शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

डल्ला मारण्याआधी व्हा, सावध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2016 01:02 IST

गेल्या काही महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड शहरात सोनसाखळी चोरी, चाकूचा धाक दाखवून लुटणे या चोरीच्या घटनांचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे

पिंपरी : गेल्या काही महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड शहरात सोनसाखळी चोरी, चाकूचा धाक दाखवून लुटणे या चोरीच्या घटनांचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता तर नागरिकांना घर बंद करून बाहेरगावी जाणेही धोकादायक वाटू लागले आहे. कारण, बंद घरे चोरट्यांच्या निशाण्यावर असून, गेल्या तीन महिन्यांत दिवसा व रात्री मिळून ८४ घरफोडीच्या घटना घडल्या. यामध्ये फक्त १२ घटनाच उघडकीस आल्या असून, चोरटे अद्यापही मोकाटच आहेत.सध्या शाळा-महाविद्यालयांना सुट्या लागल्या असून, बहुतांश कुटुंबे बाहेरगावी फिरायला-नातेवाइकांकडे जाण्याचे नियोजन करीत आहे. याचा फायदा चोरटे घेत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून तर घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बंद घर दिसल्यावर चोरटे लागलीच कडी-कोयंडा उचकटून लाखोंचा मुद्देमाल लंपास करीत आहेत. परिमंडल तीनच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी, निगडी, चिंचवड, एमआयडीसी, चतु:शृंगी, हिंजवडी, सांगवी, वाकड या ठिकाणी गेल्या तीन महिन्यांत ८४ घरफोडीच्या घटना घडल्या. यामध्ये दिवसा ३२ घरफोडीच्या घटना घडल्या असून, यात सर्वाधिक घरफोड्या सांगवी आणि वाकडमध्ये ६ ठिकाणी, तर भोसरीत ५ ठिकाणी घरफोड्या झाल्या. तसेच इतर पोलीस ठाण्यांमध्येही दिवसा घरफोडीच्या घटनांची नोंद असून, ३२ घरफोडीच्या घटनांपैकी फक्त दोनच घटनांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. ५२ ठिकाणी रात्रीच्या घरफोड्या झाल्या असून, यामध्ये सर्वाधिक १४ घरफोड्या निगडीत झाल्या.या १४ पैकी दोनच घटना उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, रात्रीच्या एकूण ५२ घरफोडीच्या घटनांपैकी फक्त १० घटनांचा छडा पोलिसांनी लावला आहे. (प्रतिनिधी)नागरिकांचीही उदासीनतागेल्या तीन महिन्यांपूर्वी पिंपरीतील अजमेरा कॉलनी, तळवडे, निगडी या ठिकाणी दिवसा घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. या घटनेनंतर तेथील सोसायट्यांमधील नागरिक किती जागरूक झाले. याची पाहणी करण्यासाठी ‘लोकमत टीम’ने त्या ठिकाणी दिवसा स्टिंग आॅपरेशन केले होते. ज्या सोसायटीत घरफोडी झाली होती त्या ठिकाणी प्रतिनिधी हातात लोखंडी हातोडी घेऊन फिरले. एका ठिकाणी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे भासवले. सोसायटीत फिरताना परिसरातील नागरिक फक्त बघत होते. मात्र, कोणीही हटकले नाही आणि विचारपूसही केली नाही. यावरून सुरक्षितेबद्दल नागरिकांची उदासीनता दिसून आली.