शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

स्वच्छ भारत अभियानात पालिकेची गती मंदावली

By admin | Updated: March 18, 2016 03:15 IST

केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या स्वच्छ भारत अभियानाची गती शहरात मंदावली आहे. या अभियानांतर्गत महापालिकेला आॅक्टोबर २०१७पर्यंत शहर हगणदरीमुक्त करण्यासाठीचे

पुणे : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या स्वच्छ भारत अभियानाची गती शहरात मंदावली आहे. या अभियानांतर्गत महापालिकेला आॅक्टोबर २०१७पर्यंत शहर हगणदरीमुक्त करण्यासाठीचे उद्दिष्ट असल्याने पुढील दीड वर्षात महापालिकेला शहरात २८ हजार घरांमध्ये स्वच्छतागृह बांधणे बंधनकारक असताना गेल्या वर्षभरात महापालिकेने केवळ २ हजार स्वच्छतागृहे बांधली आहेत. त्यामुळे हे काम संथ गतीने सुरू असल्याने ज्या अधिकाऱ्यांवर याची जबाबदारी देण्यात आली आहे, त्यांतील ११ अधिकाऱ्यांना घनकचरा विभागाकडून नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्याबाबतचा खुलासा मागविण्यात आला आहे. महापालिकेकडून केलेल्या सर्वेक्षणात शहरात आणखी २८ हजार स्वच्छतागृहे उभारणे आवश्यक आहे. यासाठी महापालिकेला १७ कोटी रुपयांंचा खर्च येणार असून, पालिकेच्या अंदाजपत्रकात त्यासाठी तरतूदही करण्यात आली आहे. काही निधी केंद्र शासन तसेच राज्य शासनाकडून मिळणार आहे. ही स्वच्छतागृहे बांधण्यासाठी पालिकेला आॅक्टोबर २०१७पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. हे काम योग्य पद्धतीने होण्यासाठी त्याची जबाबदारी १५ क्षेत्रीय कार्यालयांकडे देण्यात आली होती. मात्र, त्यांतील अवघ्या ३ क्षेत्रीय कार्यालयांकडूनच चांगल्या प्रकारचे काम झाले असल्याने इतर १२ क्षेत्रीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानुसार, दोन दिवसांत तातडीने लेखी खुलासा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...तर १४ वर्षे लागतीलस्वच्छतागृहांचे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनास अडीच वर्षांचा कालावधी मिळाला होता. त्यानुसार, क्षेत्रीय कार्यालयांना कालबद्ध कार्यक्रम देण्यात आला आहे. मात्र, हे पहिल्या वर्षी १० हजार स्वच्छतागृहे होणे अपेक्षित असताना २ हजार स्वच्छतागृहे उभी राहिली. कामाची ही गती पाहता शहर हगणदरीमुक्त होण्यास सुमारे १४ वर्षे लागतील. त्यामुळे उर्वरित दीड महिन्यात प्रशासन २६ हजार स्वच्छतागृहे कशी उभारणार, असा प्रश्न उपस्थित होतो.