शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

डल्ला मारण्याआधी व्हा, सावध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2016 01:02 IST

गेल्या काही महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड शहरात सोनसाखळी चोरी, चाकूचा धाक दाखवून लुटणे या चोरीच्या घटनांचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे

पिंपरी : गेल्या काही महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड शहरात सोनसाखळी चोरी, चाकूचा धाक दाखवून लुटणे या चोरीच्या घटनांचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता तर नागरिकांना घर बंद करून बाहेरगावी जाणेही धोकादायक वाटू लागले आहे. कारण, बंद घरे चोरट्यांच्या निशाण्यावर असून, गेल्या तीन महिन्यांत दिवसा व रात्री मिळून ८४ घरफोडीच्या घटना घडल्या. यामध्ये फक्त १२ घटनाच उघडकीस आल्या असून, चोरटे अद्यापही मोकाटच आहेत.सध्या शाळा-महाविद्यालयांना सुट्या लागल्या असून, बहुतांश कुटुंबे बाहेरगावी फिरायला-नातेवाइकांकडे जाण्याचे नियोजन करीत आहे. याचा फायदा चोरटे घेत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून तर घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बंद घर दिसल्यावर चोरटे लागलीच कडी-कोयंडा उचकटून लाखोंचा मुद्देमाल लंपास करीत आहेत. परिमंडल तीनच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी, निगडी, चिंचवड, एमआयडीसी, चतु:शृंगी, हिंजवडी, सांगवी, वाकड या ठिकाणी गेल्या तीन महिन्यांत ८४ घरफोडीच्या घटना घडल्या. यामध्ये दिवसा ३२ घरफोडीच्या घटना घडल्या असून, यात सर्वाधिक घरफोड्या सांगवी आणि वाकडमध्ये ६ ठिकाणी, तर भोसरीत ५ ठिकाणी घरफोड्या झाल्या. तसेच इतर पोलीस ठाण्यांमध्येही दिवसा घरफोडीच्या घटनांची नोंद असून, ३२ घरफोडीच्या घटनांपैकी फक्त दोनच घटनांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. ५२ ठिकाणी रात्रीच्या घरफोड्या झाल्या असून, यामध्ये सर्वाधिक १४ घरफोड्या निगडीत झाल्या.या १४ पैकी दोनच घटना उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, रात्रीच्या एकूण ५२ घरफोडीच्या घटनांपैकी फक्त १० घटनांचा छडा पोलिसांनी लावला आहे. (प्रतिनिधी)नागरिकांचीही उदासीनतागेल्या तीन महिन्यांपूर्वी पिंपरीतील अजमेरा कॉलनी, तळवडे, निगडी या ठिकाणी दिवसा घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. या घटनेनंतर तेथील सोसायट्यांमधील नागरिक किती जागरूक झाले. याची पाहणी करण्यासाठी ‘लोकमत टीम’ने त्या ठिकाणी दिवसा स्टिंग आॅपरेशन केले होते. ज्या सोसायटीत घरफोडी झाली होती त्या ठिकाणी प्रतिनिधी हातात लोखंडी हातोडी घेऊन फिरले. एका ठिकाणी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे भासवले. सोसायटीत फिरताना परिसरातील नागरिक फक्त बघत होते. मात्र, कोणीही हटकले नाही आणि विचारपूसही केली नाही. यावरून सुरक्षितेबद्दल नागरिकांची उदासीनता दिसून आली.