शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीमुळे शेतमालाला आली मंदी

By admin | Updated: January 12, 2017 01:50 IST

नरेंद्र मोदींनी केली नोटाबंदी, आली शेतमालाला मंदी, हातची गेली संधी, शेतकरी झाला कर्जदाराचा बंदी.

टाकळी हाजी : नरेंद्र मोदींनी केली नोटाबंदी, आली शेतमालाला मंदी, हातची गेली संधी, शेतकरी झाला कर्जदाराचा बंदी... अशी परस्थिती ग्रामीण भाागतील झाली असून, शहरातील लोकांसाठी गृहकर्जाच्या दरात कपात केली. मात्र, आम्हाला शेतमाल फेकून देऊनही सरकारनं काय दिलंय? असा सवाल शेतकरीवर्गातून केला जात आहे.नोटाबंदीला ६० दिवसांहून जास्त दिवस झालेत; मात्र अजूनही त्याचा परिणाम ग्रामीण भागात दिसून येत आहे. पंतप्रधान मोदींनी ५० दिवसांचे आवाहन केले होत. त्यानतंरही अजूनही ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवरील झालेल्या परिणामामध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही. याबाबत बोलताना कवठे येमाई येथील तरुण शेतकरी दीपक पोकळे यांनी सांगितले, की तरुणाला शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही. आपल्या वडिलोपार्जित जमिनीमध्येच तो अत्याधुनिक पद्धतीने शेती करत आहे. त्यासाठी बँकेचे कर्ज घेतलेय. मात्र, सध्या डाळिंब असो की कांदे, टोमॅटो, बटाटा या कोणत्याच मालाला बाजारभाव नाही. उत्पादन खर्चसुद्धा मिळत नाही. या देशात ७० टक्के अर्थव्यवस्था ग्रामीण भागातील शेतीवर अवलंबून आहे. मात्र, या सरकारने ६० दिवसांमध्ये बळीराजा व ग्रामीण भागातील जनतेचा विचार केला नाही, तर शहरातील लोकांना फक्त गृहकर्जाचे व्याजदर कमी केले. मग हे सरकार फक्त शहरातील लोकांसाठीच का? असा सवाल त्यांनी केला. पीककर्जावरील ६० दिवसांचे व्याज माफ म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असल्याने तरुणवर्ग शेतापासून दूर चालला असून, त्यामध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. (वार्ताहर)