शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
3
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
4
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
5
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
6
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
7
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
8
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
9
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
10
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
11
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
12
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
13
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
14
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
15
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
16
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
17
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
18
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
19
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
20
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष

स्वच्छ भारत अभियानात पालिकेची गती मंदावली

By admin | Updated: March 18, 2016 03:15 IST

केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या स्वच्छ भारत अभियानाची गती शहरात मंदावली आहे. या अभियानांतर्गत महापालिकेला आॅक्टोबर २०१७पर्यंत शहर हगणदरीमुक्त करण्यासाठीचे

पुणे : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या स्वच्छ भारत अभियानाची गती शहरात मंदावली आहे. या अभियानांतर्गत महापालिकेला आॅक्टोबर २०१७पर्यंत शहर हगणदरीमुक्त करण्यासाठीचे उद्दिष्ट असल्याने पुढील दीड वर्षात महापालिकेला शहरात २८ हजार घरांमध्ये स्वच्छतागृह बांधणे बंधनकारक असताना गेल्या वर्षभरात महापालिकेने केवळ २ हजार स्वच्छतागृहे बांधली आहेत. त्यामुळे हे काम संथ गतीने सुरू असल्याने ज्या अधिकाऱ्यांवर याची जबाबदारी देण्यात आली आहे, त्यांतील ११ अधिकाऱ्यांना घनकचरा विभागाकडून नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्याबाबतचा खुलासा मागविण्यात आला आहे. महापालिकेकडून केलेल्या सर्वेक्षणात शहरात आणखी २८ हजार स्वच्छतागृहे उभारणे आवश्यक आहे. यासाठी महापालिकेला १७ कोटी रुपयांंचा खर्च येणार असून, पालिकेच्या अंदाजपत्रकात त्यासाठी तरतूदही करण्यात आली आहे. काही निधी केंद्र शासन तसेच राज्य शासनाकडून मिळणार आहे. ही स्वच्छतागृहे बांधण्यासाठी पालिकेला आॅक्टोबर २०१७पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. हे काम योग्य पद्धतीने होण्यासाठी त्याची जबाबदारी १५ क्षेत्रीय कार्यालयांकडे देण्यात आली होती. मात्र, त्यांतील अवघ्या ३ क्षेत्रीय कार्यालयांकडूनच चांगल्या प्रकारचे काम झाले असल्याने इतर १२ क्षेत्रीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानुसार, दोन दिवसांत तातडीने लेखी खुलासा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...तर १४ वर्षे लागतीलस्वच्छतागृहांचे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनास अडीच वर्षांचा कालावधी मिळाला होता. त्यानुसार, क्षेत्रीय कार्यालयांना कालबद्ध कार्यक्रम देण्यात आला आहे. मात्र, हे पहिल्या वर्षी १० हजार स्वच्छतागृहे होणे अपेक्षित असताना २ हजार स्वच्छतागृहे उभी राहिली. कामाची ही गती पाहता शहर हगणदरीमुक्त होण्यास सुमारे १४ वर्षे लागतील. त्यामुळे उर्वरित दीड महिन्यात प्रशासन २६ हजार स्वच्छतागृहे कशी उभारणार, असा प्रश्न उपस्थित होतो.