोकांसाठी गृहकर्जाच्या दरात कपात केली. मात्र, आम्हाला शेतमाल फेकून देऊनही सरकारनं काय दिलंय? असा सवाल शेतकरीवर्गातून केला जात आहे.नोटाबंदीला ६० दिवसांहून जास्त दिवस झालेत; मात्र अजूनही त्याचा परिणाम ग्रामीण भागात दिसून येत आहे. पंतप्रधान मोदींनी ५० दिवसांचे आवाहन केले होत. त्यानतंरही अजूनही ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवरील झालेल्या परिणामामध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही. याबाबत बोलताना कवठे येमाई येथील तरुण शेतकरी दीपक पोकळे यांनी सांगितले, की तरुणाला शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही. आपल्या वडिलोपार्जित जमिनीमध्येच तो अत्याधुनिक पद्धतीने शेती करत आहे. त्यासाठी बँकेचे कर्ज घेतलेय. मात्र, सध्या डाळिंब असो की कांदे, टोमॅटो, बटाटा या कोणत्याच मालाला बाजारभाव नाही. उत्पादन खर्चसुद्धा मिळत नाही. या देशात ७० टक्के अर्थव्यवस्था ग्रामीण भागातील शेतीवर अवलंबून आहे. मात्र, या सरकारने ६० दिवसांमध्ये बळीराजा व ग्रामीण भागातील जनतेचा विचार केला नाही, तर शहरातील लोकांना फक्त गृहकर्जाचे व्याजदर कमी केले. मग हे सरकार फक्त शहरातील लोकांसाठीच का? असा सवाल त्यांनी केला. पीककर्जावरील ६० दिवसांचे व्याज माफ म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असल्याने तरुणवर्ग शेतापासून दूर चालला असून, त्यामध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. (वार्ताहर)