शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा फुगवटा असल्यामुळे परिस्थिती अजूनही बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:10 IST

बारामती : कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकार एकमेकांच्या संपर्कात आहेत. तसेच कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री व महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री ...

बारामती : कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकार एकमेकांच्या संपर्कात आहेत. तसेच कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री व महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री अधिकारी समन्वय राखून पुर परिस्थिती हाताळत आहेत. सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, पाण्याचा फुगवटा असल्यामुळे अजूनही परिस्थिती बिकट आहे. या संकटात अडकलेल्या जनतेला राज्यसरकार सर्वतोपरी सहकार्य करणार आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (दि. २५) कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. पवार म्हणाले, दरडी कोसळून आणि भूस्खलनामुळे दुर्देवाने अनेकांचे यात बळी गेले. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सबंधीत जिल्ह्याचे पालकमंत्री व विविध खात्याचे मंत्री पुरग्रस्त भागात फिरत आहेत. मी देखील आज सातारा तर उद्या सांगली आणि कोल्हापूर भागाचा दौरा करणार आहे. या भागातील जनतेसाठी तातडीने शिवभोजन थाळी मोफत सुरू करण्यात आली आहे. धान्यामध्ये तांदुळ, डाळ व अन्न शिजवण्यासाठी रॉकेल तसेच फुड पॅकेट, पाण्याच्या बाटल्या पोहचवण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी तातडीने निर्णय घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. आतापर्यंत १ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. या भागातील पालकमंत्री, विभागिय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली आहे. अजुन काही मदत तसेच उपाययोजना करण्यासंदर्भात बैठका होणार आहेत. पाण्याचा फुगवटा कमी करण्यासंदर्भात सध्या उपाययोजना सुरू आहेत. अलमट्टी धरणातून ३ लाख क्युसेकने विसर्ग सुरू आहे. तर नद्यांमधून पाऊने तीन लाख क्युसेक पाणी अलमट्टीमध्ये जात आहे. नौदल, वायुदल तसेच सैन्यदल, एनडीआरएफ, एसटीआरएफ बचाव तुकड्या मदतीसाठी आलेल्या आहेत.

---------------------

रामराजे नाईक-निंबाळकर हे त्यांच्या कामासंदर्भात मला भेटण्यासाठी आले होते. त्यांचे काम झाले ते निघून गेले. या संदर्भात काही बोलण्यासारखे नाही. सध्या आपल्यापुढे वेगळे प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष देऊ, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावरील प्रश्नाला उत्तर दिले.

-------------------------------