शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

‘स्वच्छ भारत अभियाना’त सिंहगड

By admin | Updated: July 10, 2015 01:58 IST

पुणे शहर व जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन महामंडळ समन्वयकाची भूमिका घेऊन गड-किल्ल्यांच्या विकासाला चालना देणार आहे.

सिंहगड रस्ता : पुणे शहर व जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन महामंडळ समन्वयकाची भूमिका घेऊन गड-किल्ल्यांच्या विकासाला चालना देणार आहे. ‘स्वच्छ भारत अभियान’ योजनेंतर्गत पुणे विभागात ‘किल्ले सिंहगड’ची पर्यटन महामंडळाकडून निवड करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापिका वैशाली चव्हाण यांनी सांगितले.‘किल्ले सिंहगड’ येथे पर्यटन महामंडळाच्या वतीने बुधवारी वृक्षारोपण कार्यक्रम झाला. त्या वेळी त्या बोलत होत्या. चव्हाण म्हणाल्या, ‘‘राज्यातील गड-किल्ल्यांची संख्या व सह्याद्रीच्या विस्तीर्ण रांगातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या योजना यशस्वीपणे राबविण्याची गरज आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवर लोकांचा सहभाग व प्रतिसादही मिळणे आवश्यक आहे.’’ विशेष आराखडा तयार करून, गडाच्या सुधारणेची कामे शासन हाती घेणार आहे. त्यामुळे येथील पर्यटनाला चालना मिळून व्यवसाय व रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्यासाठी वन, पर्यटन, पुरातत्त्व, ग्रामपंचायत व स्थानिक वनसंरक्षण समिती व ग्रामस्थांमध्ये समन्वय राहिला पाहिजे, अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली.शाखा अभियंता हनुमंत गळवे, विष्णू आव्हाड, वनपाल पी. आर. कड, तानाजी खाटपे, बबन मरगळे, संदीप सांबरे, गणेश सांबरे, नितीन गोळे, गुलाब भोंडेकर, महादेव पायगुडे, विठ्ठल पढेर, शांताराम लांघी हे उपस्थित होते.वनसंरक्षण समितीचे सुरक्षा कर्मचारी उत्तम खामकर, बच्चन पढेर, भानुदास जोरकर, नंदू जोरकर, नीलेश सांगळे, अनिल जोरकर, विकी दुधाणे, संजय गायकवाड, सुरेश सांगळे, राजू बडदे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)