शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

मावळात सहा महिन्यांत सहावा बळी

By admin | Updated: December 9, 2015 00:16 IST

संत-महंतांच्या पावन स्पर्शाने पुनित मावळच्या भूमीत मागील काही काळापासून उदयास आलेली राजकीय महत्त्वाकांक्षा व आर्थिक सुबत्ता यांमुळे राजकीय क्षेत्रातील खुनाच्या

लोणावळा : संत-महंतांच्या पावन स्पर्शाने पुनित मावळच्या भूमीत मागील काही काळापासून उदयास आलेली राजकीय महत्त्वाकांक्षा व आर्थिक सुबत्ता यांमुळे राजकीय क्षेत्रातील खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे़ गेल्या सहा महिन्यांत सहा खून झाले. त्यातील चार राजकीय कारणांवरून झाले आहेत.छत्रपती शिवरायांच्या बारा मावळांपैकी प्रमुख असलेल्या मावळ तालुक्याला संतांच्या वास्तव्याचा मोठा इतिहास आहे़ मुंबई व पुणे या मोठ्या शहरांच्या मध्यावर वसलेला तालुका असा नावलौकिक असलेल्या मावळात काही काळापासून खुनाच्या घटनांमुळे गालबोट लागले आहे़ युवा पिढीमध्ये वाढलेली राजकीय महत्त्वाकांक्षा, जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमधून आलेली आर्थिक सुबत्ता, खालावलेली वैचारिकता व संवादाकडून विसंवादाकडे जाणारी पाळेमुळे यामुळे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे़ राजकारणात मोठे पद मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणे इथपर्यंत सर्व ठीक आहे़ मात्र त्यामधून एखाद्या व्यक्तीला संपवून टाकणे हे कितपत योग्य आहे़ पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये संघटित गुन्हेगारी, टोळीयुद्ध चालतात. मात्र, मावळच्या भूमीत आजपर्यंत कोणीही असा प्रयत्न केला नव्हता. त्याचे महत्त्वाचे कारण राजकीय वाद, पक्ष काही असले, तरी मावळासाठी सर्वजण एकदिलाने व एकविचाराने काम करीत होते़ मात्र तीच वैचारिकता कमी होऊ लागली असल्याचे अलीकडील घटनांवरून दिसू लागले आहे़ जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमधून आलेली सुबत्ता व चंगळवादी होत असलेली युवा पिढी यांना हाताशी धरत मागील काही महिन्यांपूर्वी मुंबईतील एक गँगने मावळात पाय रोवण्यास सुरुवात केली होती. मात्र पोलीस दलाच्या सतर्कतेमुळे तो डाव उधळण्यात काही प्रमाणात यश आले़ असे असले, तरी संवादाकडून विसंवादाकडे सुरू असलेली वाटचाल यामुळे मावळात गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे़ एखाद्या घटनेला पार्श्वभूमी काही जरी असली, तरी जय व पराजय पचविण्यासाठीची खिलाडू वृत्ती कमी झाली असल्याचे यावरून अधोरेखित होत आहे़ मावळ हा मावळ्यांचा, जिगरबाजांचा, कर्तृत्ववान व्यक्तींचा, संतांचा भाग आहे. या ठिकाणी खून व खुनाचा प्रयत्न यासारख्या घटना शोभनीय नाहीत़ या घटना वेळीच रोखणे गरजेचे आहे़ निवडणुका व आर्थिक सुबत्ता येत-जात असतात. मात्र, या गोष्टीकडे पाहण्याची संकुचित दृष्टी बदलणे गरजेचे आहे़ वादातून वाद घालण्याऐवजी संवादातून समतोल साधणे गरजेचे आहे़ मावळात मागील सहा महिन्यात सहा खून झाले आहेत़ यापैकी चार राजकीय वादांमधून, तर दोन वैयक्तिक कारणांवरून झाले आहेत़ अशा घटना वेळीच रोखणे गरजेचे आहे़ राजकीय वादातून खुनाच्या घटना, तसेच भांडणांचे प्रकार वाढले आहेत.(वार्ताहर)